मंगलवार, 2 नवंबर 2010

आघाडी आणि युतीला "राज' नको

आघाडी आणि युतीला "राज' नको
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, November 03, 2010 AT 12:48 AM (IST)
 
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत 27 जागा जिंकणारी मनसे "किंगमेकर' ठरली असली तरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधी बाकावर बसण्याचे जाहीर करीत चुकीची सत्ता नको, असे स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, शिवसेना-मनसेत उभा वाद असल्याने त्यांच्यातही सत्तेसाठी सूत जुळणार नाही, अशी राजकीय परिस्थिती आघाडीच्या वक्तव्याने निर्माण झाली आहे. परिणामी, युती आणि मनसे दोन्ही पक्षांसमोर पेच निर्माण झाला असून महापालिकेत सत्ता कोणाची येणार, याचीच चर्चा रगंली आहे.

महापालिका निवडणुकीत मनसेने युतीतील भाजपचा धुव्वा उडविला आहे. भाजपच्या मते, त्यांना खरी हानी पोहोचली आहे ती शिवसेनेच्या अपक्ष बंडखोरांमुळे. अवघ्या नऊ जागांवर भाजपला विजय मिळविता आला आहे. "ठाकरे विरुद्ध ठाकरे' असा प्रचाराचा सामना रंगल्याने उद्धव आणि राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कल्याण-डोंबिवलीतील जनतेने मात्र दोन्ही ठाकरेंना स्वीकारले असून भाऊबंदकीतील वाद संपुष्टात यावा, अशी त्यांची भावना असल्याचे दोघांना मिळालेला कौल पाहता स्पष्ट होते. दोघांनी एकत्रित येऊन मराठी माणसाचे "कल्याण' करावे, असे मतपेटीतून त्यांनी सूचित केले आहे.

शिवसेना-मनसे सत्तेसाठी एकत्रित येणार नाही. दोघांच्या एकत्रित येण्यामुळे दोन्ही पक्षांतील निष्ठावंत कार्यकर्ता दुखावला जाण्याची दाट शक्‍यता आहे. मनसे किंगमेकर झाल्याचे कळताच दिल्लीहून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी कॉंग्रेस विरोधी बाकावर बसेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार असून सत्तास्थापनेत तटस्थ भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आघाडीतील दोन्ही पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनी जनतेने दिलेला कौल मान्य करीत त्यांना मनसेराज नको असल्याचे स्पष्ट केले आहे. मनसेच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेसाठी लागणारा आकडा सहज गाठता येतो; परंतु अपक्षांची मदत घेऊनही हा आकडा गाठणे आघाडीला आणि युतीला शक्‍य नाही.

अपक्षांच्या कलाबाबत संभ्रम
दरवेळेस सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत अपक्ष निर्णायक भूमिका बजावतात. यंदाच्या निवडणुकीत 11 अपक्ष निवडून आले आहेत. बाळ हरदास, मोहन उगले व सरोज भोईर यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करीत निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. त्यांना पुन्हा शिवसेनेकडे वळविण्याचे कसब शिवसेना नेत्यांना करावे लागणार आहे. हरदास यांनी आपली निष्ठा राष्ट्रवादीकडे असल्याचे बोलून दाखवले आहे. अपक्ष शिवसेनेकडे वळतात का, याविषयी सुस्पष्टता नाही. श्रेयस समेळ, उषा वाळंज व विक्रम तरे यांचा पाठिंबा आपल्यालाच राहणार असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात असला तरी या तिघांनी त्यांचा कल अद्याप स्पष्ट केलेला नाही. उर्वरित संजय पावशे आणि महेंद्र गायकवाड हे कोणाला पाठिंबा देतात, याविषयीही साशंकता आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें