बुधवार, 1 अक्तूबर 2014

रस्ते, पाणी, वीज हे विकासाचे त्रिशूळ : राज ठाकरे

वणी (जि. यवतमाळ) : "रस्ते, पाणी आणि वीज हे विकासाचे त्रिशूळ आहे. ही कामे केली तर विकास होतो. पण आजवर सत्तेत असलेल्यांना तेच जमले नाही. याकरिता आम्ही उमेदवार उभे केले आहेत. आम्हाला काही करण्याची संधी द्या,‘‘ असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले.

मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचारासाठी राज ठाकरे आज वणीत आले होते. यावेळी शासकीय मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. 
ब्ल्यूप्रिंटविषयी माहिती देताना म्हणाले राज ठाकरे, "गेल्या 60 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात रोजीरोटी व पाणी या मुख्य समस्या सुटल्या नाहीत. म्हणून माझ्यासारख्या चित्रकाराला राजकारणात उतरावे लागले. माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी माझा लढा आहे. आम्ही सत्तेत आलो; तर सर्वसाधारण माणसाच्या समस्या सोडविण्याकरिता कार्य करू.‘‘
ते म्हणाले, "सणावाराच्या काळात आमच्या परंपरांचा विचार न करता आमच्यावर निवडणूक लादली गेली. आम्ही किंवा कोणताही राजकीय पक्ष यावर काही बोलत नाही. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, पाणीप्रश्‍न, बेरोजगारी आदी विषयांवर कोणताच राजकीय पक्ष बोलला नाही. केवळ युती व आघाडी टिकेल की नाही, याचीच चर्चा करीत होते. तुमच्या समस्यांशी यांना काही घेणे देणे नाही. यांनी दिलेले आमदार-खासदार आपल्या क्षेत्रात न राहता मुंबई-दिल्लीत राहतात. यांनाही नागरिकांच्या समस्यांशी काहीच आपुलकी नाही.‘‘

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें