शुक्रवार, 18 अप्रैल 2014

उद्धवसोबत चर्चा होऊ शकते - राज ठाकरे

मुंबई - उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझे कौटुंबिक मतभेद नसून राजकीय आहेत. त्यामुळे भविष्यात त्यांच्यासोबत चर्चा होऊ शकते, असे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिले. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच मी स्वतंत्र पक्ष काढला, माझ्या पक्षामुळे मराठी मतांत फूट पडत असल्याचे बाळासाहेब कधीही म्हणाले नाहीत, माझे राजकीय विरोधकच तसा सूर आळवतात. वास्तविक पाहता कॉंग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप यांनाही मराठी मते मिळत असताना मतांच्या विभागणीवर मलाच का दोष देण्यात येतो, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. काही तात्त्विक मुद्यांवर उत्तर भारतीयांच्या विरोधात मी आहे. इथल्या भूमिपुत्रांच्या पोटावर लाथ मारून त्यांच्या हक्‍कांच्या नोकऱ्या कुणी बळकावत असेल तर मी गप्प का बसू. आसाम, तसेच पश्‍चिम बंगालमध्ये उत्तर भारतीयांच्या विरोधात वातावरण असताना फक्‍त मला एकट्यालाच दोषी का धरले जाते, असा सवाल करून राज म्हणाले, की नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पाच वर्षे फक्‍त उत्तर प्रदेश, बिहार व झारखंड राज्यांचा गुजरातप्रमाणे विकास करावा म्हणजे आमच्या डोक्‍याचा ताप जाईल, यासाठीच मोदींना पाठिंबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसे असल्याने भाजप नेते तुमचा पाठिंबा घेण्यास तयार नाहीत, या मुद्यावर बोलताना "पाठिंब्यासाठी फोन करून तेच माझ्याकडे आले होते, मी त्यांच्याकडे कधीही गेलो नाही,' असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही

कितीही केसेस होऊ देत, ठोकशाही होणारच
टोलविरोधी आंदोलनाच्या मुद्यावर बोलताना "माझ्यावर कितीही केसेस झाल्या तरी घाबरणार नाही, सरकार ऐकत नसेल तर ठोकशाही होणारच,' अशी भूमिका राज यांनी मांडली. टोलसंदर्भात अनेक निवेदने दिली, चर्चा केल्या; परंतु काहीही हालचाल होत नसल्याने काही प्रमाणात हिंसक आंदोलने होणारच, असे सांगत टोल धोरणाला आपला विरोध नसून त्यातून जमा होणाऱ्या पैशाच्या हिशेबावर आपला आक्षेप असल्याचे राज यांनी नमूद केले. आठ वर्षांत कोणत्याही पक्षाच्या तुलनेत 13 आमदार, विविध महापालिकांमध्ये नगरसेवक असे यश मिळविले असून, अन्य पक्षांच्या तुलनेत मनसेची कामगिरी चांगली असल्याचे दिसून येते. याच बळावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मनसे निवडून येणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्‍त केला. राजकारणात मी कधीही डील केले नाही, राजकारण माझ्यासाठी "मिशन' आहे, अशा शब्दांत राज यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें