सोमवार, 19 सितंबर 2011

'जनावरांचे फोटो काढण्यापेक्षा खड्ड्यांचे काढा'

'जनावरांचे फोटो काढण्यापेक्षा खड्ड्यांचे काढा' सकाळ वृत्तसेवा Tuesday, September 20, 2011 AT 01:00 AM (IST) मुंबई - अन्य राज्यांत जाऊन जनावरांचे फोटो काढण्यापेक्षा मुंबईत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे फोटो काढले असते, तर आपण किती "माती' केली ते कळले असते. फोटोग्राफीची हौस फिटली असती आणि जनतेचेही भले झाले असते, असा सणसणीत टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मुंबईतील रस्त्यांच्या स्थितीवरून लगावला. राज यांनी उद्धव यांचे थेट नाव घेतले नसले तरी मुंबई महापालिकेतील आगामी आरोप प्रत्यारोपांची धुळवड यानिमित्ताने सुरू झाली, असे मानले जाते. राज ठाकरे यांनी गुजरातमध्ये जाऊन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. त्यानंतर आज सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अन्य राज्यात जाऊन महाराष्ट्रावर टीका करणाऱ्यांचा शिवसेनेच्या मुखपत्रात आज समाचार घेण्यात आला होता. त्याबाबत विचारणा केली असता, राज्यावर कोणीही टीका करत नसून नाकर्त्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. महाराष्ट्राची बदनामी कोणी करू शकत नाही. त्याची बलस्थानेही कोणी नाकारू शकत नाही, असे राज यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर तसेच अडवानी यांनी मोदी भावी पंतप्रधान म्हणून योग्य असल्याचे सांगितल्यावर आपल्याला बरे वाटले. राज्याचा विकास करणारा माणूस पंतप्रधान झाल्यास देशासाठी ती चांगलीच गोष्ट आहे. अमेरिकेनेही त्यांना प्रमाणपत्र दिले आहे. ही भाजपची अंतर्गत बाब असली, तरी विकासाच्या मुद्द्यावर मोदींना पंतप्रधान झालेले पाहण्यास आपल्याला निश्‍चित आवडेल, असे राज यांनी सांगितले. गुजरातमध्ये 24 तास वीज आहे. संपन्न महाराष्ट्राची येथील सत्ताधाऱ्यांनी वाट लावली आहे. राज्यातील भारनियमन, आत्महत्या, रस्त्यांवरील खड्डे, नागरिकांच्या विरोधातील कंत्राटे या मुद्द्यांवर बोलायचे नाही, तर कशावर बोलायचे, असा प्रश्‍न त्यांनी केला. आम्ही राज्यावर टीका करीत नसून येथील राज्यकर्त्यांबद्दल बोलतोय. चांगले काम करणाऱ्या राज्याबद्दल बोलायचे नाही तर काय करायचे. बाळासाहेब 1982 मध्ये अमेरिकेत जाऊन आल्यावर तेथील विकासकामांचीही त्यांनी स्तुती केली होती. गुजरातमधील महापालिका नफ्यात आहेत. आमच्या मात्र संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. 72 टक्के खर्च वेतनावर होतोय. उरलेले उत्पन्न खाबुगिरीमध्ये जातेय. माझा कोणत्याही राज्यावर रोष नाही. उद्या बिहारने बोलावले, नितीशकुमारांचे आमंत्रण आले, तर तिकडेही जाईन. नितीशकुमार काम करतात, ही चांगली बाब आहे. परप्रांतीय भूमिपुत्रांना आणि त्यांच्या भाषेला नाकारतात. त्यामुळे मी त्यांना विरोध करतो. अण्णांना मी दूरध्वनीवरून पाठिंबा दिला होता; पण त्यांच्या बाजूला असलेल्या बेदी आदी चौकडीला भेदून जाण्यासाठी मी काही अभिमन्यू नाही; मात्र अण्णांची भेट लवकरच घेणार असल्याचे राज यांनी सांगितले. भाजपला लाथा खाण्याची सवय नरेंद्र मोदींच्या मैत्रीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या आपण जवळ जात आहात का, असा प्रश्‍न राज यांना विचारण्यात आला. त्या वेळी आपण कोणाबरोबरही जाण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे ते म्हणाले. भाजपला एवढी वर्षे शिवसेनेच्या लाथा खाण्याची सवय लागली असल्याची कडवट टीकाही राज यांनी या वेळी केली

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें