शुक्रवार, 4 मई 2012

मनसेचा कोणताही आमदार युरोप दौऱ्यात नाही

मनसेचा कोणताही आमदार युरोप दौऱ्यात नाही
- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, May 05, 2012 AT 03:45 AM (IST)

मुंबई - युरोप दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणताही आमदार जाणार नाही, असे पक्षाचे विधिमंडळ व्हिप आमदार नितीन सरदेसाई यांनी आज स्पष्ट केले. विधिमंडळ प्रतोद म्हणून आपण विधान मंडळ सचिवालयाच्या प्रधान सचिवांना याआधीच तसे पत्र दिल्याचे ते म्हणाले. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने हा दौरा होणार आहे.

"सकाळ'मध्ये या संदर्भात "मनसेचाही आमदार युरोप दौऱ्यात' या मथळ्याखालील वृत्त प्रसिद्ध झाले होते. यावर स्पष्टीकरण देताना सरदेसाई यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केले. ते म्हणाले, की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी या दौऱ्यासाठी पक्षाचे आमदार नितीन भोसले यांचे नाव सुचविले होते; मात्र त्यानंतर कोणत्याही आमदाराला पाठविण्यात येणार नसल्याचे पक्षाने स्पष्ट केल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली.

सरदेसाई यांच्या वतीने महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयाच्या प्रधान सचिवांना पाठविलेले पत्र या विभागाच्या लिपिकांनी स्वीकारल्याची तारीख 2 मे आहे. या पत्रात मे व जून 2012 मध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने युरोपीय देशाचा परदेश दौरा होणार आहे. या दौऱ्याकरिता मनसे पक्षाच्या सदस्याचे नाव कळविण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. परंतु या दौऱ्यासाठी मनसेकडून कोणताही सदस्य पाठविण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. राज ठाकरे यांनी "आधी केले, मग सांगितले" या भावनेने प्रथम आपल्या आमदारांना परदेश दौऱ्यावर न जाण्याचा आदेश दिला व नंतर इतरांना सल्ला दिला असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले

बुधवार, 2 मई 2012

परदेशी मंत्र्यांना जिल्हाबंदी करा- राज ठाकरे

परदेशी मंत्र्यांना जिल्हाबंदी करा- राज ठाकरे
- सकाळ वृत्तसेवा
Wednesday, May 02, 2012 AT 05:13 PM (IST)

मुंबई - रेल्वे परिक्षेबाबत मार्गदर्शन करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुष्काळग्रस्त भागात जाऊन मतदकार्य करण्याच्या सूचना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या. दुष्काळग्रस्त भागात जाऊन चारा आणि पाणी पुरवितानाच प्राणीमित्र, संघटनांच्या मदतीने प्राण्याचे संरक्षण करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

प्राण्यांची शिकार करणाऱ्यांना रस्त्यावरच फोटा, अशा शब्दांत त्यांनी आपले प्राणीप्रेम दर्शविले. दुष्काळ पडल्यानंतर दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणाऱ्या परदेशी मंत्र्यांना जिल्हाबंदी करावी, ऐन मे मध्ये परदेशात जाऊन अभ्यास करणाऱ्या आमदारांना जिल्हाबंदी करावी, असेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.
मुंबई येथे घेण्यात आलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते.

महाराष्ट्रात मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची दहशत, जबर असलीच पाहिले, असेही ते म्हणाले. आगीमध्ये भस्मसात झालेल्या सहा हजार 800 क्षेत्राचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जंगल जळाले. मात्र, सरकारने काहीच केले नाही. अशाप्रकारचे कृत्य करणारी मोठी लॉबी सध्या महाराष्ट्रभर फिरते आहे. अशाप्रकारच्या आगी लावायच्या आणि ती जमीन काबीज करून पैसा कमवायचा, अशी या राज्यकर्त्यांची वृत्ती आहे. जनावरे मरताहेत, झाडे जळताहेत याचे त्यांना काही देणेघेणेच राहिलेले नाही. मात्र, हे सर्व होत असताना मनसेच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांनी काम काम केले, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला. येत्या काही दिवसात मी पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम देणार असून त्यावर मी देखरेख ठेवणार आहे, असे त्यांनी सांगितले.

मे महिना आली, की आमदारांचे अभ्यासदौरे सुरू होतात. मात्र, या अभ्यासदौऱ्यातून ते काय शिकून आले, हे एकदाही सरकार विचारत नाही. अशा आमदारांना जिल्हाबंदी केली पाहिजे, असे मार्गदर्शन करतानाच ठाकरे यांनी मनसेच्या एकाही आमदाराला अशाप्रकारच्या अभ्यासदौऱ्यांना पाठविले जाणार नाही, अस ठासून सांगितले.

दुष्काळग्रस्त भागात काम करायला जाताना, उद्देशन स्पष्ट ठेवला पाहिजे. त्या ठिकाणी भाषणबाजी, प्रचार आदी गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. तेथील स्थानिक वृत्तपत्रांनाही त्याबाबतची माहिती मिळाली पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले