मंगलवार, 18 अगस्त 2015

मुख्यमंत्री ब्राह्मण असल्याने पुरंदरेंसंबंधी वाद- राज

मुंबई- पुरस्कारावरून करण्यात येणार वाद हा भाजपमधील काही मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रचलेले कुभांड आहे. मुख्यमंत्री ब्राह्मण असल्याने हा वाद निर्माण करण्यात येत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी केला.
Slow Android Phone? Click Here
भारतीय जनता पक्षामध्ये छुपी राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पुरस्कार देण्याच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठी भाजपचे मंत्री का पुढे आले नाहीत असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण‘ देऊ नका असे मत नेमाडे यांनी व्यक्त केले होते. त्यावर राज ठाकरे म्हणाले, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर कसे वागावे हे नेमाडे यांनी विंदा करंदीकर, कुसुमाग्रज यांच्याकडून शिकावे. पुरंदरेंना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे काही साहित्यिकांचा पोटशूळ उठला आहे.
तसेच, देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्याने ते मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात असे वाद जाणीवपूर्वक निर्माण करण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.

...तर राज्यात तांडव करीन
महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा कार्यक्रमाचे आयोजन अगदी साध्या पद्धतीने करण्यात आले आहे. पुरंदरे यांना संरक्षण पुरेसे संरक्षण देण्यात आलेले नाही हे लक्षात आणून दिले असता राज ठाकरे म्हणाले ‘हे राज्य सरकारचे काम आहे. ते मूग गिळून गप्प बसले आहेत. पण बाबासाहेबांना कुणी हात लावला तर याद राखा

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें