रविवार, 6 जनवरी 2013

बलात्काराच्या घटनेला 'बिहारीच' जबाबदार - राज

बलात्काराच्या घटनेला 'बिहारीच' जबाबदार - राज
 

- वृत्तसंस्था
Sunday, January 06, 2013 AT 02:49 PM (IST)
मुंबई - दिल्लीत बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेला बिहारमधून दिल्लीमध्ये स्थलांतरीत झालेलेच जबाबदार असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

गोरेगाव येथे एका कार्यक्रमात शनिवारी बोलताना राज ठाकरे म्हणाले, की आपण सर्वजण दिल्लीतील बलात्काराच्या घटनेविषयी बोलत आहोत. पण, ते सर्वजण कुठले होते हे कोणीच बोलत नाही. मी जरा काही बोललो की, लगेच माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतात. पण, हे सर्व बलात्कार करणारे बिहारमधून आले आहेत तरी त्यांच्याबद्दल कोणीच काही करत नाही. माझ्यामते आपली सर्व सिस्टीम बिघडली आहे. 

राज ठाकरे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर बिहारमधील नेत्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे. जनता दल युनायटेडने राज ठाकरे यांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याचे म्हटले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें