मंगलवार, 8 मार्च 2016

मोदींचे वलय आता किती राहिले? - राज ठाकरे

मोदींचे वलय आता किती राहिले? - राज ठाकरे



पुणे - ‘मेक इन इंडिया‘ भरवून देशात उद्योग येत नाहीत. कागदावर शब्दकोडी सोडवली जातात, उद्योग उभे राहत नाहीत. जनरल मोटर्स कंपनी गुजरातेतून महाराष्ट्रात येते, मग व्हायब्रंट गुजरात मोहिमेचा काय फायदा? "मेक इन इंडिया‘मध्ये कुठले आले दीड लाख कोटी? "शंभर दिवसांत अच्छे दिन आणीन‘ या नरेंद्र मोदींच्या घोषणेचे काय झाले? लोकांमध्ये फसवल्याची भावना आहे, मोदींचे दोन वर्षांपूर्वीचे वलय आता किती राहिलेय, असे सवालावर सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी "सकाळ‘ला दिलेल्या खास मुलाखतीत मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.

मनसेच्या स्थापनेला दहा वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ठाकरे यांनी दिलेल्या या मुलाखतीत पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेत भावी वाटचालीबाबतची दिशा स्पष्ट केलीच, पण प्रश्‍नांना आपल्या नेहमीच्याच आत्मविश्‍वासाने, रोखठोक उत्तरे दिली. तसेच भावी राजकारणातही मराठी माणूस हाच प्रमुख मुद्दा राहणार असल्याचे स्पष्ट केले. मुंबईतील "कृष्णकुंज‘ या त्यांच्या निवासस्थानी सुमारे दीड तास रंगलेल्या या मुलाखतीचा हा सारांश. डिलीट केलेल्या फाइल्स परत मिळवा
प्रश्‍न - मोदींना सुरवातीला पाठिंबा आणि नंतर विरोध ही विसंगती नव्हती का?
ठाकरे - माझा विरोध भूमिकासापेक्ष असतो. गुजरातहून परतल्यावर मला प्रश्‍न पडला की मोदींनी मुखवटा उभा केला की काय? ते देश म्हणून विचार करत नाहीत. एक तर परदेशात जाणे नाही तर भाषणे ठोकणे. राज्याच्या निवडणुकांत एखाद्या पंतप्रधानाने 40 सभा घेतल्यात का कधी? बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबाद करायची कल्पना त्यांना सुचली. कारण मनातून गुजराती आहे ना! तुम्ही गुजरातच्या बाहेर पडलेला नाही आहात ना? दोन वर्षांत चमत्काराची अपेक्षा नाही, पण होणाऱ्या गोष्टींची झुळूक तर का नाही? "मेक इन इंडिया‘ हे मुंबईत का, दिल्लीत का नाही? अशामुळे उद्योग येत नाहीत. गुजरातमध्ये व्हायब्रंट गुजरात मोहिमेनंतर किती उद्योग आले? तिथली जनरल मोटर्स कंपनी महाराष्ट्रात येते. मग तुम्ही व्हायब्रंट म्हणून उद्योग आणले का घालवले? केंद्राला कराचा एक पैसा न देता आमचे कर आम्ही वसूल करू, आणि विकास करू, अशी भूमिका मुख्यमंत्री असताना मोदींनी घेतली होती. आज तेच पंतप्रधान आहेत. मग आता भूमिकेत बदल का? देश दिलाय तुमच्याकडे. तो पाहा ना तुम्ही.
प्रश्‍न - पक्षाची दहा वर्षांची वाटचाल कशी झाली?
ठाकरे - पक्षस्थापना अवघड असली, तरी मला आत्मविश्‍वास होता. माझ्या विकास आराखड्यात माझ्या कल्पना आहेत. सत्तेमुळे करू शकता तो विकास आराखडा झाला, संघटनेद्वारे करू शकता अशी आंदोलने झाली. "ठाकरे आंदोलन घेतो आणि अर्धवट सोडतो‘, अशी हाकाटी केली. पण असे सोडलेले आंदोलन कुणीही दाखवावे. शहरातील पाट्या मराठीत आल्या. केंद्रीय आस्थापनेत मराठी मुले का भरत नाहीत, यावर आंदोलन केल्यावर केंद्रीय मंत्र्यांना सांगावे लागले, की परीक्षा त्या त्या मुलाच्या भाषेत होईल आणि नोकरीत त्या राज्यातल्या मुलांनाच प्राधान्य दिले जाईल. कमी खर्च आलेल्या रस्त्यांना टोलची गरज नाही आणि जिथे लावला पाहिजे तिथली रोखीची पद्धत बंद करा, असा आग्रह आम्ही धरला. त्यामुळे 67 ठिकाणचे टोल बंद झाले. मोबाईलवर मराठी आवाज ऐकू येऊ लागला. मल्टिप्लेक्‍समध्ये मराठी चित्रपट सुरू झाले. मराठी भाषा दिवस मनसेने मोठ्या प्रमाणावर साजरा करायला सुरवात केली. आमीर खानने मराठी शिकली, अमिताभने भाषणाची सुरवात मराठीतून केली, हे मोठे यश होते.
प्रश्‍न - आंदोलनाची पद्धत हिंसक, खळखट्ट्याक असल्याने या मुद्द्याला सहानुभूती असणारेही नाराज झाले. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन योग्य ठरले नसते का?
ठाकरे - अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनाचे काय झाले? शांततापूर्ण मार्गाच्या सगळ्या गोष्टी करून झाल्या होत्या, रेल्वे बोर्डापासून दिल्लीपर्यंत निवेदने दिली, यानंतरही पाच-पाच लाख परप्रांतीय मुलाखतीसाठी येत असतील, तर असे आंदोलन का करू नये? त्यांना काय आम्ही गुलाबाचे फूल द्यायला हवे होते? टॅक्‍सीचालक पोलिसांना मारू लागले, महिलांशी घाणेरडे वागायला लागले, अरेरावी करू लागले, तो लोकांच्या मनातला उद्रेक बाहेर पडला. हजारो अनधिकृत टॅक्‍सी-रिक्षा आम्ही पकडून दिल्या. त्या सरकारला तोडाव्या लागल्या. कायदा मोडणाऱ्यांसाठीचा कायदा आम्ही मोडला.


प्रश्‍न - शहरी तोंडावळ्याचे, एका विशिष्ट गटांचे प्रश्‍न आपण मांडले, राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत भिडणाऱ्या मूलभूत समस्यांकडे आपले दुर्लक्ष झाले आहे का?
ठाकरे - फक्त 10 वर्षांत सगळेच माझ्याकडून कसे मागता? माझ्या हातात राज्य आल्याशिवाय या गोष्टी प्रत्यक्षात येणार नाहीत. दुष्काळासंदर्भात काय पावले उचलता येतील त्यावरही अनिल शिदोरे सध्या काम करीत आहेत.
ग्रामीण युवकांची स्वप्ने शहरात दडलेली आहेत. शहरीकरणाचे प्रमाण वाढत असून, ठाणे जिल्ह्यात सात महापालिका आहेत. शहराचा ताण वाढतो आहे. शहरे कोसळली तर सगळे कोसळून जाईल तुमचे. तुम्ही मूळच्या करदात्याला फसवता आहात. माणसे वाढताहेत म्हणून त्याला पाणी कमी दिले जाते आहे.

प्रश्‍न - शहरीकरणाची समस्या ही अतिकेंद्रीकरणाची असून, शहरीकरण तीन-चार शहरांतच एकवटले आहे. त्यावर मार्ग काय?
ठाकरे - महाराष्ट्रातील माणसाची सोय लावा प्रथम. गुजराती राहतात इथे आणि धंदा करतात गुजरातमध्ये. यांची ओझी आम्ही का वाहायची? शहरांचे विकेंद्रीकरण झाले तरी जिकडे गूळ दाखवाल तिकडे बाहेरचे डोंगळे येणारेत. जे कराल ते मराठी माणसाच्या हातात राहणार आहे का? विकेंद्रीकरण ही प्रक्रिया आहे. ती होतेच.

प्रश्‍न - मनसेला सुरवातीच्या काळात मिळणारा प्रतिसाद सातत्याच्या अभावाने कमी झाल्याचे निरीक्षण मांडले जाते. आपले मत काय?
ठाकरे - आपल्याकडे मतदानाचे आकडे, सभांची गर्दी यावर यशापयश मोजले जाते. 60 वर्षे राज्य केलेल्या पक्षाचे काय झालेय? माझी फक्त दहा वर्षे झालीत, प्रत्येक पक्षाला हे चढउतार येत असतातच.

Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही.

प्रश्‍न - नाशिक महापालिकेच्या सत्तेचा अनुभव काय?
ठाकरे - गोदापार्क, बोटॅनिकल गार्डनसारखे उपक्रम पाहा, रस्ते पाहा. कुंभमेळ्याच्या तरतुदीमुळे विकास झाला नाही तर तो आम्ही केला. कर्ज काढले आम्ही, तीन वर्षांपूर्वी निविदा काढल्या आम्ही. नुसत्याच टीकेला अर्थ नाही, शाबासकीची पाठही थोपटा.

प्रश्‍न - हिंदुत्वाचा मुद्दा तुम्ही घेणार, अशी चर्चा सुरू झाली होती.
ठाकरे - मला हिंदुत्वाबद्दल विचारले तेव्हा "मी हिंदू आहे‘, असे उत्तर दिले. पक्षाच्या झेंड्यातला भगवा हिंदूंचा, निळा दलितांचा आणि हिरवा मुस्लिमांचा. पण माझ्या मनातला मुसलमान अमजलअली खान, झाकीर हुसेन हे आहेत, भेंडीबाजार, बेहरामपाडा, भिवंडीतील मुस्लिम नाही. ओवेसींनी काढलेल्या मोर्च्यात महिला पोलिसांना मारहाण झाल्यानंतर त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरेच होता. तेव्हा का यांच्या शेपट्या आत होतात? धर्मांध समोर येतील तेव्हा त्यांच्यासमोर उभा राहणारा राज ठाकरेच असेल. वाटेल ते सहन करणार नाही.
Android फोन slow झालाय ? हे करा  

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें