शनिवार, 2 अक्तूबर 2010

राजकीय बंडखोरी जिवंतपणाचे लक्षण

राजकीय बंडखोरी जिवंतपणाचे लक्षण
सकाळ वृत्तसेवा
Sunday, October 03, 2010 AT 12:30 AM (IST)

डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी मनसेतर्फे घेण्यात आलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मनसे सगळ्यांनाच उमेदवारी देऊ शकत नसली, तरी मनसेत बंडखोरी हा विषय नाही; तरीदेखील प्रत्येक राजकीय पक्षातील बंडखोरी ही त्या-त्या पक्षाच्या जिवंतपणाचे लक्षण असल्याचे मत मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी आज येथे व्यक्त केले.

मनसेतर्फे डोंबिवलीत गेल्या दोन दिवसांपासून सर्वेश सभागृहात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम सुरू होता. आज त्याची सांगता झाली. या वेळी नांदगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी मनसेचे आमदार नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, रमेश पाटील, प्रकाश भोईर, मनोज चव्हाण, शालिनी ठाकरे, शहर अध्यक्ष राजेश कदम आदी उपस्थित होते.

मनसेने दोन दिवसांपूर्वी कल्याणच्या सर्वोदय पार्कमध्ये कल्याण पूर्व- पश्‍चिमेतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर काल आणि आज डोंबिवली पूर्व-पश्‍चिमेतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. आमदार सरदेसाई यांनी सांगितले, की प्रत्येक प्रभागात चार ते नऊ उमेदवार इच्छुक असून, महापालिकेच्या 107 प्रभागांतून 600 पेक्षा जास्त उमेदवार इच्छुक आहेत. उच्चशिक्षित तरुण आणि महिला उमेदवारांचाही प्रतिसाद मोठा आहे. इच्छुक उमेदवारांमध्ये गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे उमेदवार नाहीत. मनसेतर्फे आंदोलने करताना गुन्हे दाखल झालेले उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे सुकाणू समितीलाही योग्य उमेदवाराची निवड करणे कठीण जाणार आहे. मुलाखतीचा सविस्तर अहवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सादर केला जाईल. लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असे ते म्हणाले.

107 जागा लढविणार
सत्ताधारी शिवसेना- भाजप युतीकडून विकासाच्या बाबतीत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. हाच मनसेच्या प्रचाराचा मुद्दा राहणार आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे प्रचारात अग्रभागी राहणार आहेत. 107 जागा लढविण्याचा मनसेचा मानस आहे. सगळ्या जागांसाठी मनसेकडे उमेदवार आहेत, असे आमदार नांदगावकर यांनी स्पष्ट केले
follow  राज ठाकरे - एक वादळ

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें