सोमवार, 25 अक्तूबर 2010

मी कॉपी करत नाही

मी कॉपी करत नाही
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, October 26, 2010 AT 12:15 AM (IST)
 

डोंबिवली - 'मी काहीही बोललो तर माझी कॉपी करतो, अशी टीका माझ्यावर केली जात आहे. कारण माझ्यावर लहानपणापासून बाळासाहेबांचेच संस्कार आहेत. त्यांच्यासारखा वागणार-बोलणार नाही तर मग काय करणार,' अशी कबुली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे दिली. "माझी कॉपी करतो' या बाळासाहेबांच्या टीकेला राज ठाकरे यांनी आदरपूर्वक प्रत्युत्तर दिले आहे. मी आजही त्यांना मानतो, कालही मानत होतो. यापुढेही मानेन. इतरांनी लुडबूड करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला आहे.

डोंबिवली पश्‍चिमेतील भागशाळा मैदानात कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी आज सायंकाळी झालेल्या प्रचारसभेत राज बोलत होते. या वेळी नाट्य अभिनेते भरत जाधव, मनसेचे आमदार रमेश पाटील, रमेश वांजळे, शिशिर शिंदे, प्रकाश भोईर, प्रवीण दरेकर, शहर अध्यक्ष राजेश कदम, राहुल कामत, वैशाली दरेकर, मनोज चव्हाण, राजन गावंड, काका मांडले आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी राज यांनी सांगितले, की मी व्यंगचित्रकार झालो. माझ्या व्यंगचित्रांच्या ब्रशचा "स्ट्रोक' बाळासाहेबांसारखाच आहे. त्याविषयी यापूर्वी कोणी बोलले नाही. आचार्य अत्रे यांचे लिखाण आणि "सामना'मधील बाळासाहेबांचे अग्रलेख यात साम्य दिसून येईल. म्हणजे बाळासाहेबांनी अत्रेंची कॉपी केली, असे म्हणायचे? असे दाखले राज यांनी दिले. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा कार्याध्यक्ष मी केला, असे बाळासाहेब सांगतात. मला साधा शाखाप्रमुख नेमण्याचा अधिकार नव्हता; मात्र बाळासाहेब असे म्हणत असतील तर त्यांना माझा एकच सवाल आहे, की मी घेतलेला निर्णय अयोग्य होता तर तो माणूस तिथेच कसा ? आणि मी योग्य होतो तर माझे निर्णय चुकीचे कसे, असा सवाल उपस्थित करत राज म्हणाले, की शिवसेनेत आता जी जुनी माणसे आहेत ती सर्व खोबरे नसलेल्या करवंट्या आणि शेंदूर फासलेले वरवंटे आहेत.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलेवर बलात्कार केला, असा प्रचार निवडणुकीत करणाऱ्यांना माझा सवाल आहे, की हे पक्षाचे धोरण नाही. कल्याण-डोंबिवलीवर गेली 15 वर्षे शिवसेना-भाजप युतीने बलात्कार केला आहे. त्याची त्यांना शरम वाटत नाही. काल आघाडीच्या प्रचारसभेत मते द्याल तर ???"छप्पर फाड के मते देऊ,'??? असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शरम वाटत नाही? सत्ता दिली तर निधी नाही, माणसे तडफडून मेली तरी त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, हे कोणते राज्यकर्ते आहेत? असाही सवाल त्यांनी केला. आघाडीची प्रचारसभा म्हणजे दहातोंडी रावणाचा अवतार असल्याची टीका केली.

या वेळी अमरसिंगांवर सडकून टीका करताना राज म्हणाले, की सगळ्यांनी नाकारल्यावर बेडूक असलेल्या अमरसिंगला शहाणपण आले आहे. मराठींचा मुद्दा उपस्थित करून मनसेने रान उठविले.

आता निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधींच्या बिहारी पुळक्‍याला प्रत्युत्तर देणारे स्वाक्षरीची मोहीम करीत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर राज ठाकरे यांनी केली. तेव्हा कुठे होती शिवसेना आणि उद्धव ठाकरेही कुठे गेले होते, असा सवाल उपस्थित केला.?????

मनसेच्या हाती सत्ता देणार असाल तर पूर्ण सत्ता द्या. कोणाच्या हनुवटीला हात लावण्याची वेळ आणू नका. सत्ताधारी युतीला सत्तेबाहेर फेकून द्या. संधी वारंवार येत नसते. गेली पंधरा वर्षे चांगला पर्याय नव्हता. आता मनसे पर्याय आहे. मी उभा आहे. माझा प्रत्येक उमेदवार हा राज ठाकरे आहे, असे समजून मतदान करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी या वेळी केले. पक्षाचा "वचकनामा' येत्या 27 तारखेला प्रसिद्ध करणार आहे. त्यात भरमसाठ आश्‍वासनांचा भरणा नसून काही दहाएक मुद्देच आहेत, याकडेही राज ठाकरे यानी लक्ष वेधले. सभेला खच्चून गर्दी होती. कान्होजी जेधे मैदान पूर्ण भरले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें