बुधवार, 23 मार्च 2011

पुणे हे मुंबईचे डंपिंग ग्राउंड - राज ठाकरे

पुणे हे मुंबईचे डंपिंग ग्राउंड - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Thursday, March 24, 2011 AT 12:15 AM (IST)
 

पुणे - "परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे मुंबईची वाट लागली. मुंबईची ही अवस्था होण्यासाठी काळ लागला; परंतु आता पुणे, ठाणे आणि नाशिक ही शहरे मुंबईची डंपिंग ग्राउंड झाली आहेत,'' असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दिला. "पाच वर्षे माझ्या हाती सत्ता द्या आणि मगच पाहा,' असे आवाहन त्यांनी केले.

राज ठाकरे यांनी आज महापालिकेत आयुक्त महेश झगडे यांची भेट घेऊन शहराच्या प्रश्‍नासंदर्भात चर्चा केली. या वेळी पाणीपुरवठ्यापासून ते बीआरटीपर्यंतच्या मागण्यांचे लेखी निवेदन आयुक्तांकडे दिले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुणे शहराच्या प्रश्‍नांसंदर्भात मी यापूर्वीही अनेकदा बोललो आहे. या शहरात सुधारणा झाली पाहिजे, असे सांगून ठाकरे म्हणाले, ""जगभरातील शहरे पाहता मनात निराशा येते. हे आपल्याकडे का होऊ शकत नाही. आपल्या राज्यातील शहरांनी काय घोडे मारले आहे. त्यांची प्रगती होऊ शकत नाही. आपल्या राज्यातील शहरांमध्ये प्ररप्रांतीयांचे लोंढे मोठ्या प्रमाणावर येत आहेत. जागा मिळेल तेथे झोपडपट्ट्या उभ्या राहत आहेत. मुंबईची क्षमता संपली, जागा नाही म्हणून आता पुणे, ठाणे, नाशिक शहरे ही मुंबईची डंपिंग ग्राउंड होऊ लागली आहेत. त्याचा ताण या शहरांवर येऊन बकालपणा वाढू लागला आहे. हे लक्षात येऊनही अपेक्षित नियोजन होत नाही.'' महापालिकेने द्यावयाच्या सुविधा बांधकाम व्यावसायिक देऊ लागले आहेत. सर्वच गोष्टींचे खासगीकरण होत चालले आहे. तसेच होणार असेल, तर सरकारची गरज काय, असा सवालही त्यांनी केला.

बीआरटीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, "अशा पद्धतीने नियोजन होणार असेल, त्यांच्याकडे कोणीच लक्ष देणार नसेल, तर शहराचा बकालपणा हाताबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. वाहतुकीबाबत परदेशात कडक नियम आहेत. परंतु, परदेशातील मोटार कंपन्यांचे गाड्यांचे डंपिंग आपली शहरे होत आहे. त्यातूनच सार्वजनिक वाहतूक सक्षम होऊ न देण्यासाठी या कंपन्यांकडून प्रयत्न केले जातात. पाण्याची हीच परिस्थिती आहे. बेचिराख झालेले देश उभे राहू शकतात, तर आपल्या शहरांचा विकास का होऊ शकत नाही.''

तुमच्याकडेही टग्या आहे....
"महाराष्ट्राच्या शेजारील गुजरातचा विकास होत आहे. कारण, तेथे महत्त्वाकांक्षी नेतृत्व आहे,'' असे राज ठाकरे म्हणाले. पुण्याबद्दल बोलताना त्यांनी, "तुमच्याकडेही टग्या आहे. आताच विकास करून घ्या. नंतर होणार नाही,' अशी टिप्पणी केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें