गुरुवार, 28 अक्तूबर 2010

स्वत:ला काय शिवाजी समजतोस काय?

स्वत:ला काय शिवाजी समजतोस काय?
-
Friday, October 29, 2010 AT 12:17 AM (IST)

डोंबिवली - 'हा खंडू खोपडे, तो सूर्याजी पिसाळ; मग हा कोण शिवाजी का,'' अशी बोचरी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आज येथे केली.

डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील अप्पा दातार चौकात सायंकाळी मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. काल कल्याणमध्ये झालेल्या प्रचारसभेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याला राज ठाकरे यांनी या सभेतून प्रत्युत्तर दिले.

कसाबला फाशी का दिली जात नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत उपस्थित केला होता. त्यावर कसाबच्या फाशीचा कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांशी काय संबंध, असा सवाल राज यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत अफझलखानाचा शिवाजी महाराजांनी कसा कोथळा बाहेर काढला याविषयी वक्तव्य केले होते. त्याची, सत्तेवर असताना कल्याण-डोंबिवलीकरांचा कोथळा बाहेर काढला त्याचे काय, असे विचारून राज यांनी खिल्ली उडविली आहे. आपणास अंतर्गत वाद वाढवायचे नाहीत, असेही त्यांनी भाषणाच्या ओघात सांगितले.

या वेळी राज यांनी भाजपचाही समाचार घेतला. युतीच्या अंगाशी येते तेव्हा ते प्रशासनाला दोष देतात. टेंडरमध्ये पैसे खाताना प्रशासन आड येत नाही. टेंडर कशी पास होतात, असे विचारून राज म्हणाले, की सर्व बाजूने शहरे पोखरून काढणाऱ्या या लोकांना जरासुद्धा लाज वाटत नाही? माझ्या हाती सत्ता द्या. येथील समस्या दूर केल्या नाहीत, तर मी पुन्हा तोंड दाखवायलासुद्धा कल्याण-डोंबिवलीत पाय ठेवणार नाही, असेही ते म्हणाले. या वेळी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरही त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाष्य केले.

अपक्षांना थारा देऊ नका, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें