शनिवार, 19 नवंबर 2011

उमेदवारीसाठी परीक्षा द्यावी लागणार - राज

उमेदवारीसाठी परीक्षा द्यावी लागणार - राज
सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 19, 2011 AT 04:02 PM (IST)
ठाणे - येत्या काळात राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कोणताच उमेदवार निश्चित नाही. निवडणुकीसाठी इच्छूक असलेल्या प्रत्येक उमेदवाराला लेखी परीक्षा द्यावी लागणार असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) सांगितले.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिका-यांचा मेळावा षण्णमुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, महापालिका आणि विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रत्येकाला लेखी परीक्षा द्यावीच लागणार आहे. मला सुद्धा विधानसभेची निवडणूक लढवायची असेल तर परीक्षा द्यावी लागेल. येत्या ४ डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकांसाठी राज्यात विविध ठिकाणी एकाचवेळी ही लेखी परीक्षा घेण्यात येईल. निवडणुकीसाठी कोणचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी या भ्रमात राहू नये. लेखी परीक्षेत पास झालेल्या कार्यकर्त्यांच्या मुलाखती मी स्वतः घेईन आणि निवडणुकीचे तिकीट देईन, असे राज यांनी स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकांच्या उमेदवार निश्चितीसाठी राज्याच्या विविध भागात येत्या ४ डिसेंबरला सकाळी ११ ते साडे बारा या वेळात मनसे पदाधिका-यांच्या लेखी परीक्षा पार पडणार आहे. १९ ते २१ नोव्हेंबरपर्यंत परीक्षेचे फॉर्म वाटप होणार असून, २२ ते २४ नोव्हेंबरपर्यंत भरलेले अर्ज स्वीकारले जातील. अर्जासाठी १ हजार रूपयांचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक परीक्षार्थी इच्छुकाला हॉल तिकीट देण्यात येईल आणि परीक्षेत पास झाल्याशिवाय मुलाखतीला बोलावणार नाही. एखाद्या वॉर्डात एकही योग्य उमेदवार सापडला नाही तर तो वॉर्ड ऑप्शनला टाकेन. त्याठिकाणी मनसे निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा राज यांनी केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें