सोमवार, 30 अगस्त 2010

`राज्य "मनसे'च्या इशाऱ्यावर चालत नाही`

`राज्य "मनसे'च्या इशाऱ्यावर चालत नाही`
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 31, 2010 AT 12:15 AM (IST)


मुंबई -   राज्य "मनसे'च्या इशाऱ्यावर चालत नाही तर इथे कायद्याचे राज्य आहे. कोणी कायदा मोडण्याचा प्रयत्न केला तर, त्याच्यावर कडक कारवाई करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज "मनसे'ला ठणकावले. "मनसे'च्या मराठीच्या आंदोलनावर प्रसिद्धिमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते.

शिवसेना आणि मनसे यांची मराठीच्या मुद्द्यावर श्रेयासाठी चढाओढ निर्माण झाली आहे. मराठीच्या मुद्द्यावर मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मल्टिप्लेक्‍समध्ये मराठी सिनेमा प्राइम टाइमला लावण्याच्या मुद्द्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातील इशाऱ्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्‍समध्ये "खळ्ळ खटॅक' केले. गणेशोत्सवातही प्रामुख्याने मराठी गाणी लावली जावीत यासाठीही सध्या आग्रह धरला जात आहे. याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी राज्य "मनसे' चालवीत नाही. कायद्याचे राज्य आहे, असे सांगत मनसेच्या इशाऱ्यांबाबत कायदेशीर माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें