सोमवार, 23 अगस्त 2010

राज-उद्धव एकत्रीकरणासाठी मूक मोर्चा काढणार

राज-उद्धव एकत्रीकरणासाठी मूक मोर्चा काढणार
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, August 24, 2010 AT 12:30 AM (IST)
गोविंद येतयेकर - सकाळ वृत्तसेवामुंबई - मराठी अस्मितेचा लढा आपापल्या झेंड्याखाली स्वतंत्रपणे लढणारे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता एकाच झेंड्याखाली एकत्र येऊन एकजुटीने व ताकदीने उभे राहावे, यासाठी "ठाकरे जोडो अभियाना'मार्फत आता थेट "मातोश्री' व "कृष्णकुंज'च्या दारी मराठी जनांचा मूक मोर्चा नेण्यात येणार आहे.

उद्धव व राज ठाकरे यांनी एकत्र यावे, या एकाच ध्यासापोटी "माझी चळवळ मी महाराष्ट्राचा' या माध्यमातून वरळी येथील काही ज्येष्ठ शिवसैनिकांनी एकत्र येऊन 16 मे रोजी या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. या चळवळीचा पुढील अध्याय सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यात आता या चळवळीतील ज्येष्ठ शिवसैनिक थेट कृष्णकुंज व मातोश्री निवासस्थानी दाद मागणार आहेत.

येत्या 5 सप्टेंबर रोजी या चळवळीचे प्रणेते हजारो मराठी माणसांच्या साक्षीने शिवाजी पार्क येथील मॉंसाहेब स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोहिमेस प्रारंभ करणार आहेत. शिवाजी पार्क येथून निघालेला हा मराठीजनसमूह राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचेल. हा मोर्चा मूक असेल. यामध्ये कुठलाही झेंडा, बॅनर वा घोषणा नसतील. फक्त शिवसेनाप्रमुख यांच्या बाजूला बसलेले राज व उद्धव यांचे ऐतिहासिक छायाचित्र असलेले होर्डिंग या मोर्चात फडकविण्यात येईल.

कृष्णकुंज निवासस्थानी राज ठाकरे यांनी आमचे म्हणजेच मराठी माणसांच्या मतांचे लेखी निवेदन स्वीकारावे, हीच आमची अपेक्षा आहे. त्यानंतर आमचा मूक मोर्चा मातोश्री निवासस्थानी जाणार आहे. मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनीही या मोर्चाशी संवाद साधावा, एवढीच आमची अपेक्षा आहे, असे चळवळीचे संस्थापक सतीश वळंजू यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें