शनिवार, 26 मई 2018

भाजपला दुटप्पीपणाचे परिणाम भोगावे लागतील - राज ठाकरे

चिपळूण : कोकणच्या किनारपट्टीला आवश्यक असलेले मत्स्य विज्ञान महाविद्यालय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला पळवत आहेत. सर्व योजना विदर्भाला नेऊन पुन्हा फडणवीस व मुनगंटीवार स्वंतत्र विदर्भाच्या घोषणा देत आहेत. या दुटप्पीपणाचे परिणाम येत्या निवडणुकीत भोगावे लागतील असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.
शनिवारी (ता.26) माधव सभागृहात मनसेच्या वतीने आयोजीत कार्यक्रमाच्या वेळी ते पत्रकाराशी बोलत होते. मत्स्यवसाय तंत्रज्ञान महाविद्यालय ही किनारपट्टीच्या विकासाची गरज आहे. स्थानिक गरजा ओळखून विकासाच्या संधी देण्याचे काम राज्याच्या नेतृत्वाचे आहे. पण मुख्यमंत्री हे महाविद्यालय नागपूरला पळवून नेत आहेत.

शासनाच्या सर्व योजना विदर्भात नेऊन पुन्हा फडवणवीस व मूनगुंटीवार स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणा देत असल्याच्या क्लीपींग फीरत आहेत. या संकुचित विचाराने महाराष्ट्राचे काय भले होणार याचा विचार येत्या निवडणुकीत लोक नक्कीच करतील.पालघरमध्ये भैय्ये लोकांच्या मतासाठी भाजप नेत्यांनी उत्तर प्रदेशचे मूख्यमंत्री आदीत्यनाथांना बोलावले. शेवटी मोदी हे एकच नाव वापरून व खोट बोलून किती दिवस चालणार. मोदी व शहा यांना निवडणुकीपूर्वी लोक ओळखत होते का हा प्रश्‍न आहे.
म्हणून आता पाहण्यामध्ये भाजपच्या जागा शंभरने कमी होणार हे स्पष्ट पणे मांडले जात आहे.जागा वाढवण्यासाठी भाजपावाले दंगली घडवून आणतील. पण गूजराथमध्ये पैसा व सत्ता असून काय झाले हे उदाहरण समोर आहेच.
पर्यायी नेतृव नाही हे म्हणणे चुकीचे आहे. मनमोहनसींगापासून  नरसींहाराव, देवगौडा पंतप्रधान होतील याचा अंदाज कूणालाच नव्हता.त्यामूळे पर्यायी नेतृत्व समोर येतच असते.
ईव्हीएम मशीनबद्दल पहिला आक्षेप आपण नोंदवला होता. शेवटी बटन दाबण्याची प्रक्रिया चुकू शकते. एका पक्षासमोरील बटन दाबल्यानंतर भाजपला मत नोंदवले जाते याचे क्लीपींग व्हायरल झाल्यावर आणखी काय पुरावे हवेत. काही वर्षापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ईव्हीएम मशीनबद्दल भरपुर टीका केली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत भांडण गेले होते. आता तेच किरीट सोमय्या सत्ता आल्यापासून कुठे गायब आहेत असा टोला त्यांनी लगावला.या वेळी श्री.ठाकरे यांच्या समवेत पक्षाचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई व पदाधिकारी उपस्थित होते.
येत्या  निवडणुकीत भाजपच्या शंभर जागा कमी होणार. गुजरातमध्ये सत्ता आणि पैसा असून काय झाले हे सर्वाना माहीत आहे. शेवटी मोदी या एकाच नावावर लोकांना किती दिवस फसवणार.या पूर्वी देशाच्या राजकारणात मोदी व शहा यांचे नाव तरी होते का हे लोकांना समजते. त्यामूळे हे लोक पर्यायी नेतृत्व दिल्या शिवाय राहणार नाहीत,असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे व्यक्त केले.
ईव्हीएम मशीनच्या खोटेपणाबद्दल भाजपचे किरीट सोमय्या किती तरी वर्ष ओरडत होते. अगदी सर्वोच्च न्यायालयात भांडण पोहोचले होते.आता किरीट सोमय्या अचानक सत्ता आल्यापासून ईव्हीएम बद्दल गप्प का बसले आहेत असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें