- सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, January 10, 2013 AT 03:00 AM (IST)
विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयात जाधव यांनी राजीनामा सादर केला. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मनसेवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, आमदारकीचा राजीनामा दिल्याने मी पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. कोणत्याही पक्षातून नव्हे, तर अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांकडे असलेल्या पोलिसांकडून मला बेदम मारहाण झाली. त्यानंतर राज ठाकरे यांनी सभा घेतली; पण योग्य ठिकाणी या विषयावर दादच मागण्यात आली नाही. विधानसभेच्या अधिवेशनात पहिल्या दिवसापासून या विषयावर मनसे आक्रमक होणे अपेक्षित असताना गटनेते बाळा नांदगावकर यांनी तुझा विषय एवढा महत्त्वाचा नसल्याची प्रतिक्रिया दिल्याचा आरोप जाधव यांनी या वेळी केला. आपल्यावरील मारहाणीत सेटलमेंट झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. पक्षप्रमुखांच्या परवानगीशिवाय अशी सेटलमेंट होणे शक्य नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. केवळ शिवसेनेने मारहाणीत विषय उपस्थित केल्यानेच त्यावर चर्चा घडू शकली.
आम्ही रस्त्यावरचे नाहीत
ज्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आणि कॉंग्रेसच्या विरोधात लढल्याने पोलिसांच्या मारहाणीला सामोरे जावे लागले, त्याच पक्षाला जिल्हा परिषदेत पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढेच नव्हे तर स्थानिक पातळीवरील निर्णयातही वरिष्ठ पातळीवरून सातत्याने हस्तक्षेप केला जात होता. आम्ही काय रस्त्यावरचे लोक नाहीत. माझे वडीलही आमदार होते. मनसेचे काम चांगले चालेल असे वाटल्याने येथे आलो होतो; पण येथेही सेटलमेंटवरच सारे चालत असल्याने जनतेकडे पुन्हा एकदा जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें