मंगलवार, 2 जून 2009

पाकिस्तान गंभीर नसल्याचेच हे द्योतक - गृहमंत्री

पाकिस्तान गंभीर नसल्याचेच हे द्योतक - गृहमंत्री
पीटीआय
Tuesday, June 02nd, 2009 AT 7:06 PM
नवी दिल्ली - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि जमात उद दवाचा म्होरक्‍या हाफीज मोहंमद सईद यांच्या सुटकेचा भारताने मंगळवारी तीव्र निषेध केला. गेल्या २६ नोव्हेंबरला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधारांना शिक्षा सुनावण्याचे वचन पाकिस्तानने पाळले नाही. मुंबई हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना धडा शिकविण्याबाबत पाकिस्तान गंभीर नाही हेच यातून दिसून येते, असे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले.
लाहोर उच्च न्यायालयाने मंगळवारी सईद याच्या सुटकेचे आदेश दिले. त्यानंतर चिदंबरम यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सईद याच्या सुटकेमुळे मुंबई हल्ल्याच्या तपासावर कोणताही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने जमात उद दवावर निर्बंध घातल्यानंतर सईद याला त्याच्या निवासस्थानी गेल्या ११ डिसेंबरपासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते
(esakal.com)

---
गृहमंत्री पकिस्तानाकदुन् अजुन कसली अपेक्शा करतात?
ज्या पकिस्तानची निर्मितिच भारत विरोधी भुमीकेतुन झाली तो पकिस्तान या बाबतीत कसा काय गंभीर असनार?मात्र त्यान्चा तो अतिरेकी जमात उद दवाचा म्होरक्‍या हाफीज मोहंमद सईद यांच्या सुटकेबाबत
पकिस्तन् पुर्नपने गम्भीर् आहे.
गृहमंत्री पी. चिदंबरम यांना काय अपेक्शित आहे? की पाकिस्तान मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी आणि जमात उद दवाचा म्होरक्‍या हाफीज मोहंमद सईद याला फ़ाशी देईल?


पाकिस्तानाला पुरावे कशासथि दिले गेले काय् माहित्?

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें