गुरुवार, 30 नवंबर 2017

राज यांचं वैयक्तिक नुकसान नाही, पण मनसेचं फक्त एक मत गेलं : नाना पाटेकर

णे : “प्रत्येकाला बोलण्याचा, आपला मुद्दा मांडण्याचा अधिकार आहे. राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझा मांडला. राज ठाकरे यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं,” अशी प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांनी दिली आहे.
आज पुण्यातल्या एनडीएच्या दीक्षांत समारोहासाठी नाना पाटेकर उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह विविध विषयांवर मत मांडलं.

मुंबईत फेरीवाल्यांचा मुद्दा ऐरणीवर असताना, अभिनेता नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांच्या बाजूने सूर आवळला होता. “भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांच्या पोटावर पाय का देता,” असा सवाल नाना पाटेकर यांनी उपस्थित केला होता.
नानांच्या या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. “नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करु नये, ज्या विषयाची माहिती आहे, त्याबद्दल बोलावं,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी नानांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.

“महात्मा नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांबद्दल काहीतरी वक्तव्य केलं. नानाला वाटतं तो चंद्रावरुन पडलाय, जेव्हा मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नव्हती तेव्हा नाना पाटेकर बोलले नाही, तेव्हा मनसेने लढा दिला,” असं म्हणत राज ठाकरेंनी नानाची मिमिक्रीही केली.
या विषयी बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, “राज ठाकरेंनी त्यांचा मुद्दा मांडला आणि मी माझा मांडला. पण राज ठाकरे यांचं काही नुकसान झालं नाही, मात्र मनसेचं एक मत गेलं.”

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें