बुधवार, 27 अक्तूबर 2010

तोच तो विषय बोलण्यात रस नाही - राज

तोच तो विषय बोलण्यात रस नाही - राज
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, October 27, 2010 AT 05:44 PM (IST)

मुंबई - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रचारात मी बाळासाहेबांबाबत अवघी १५ मिनिटे बोललो आणि इतर भाषण कल्याण डोंबिवलीतील समस्यांविषयी केले. मात्र, काही माध्यमांनी ठाकरे विरुद्ध ठाकरे हे चित्र रंगविले. त्यामुळे मला पुन्हा त्याच विषयाची चर्चा करण्यात काही रस नसून, कल्याण डोंबिवलीत वाढलेल्या अराजकतेविषयी पाऊल उचलायचे असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (बुधवार) आपल्या पक्षाचा 'वचकनामा' प्रसिद्ध करताना सांगितले.

कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी ३१ ऑक्टोबरला मतदान होत असून, प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करीत आहे. राज ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाचा वचकनामा जाहीर करताना, बाळासाहेबांच्या अंगाखांद्यांवर आपण खेळलो असल्याचे मान्य करीत बाळासाहेबांबद्दल आदर असल्याचे सांगितले. त्यामुळे तोच विषय पुन्हा बोलून काही मिळणार नाही. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला अशी म्हणणारी शिवसेना पुन्हा मत मागायला मराठी माणसाकडे कशाला आली, असा प्रश्नही त्यांनी त्यांनी केला.

कल्याण डोंबिवलीकरांनी पूर्ण सत्ता माझ्या हातात दिली तर या ठिकाणी मी स्वतः थांबून कामे कशी केली जातात हे दाखवून देईन. काही चुकलं तर मला जबाबदार धरा असेही राज यांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें