शनिवार, 15 जनवरी 2011

विकास करणाऱ्यांनाच राज्यामध्ये संधी मिळते

'विकास करणाऱ्यांनाच राज्यामध्ये संधी मिळते'
-
Saturday, January 15, 2011 AT 12:00 AM (IST)

मुंबई - संधी केवळ विकास करणाऱ्यांना मिळते, रमेश किणीसारख्या माणसांना मार्गातून काढून टाकणाऱ्यांना नाही, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार विनायक मेटे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला. राज यांनी औरंगाबादच्या सभेत "मौका सभी को मिलता है' असे वक्तव्य करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना दिलेल्या इशाऱ्याला मेटे यांनी उत्तर दिले.

"राष्ट्रवादी भवन'मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मेटे म्हणाले की, राज यांची टीका किळसवाणी, संस्कृती धुळीस मिळविणारी होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर त्यांनी अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली. राज्याची परंपरा, संस्कृती धुळीस मिळविली. या टीकेमुळे कार्यकर्ते संतापले आहेत.

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हल्ल्याशी आपला काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरणही मेटे यांनी दिले. मात्र, हा हल्ला व पक्षाने मेटेंना उपाध्यक्ष पदावरून कमी केल्याची घटना, सत्ताधाऱ्यांनी आधी मनसेबाबत घेतलेली "संयमी' भूमिका, मराठा आरक्षण समितीतून मेटे यांना वगळणे आदी विषयांवरून पत्रकारांनी मेटे यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. त्यामुळे मेटे गोंधळून गेले. केवळ राज यांच्या विषयावरच बोलेन, असे सांगत बाकीच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्याचे टाळत त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत, आदित्य ठाकरे यांच्याकडून धुव्वा उडाल्याने नैराश्‍य आलेल्या राज यांनी चर्चेत राहण्यासाठी बेताल बडबड केल्याची टीकाही मेटे यांनी केली. तसेच, आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याबद्दल राज यांना फारसे प्रेम नाही. जाधव यांना पाच जानेवारीला मारहाण झाली; पण राज नऊ जानेवारी रोजी त्यांना पाहायला गेले, याकडे त्यांनी लक्ष वेधले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें