शुक्रवार, 29 अक्तूबर 2010

अभद्र युतीला घालवा - राज ठाकरे

अभद्र युतीला घालवा - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Saturday, October 30, 2010 AT 12:15 AM (IST)
 

कल्याण - कल्याण व डोंबिवली शहरांना शिवसेना-भाजप युतीने बकाल केले. त्यामुळे या अभद्र युतीला सत्तेवरून खाली खेचा आणि मनसेच्या हाती पूर्ण बहुमतात सत्ता द्या आणि शहरांच्या विकासाबाबत निश्‍चिंत राहा, असे आवाहन राज ठाकरे यांनी सुभाष मैदानात झालेल्या प्रचारसभेत मतदारांना केले. या वेळी

कल्याण-डोंबिवलीत सात दिवस मुक्काम आहे, हे नाटक नसून ती सत्ता आल्यानंतरची "प्रॅक्‍टिस' आहे, असे राज म्हणाले. वाहतूक कोंडी, उखडलेले रस्ते, उघडी गटारे आणि सर्वत्र भटकणारी कुत्री, कचऱ्याचे साचलेले ढीग याने नागरिक त्रस्त आहेत. 1995 पासून शिवसेना सत्तेत आहे. त्या वेळी राज्यात युतीचेच सरकार होते तेव्हा या शहरांचा विकास का नाही केला, असा सवाल त्यांनी केला.

पालिका सत्ताधाऱ्यांनी टक्केवारी मिळवली. कंत्राटदारांचे लाड केले. सर्वांनीच आपले उखळ पांढरे केले. ते नागरिकांचे काय कल्याण करणार, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

सध्या राज्यात विरोधी पक्ष शिल्लक आहेच कुठे, स्वार्थासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले आहेत आणि नागरिकांची फसवणूक करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

राज्यात आघाडीची सत्ता असताना कल्याण-डोंबिवलीत विजेचे भारनियमन का, असा सवाल मुख्यमंत्र्यांना करतानाच पालिकेची सत्ता हाती मागणाऱ्या आघाडी नेत्यांची कथनी आणि करणी भलतीच आहे, अशा शब्दांत टीका केली

या वेळी मुख्यमंत्र्यांच्या "छप्पर फाडके' आश्‍वासनांचा खरपूस समाचार घेतला.

"एमएमआरडीए' आणि राज्य सरकार निधी देत नाही, असे युतीवाले म्हणत आहेत. याच "एमएमआरडीए'च्या अधिकृत सदस्यांत शिवसेनेचे महापौर व अन्य सदस्य आहेत. मग त्यांना निधी का आणता आला नाही. विकासासाठी इच्छा लागते. तीच यांच्याकडे नाही. मनसेकडे पूर्ण सत्ता द्या. कल्याण-डोंबिवलीचा चेहरामोहरा बदलतो, असे आवाहन शेवटी त्यांनी मतदारांना केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें