शुक्रवार, 13 अप्रैल 2012

अखेर बिहार दिनाचा तिढा सुटला

अखेर बिहार दिनाचा तिढा सुटला
- सकाळ वृत्तसेवा
Friday, April 13, 2012 AT 04:18 PM (IST),  
मुंबई- 15 एप्रिल रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या बिहार दिनाच्या कार्यक्रमाचा तिढा अखेर आज (शुक्रवारी) सुटला. बिहार दिनाला होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना विरोध नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र बिहार दिनाच्या व्यासपीठावरून राजकीय वक्तव्ये करण्यात येऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

बिहार दिनाचे आयोजक देवेशचंद्र ठाकूर यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले,""भारताला स्वातंत्र्य मिळून 65 वर्षे पूर्ण झाली तर बिहार दिनाची शताब्दी कशी काय साजरी करण्यात येत आहे, ते मला समजले नाही. बिहार दिनाला होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना माझा विरोध नाही. मुंबईला होणाऱ्या कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्र गीताने होणार आहे. मुंबई, दिल्ली, कोलकता अशा शहरांमध्ये बिहार दिन साजरा होणार असल्याचे मला सांगण्यात आले आहे. परंतु, बिहार दिनाच्या नावाखाली व्यासपीठावरून राजकीय वक्तव्ये सहन केली जाणार नाही. याची आयोजकांची काळजी घ्यावी.''

बिहारमधील विकासावर राज म्हणाले,""बिहारमध्ये नीतिशकुमार चांगले काम करीत आहेत. तेथे विकासाची कामे सुरू आहेत. असाच विकास सुरू राहिला तर महाराष्ट्रातील बिहारी लोकांनी आपल्या राज्यात परतायला हरकत नाही. समाजवादी पक्षाकडून महाराष्ट्रात राजकारण केले जात आहे. येथे येऊन आपली ताकद दाखविण्याची भाषा करायची, हे खपवून घेतले जाणार नाही.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें