मुंबईतील
मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी राज यांची घाटकोपर येथे सभा झाली, या वेळी
ते बोलत होते. राज म्हणाले की, मोदींनी राज्यातील भाजप नेत्यांची लायकी
काढली आहे. "मुंढे असते तर मला महाराष्ट्रात यायची गरज पडली नसती,‘ असे
मोदी यांनी बीड येथील सभेत विधान केले होते. तो धागा पकडत राज म्हणाले, की
स्वतःची ताकद नसतानाही स्वबळाच्या बेटक्या भाजप फुगवत आहे. भाजपला स्वतःचे
उमेदवार नाहीत, सगळे बाहेरून आयात केलेले आहेत.
या
वेळी राज यांनी भाजपने कोणत्या पक्षांचे उमेदवार आयात केले याची यादी
वाचून दाखवली. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यावरही त्यांनी
जोरदार टीकास्त्र सोडले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें