शुक्रवार, 15 फ़रवरी 2013

कोकणवासीयांनो, जमिनी विकू नका

कोकणवासीयांनो, जमिनी विकू नका!

-
Saturday, February 16, 2013 AT 03:00 AM (IST)

खेड - 'कोकणवासीयांनी जमिनी विकू नयेत. तसे झाल्यास तुमचे अस्तित्वच संपेल. कोकणातील जमिनी स्थानिक नेते, परप्रांतीय, प्रतिष्ठितांनी खरेदी केल्या आहेत किंवा जोरजबरदस्तीने बळकावल्या आहेत. केंद्र सरकारची फेलोशिप मिळालेल्या एका पत्रकाराने लिहिलेल्या अहवालात मालवणमधील माणूस दबावाखाली असल्याचे म्हटले आहे. हा दबाव नारायण राणेंचाच आहे. तो तसा नसेल, तर त्यांनी याचा खुलासा करावा,'' असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे झालेल्या विराट सभेत दिले.

ठाकरे यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातून राज्याच्या दौऱ्याला सुरवात केली. कोकणातील पहिलीच जाहीर सभा त्यांनी आज खेडमध्ये घेतली. त्याचा संदर्भ देताना ते म्हणाले, ""कोकणातील जमिनी विकल्या जात आहेत, हे गंभीर आहे. भीती घालून कोकणात प्रकल्प आणले जात आहेत. गोपीनाथ मुंडेंनी कोकणातील एन्‍रॉन प्रकल्प समुद्रात बुडविणार असल्याचे सांगितले. नंतर तो तरंगायला कसा लागला? सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा, रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन म्हणून जाहीर झाला. त्यातील कोणतेच प्रकल्प येथे दिसत नाहीत. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी धरण बांधले जात आहे. त्यासाठी सुरुंग लावले जात आहेत. त्याचा परिणाम रायगड किल्ल्यावर होत आहे.''

मुंबई, नाशिक, पुण्याप्रमाणेच कोकणातही परप्रांतीय घुसल्याचे दाखले त्यांनी दिले. खेडमध्ये अनेक बांगलादेशीयांना झालेल्या शिक्षेचे उदाहरणही त्यांनी दिले.

नक्कल करायला अक्कल लागते नक्‍कल करून राज्य चालत नाही, असा टोला हाणणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ""नक्‍कल करायलादेखील अक्‍कल लागले. फक्‍त माझ्या हातात एकदा महाराष्ट्र द्या, मग बघा कसा चालवतो आणि हाकतो.''

'जैतापूर'ला विरोध की समर्थन? कोकणातील अनेक प्रकल्पांबरोबरच जैतापूर प्रकल्पही आणण्यात आला. इतर प्रकल्पांना विरोध करताना जैतापूर प्रकल्पाबाबत त्यांना नेमके काय म्हणायचे आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला. ते म्हणाले, ""अणुऊर्जा प्रकल्पामुळे काय होणार आहे? त्सुनामी आली तर ती कोकणात येईल असे नाही. त्सुनामी सांगून येत नाही. जगात शेकडोंनी प्रकल्प आहेत. तारापूरला आहे, मुंबईत मध्यवस्तीत चेंबूर भागात; तर भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर 1960 पासून सुरू आहे. तेथील लोकसंख्या पावणेदोन कोटी एवढी आहे. भूकंप झाला तर एकावेळी किती लोक मरतील, हे सांगणे कठीण आहे; परंतु ते सेंटर अजूनही सुरू आहे.''

परशुराम उपरकर "मनसे'त दाखल खेडमधील या सभेत शिवसेनेचे सिंधुदुर्गचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आपल्या समर्थकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. राज ठाकरे यांनी उपरकर यांच्या हातात पक्षांचा झेंडा दिला. तो झेंडा उपरकरांनी उंच फडकावून पक्षात प्रवेश करीत असल्याची घोषणा केली. उपरकर यांच्याबरोबरच सिंधुदुर्गातील अनेक शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि इतर कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें