शनिवार, 10 अक्तूबर 2009

कालचे राज साहेबांचे भाषण मला खुपच आवडले ,कारण राज यांनी मराठी बरोबरच बाकी इतर मुद्द्यानाही स्पर्श केला .
उदा . ६० वर्षे झाली आपण त्याच त्याच मुद्द्यावर निवडणुक लढवतोय ,पाणी देऊ , वीज देऊ ,रस्ते करू ,आरोग्य .
गेल्या १० वर्षात कांग्रेस ,राष्ट्रवादी ला १ मेगावॉट वीज ही निर्माण करता येत नाही .आपले हे सरकार करू ,बघू,अहवाल सदर करू ,कमिटी स्थापन करू यातच अडकलेले आहे .हो किंवा नाही मधे यांचे उत्तर नसतेच कधी .मुंबई तिल झोपडया किती दिवस वाढवत राहणार ?अजुन किती दिवस त्या अधिकृत  करत राहणार? झोपड्याच होऊ नयेत याच्यासाठी काही उपाययोजना आहेत का?
शेतकरयाना कर्ज झाले की कर्जमाफी द्यायची (प्रत्यक्षात किती फायदा झाला काय माहित? की सगल्या आमदार ,खासदार ,मंत्री यांनीच पैसे खाल्ले?) पण इतक्या सगल्या आत्महत्या होईपर्यंत सरकार झोपले  होते का?
शेतकरी इतका कर्जबाजारी होऊ नये म्हणुन काय उपाययोजना केल्या ?नुसती कर्जमाफी देऊन काय होणार आहे?
इथे पावसाल्यत बाहेर वीज कडकडली  की घरात वीज गायब . लोकसंख्या वाढली म्हणुन  नुसते रस्ते रुंद करून काय उपयोग आहे? आज एका शहराची १० लाख एवढी आहे म्हणुन रास्ता रुंदीकरण केले पण उदया
शहराची लोकसंख्या २० लाख ज़ल्यावर काय करणार काय घरे तोडून तिथे रस्ता बांधणार का?  या येणार्या लोंध्यन्ना कधे थाम्बवनर? आता नीवडणुका  आल्या की यांना शिवाजी महाराजांची आठवां होतेय जय राज्यात शेतकरी सुखी नाही ,शालेची फी  भरायला  ३०० रुपये   नाही म्हणून एक मुलगी आत्महत्या करते  ,कालच नक्षल्वाद्यानी  १७ पोलिसांना मारले आशा परिस्थितीत अरबी समुद्रात करोडो रुपये खर्चा करून शिवाजी महाराजांचे स्मारक बंधावे ? स्मारक बांधायला विरोध नाही पण खुद्द महाराजनिच सांगितले की आधे रयतेची काळजी घ्यावी मग सगळा पण इथे रयतेचीच काय अवस्था आहे?बाकीच्या देशात वीज गेली की बातमी होते पण इथे वीज आली की बातमी ,इस्राइल ने वाळवांतात शेत करून दाखवली आपले काय?बोला आपले काय?  

5 टिप्‍पणियां: