रविवार, 2 सितंबर 2012

पाकिस्तान हे कुत्र्याचे शेपूट - राज ठाकरे

पाकिस्तान हे कुत्र्याचे शेपूट - राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Monday, September 03, 2012 AT 03:00 AM (IST)


मुंबई- "पाकिस्तान म्हणजे कुत्र्याची शेपटी आहे. कितीही वेळा नळीत घातली तरी ती सरळ होणार नाही,' असा हल्लाबोल करत "पाकिस्तान विरोधी भूमिका म्हणजे हिंदू-मुस्लिम वाद नाही,' असा खुलासा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवारी) केला.

राज म्हणाले, "भारतातील दहशतवादी कारवाया रोखण्यास पाकिस्तान पुढाकार घेत नाही. मात्र, त्यांच्या कलाकारांना पैसे कमविण्याची एकमेव जागा भारत आहे. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना रोखत नाही, तोपर्यंत पाकिस्तानवर दबाव येणार नाही; पण पाकिस्तान म्हणजे कुत्र्याचे शेपूट आहे. ते सरळ होणार नाही.''

"पाकिस्तानविरोधी भूमिका म्हणजे हिंदू-मुस्लिम वाद नाही. हा भारत विरुद्ध पाकिस्तान आणि बांगलादेश संदर्भातील वाद आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत तीन "सुपरस्टार' खान आहेत. धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन भारतीय या तिघांवर प्रेम करतात. शिवाय, कोणत्याही जाती-धर्माच्या घरगुती, सार्वजनिक कार्यक्रमात बिस्मिल्ला खान यांच्या सनईचे सूर ऐकू येतात. त्यामुळे, माझी भूमिका मुस्लिमविरोधी आहे, असा गैरअर्थ काढून राजकारण करू नये,' असा टोला राज यांनी लगावला.

बिहारी नेते आणि माध्यमांना राज यांचा इशारा
"राज ठाकरेंवर देशद्रोही खटला भरा,' अशी मागणी करणाऱ्या बिहारी नेते आणि हिंदी माध्यमांचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला. "महाराष्ट्रात गुन्हे करणारे बिहारमध्येच कसा पळ काढतात. "अमर जवान स्मारका'ची मोडतोड करणाऱ्या युवकाला बिहारमध्येच कसा आश्रय मिळतो,' असा सवाल राज यांनी केला. ते म्हणाले, ""आम्ही बोललो की त्यावर हिंदी चॅनेल्स आणि बिहारी नेते राष्ट्रीयत्त्वाच्या गप्पा मारत आमच्यावर टीकेची झोड उठवतात. "राज ठाकरे देशद्रोही आहेत', अशी गरळ ओकत देशाचे राजकारण तापवतात. स्वत:च्या वाहिनीचा "टीआरपी' वाढावा, म्हणून त्यावर चर्चा घडवून आणतात.'' यापुढे अशा प्रकारची टीका थांबवा. मी मराठीत काय बोलतो ते समजून घ्या. त्यामागची भूमिका जाणून घ्या, माझा पारा चढवू नका. नाहीतर महाराष्ट्रातल्या सर्व हिंदी चॅनेलवाल्यांचा खेळ थांबेल.''

राज म्हणाले...
- राज्याचे पोलिस आयुक्‍त बिहारचे पत्र आल्याचे सांगत असताना गृहमंत्री आर. आर. पाटील मात्र पत्र आले नाही, असे जाहीर करतात. गृहविभागात काय सुरू आहे, हे आबांना कळतच नाही. त्यांना कोणी सांगतही नाही.
- आमच्या कुटुंबांचे मूळ बिहारमध्ये असेल तर दिग्विजयसिंह यांचा जन्म काय सुलभ शौचालयात झाला काय? वाट्‌टेल तसे बोलणारे दिग्विजय म्हणजे कॉंग्रेसने शिव्या खाण्यासाठी पाळलेलं कार्टं आहे.
- "रोखठोक बोलणे ही आशाताईंची ओळख आहे. त्यांना राजकारण कळत नसेल; पण देशात काय सुरू आहे, हे त्यांना कळत नाही काय?



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें