शनिवार, 12 जून 2010

शिवसेनेला आत्मपरीक्षणाची गरज - राज

शिवसेनेला आत्मपरीक्षणाची गरज - राज
सकाळ वृत्तसेवा
Saturday, June 12, 2010 AT 12:00 AM (IST)
 
मुंबई - ''विधान परिषदेच्या निकालावरुन शिवसेनेने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मनसेच्या चार आमदारांच्या निलंबन रद्द करणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मी कोणत्याही पक्षाला बांधिल नसून, माझा स्वतंत्र पक्ष आहे. माझ्या मनात असेल त्याला मी मदत करेल,'' असे राज ठाकरे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत सांगितले.

विधान परिषद निवडणुकीत झालेल्या निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा पराभवझाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकाहोत असताना आज राज ठाकरे यांनी शिवसेनेवर तोफ डागली.

विधान परिषद निवडणुकीत मनसेच्या आमदारांनी आघाडीच्या उमेदवारांना मतदान केल्याने 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. या टीकेचा समाचार घेत राज ठाकरे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. ते म्हणाले, ''आमचा स्वतंत्र पक्ष आहे. आम्हाला जे करायचे आहे ते महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी करायचे आहे. या निवडणुकीत शिवसेनेची मते फुटली त्याला आम्ही काय करणार. प्रत्येकवेळी हरले की कोणावरही टीका करतात. विधानसभा निवडणुकांवेळी मराठी माणसावर टिका केली. त्यामुळे शिवसेनेने स्वतःची सुधारणा करावी दुसऱयावर टीका करु नये. शिवसेनेकडून राज्यसभेवर पाठविण्यात आलेले नेते तपासून पहावेत. ते उमेदवार सामाजिक कार्यकर्ते होते का? हेही पहावे. 

या निवडणुकीत शिवसेनेकडून मनसेवर पैसे घेतल्याचा आरोप करण्यात येत आहेत. यावर बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेनेला पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीशी सत्तेत राहिले तेव्हा किती पैशाच्या थैल्या घेतल्या? असा प्रश्न विचारला. ''स्वतः सगळ्या गोष्टी करायच्या आणि दुसऱ्याला नावे ठेवायची ही शिवसेनेची जुनी सवय असल्याचे, त्यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें