बुधवार, 26 दिसंबर 2012

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला राज ठाकरे, आठवले

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला राज ठाकरे, आठवले

- सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, December 27, 2012 AT 03:45 AM (IST)


मुंबई - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. या दोन्ही नेत्यांना व्यासपीठावर बसण्याचा मान देण्यात आला होता. तसेच राज यांच्या शेजारी रामदास आठवले बसले होते.

उद्धव ठाकरे यांच्यासह रश्‍मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, लोकसभा नेते अनंत गिते, विधिमंडळ गटनेते सुभाष देसाई, स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यावेळी उपस्थित होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित आदी उपस्थित होते. मनसेच्या वतीने मंगळवारीच राज ठाकरे गुजरातला रवाना होणार असल्याचे कळविण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही, याबद्दल चर्चा सुरू होती. मात्र आज सकाळी सोहळ्याला उद्धव रवाना झाल्याने या चर्चेला विराम मिळाल्याचे मानले जात आहे.

व्यासपीठावर राज ठाकरे यांना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याशेजारी आसन देण्यात आले. महाराष्ट्रात महायुतीमध्ये मनसेचा समावेश झाल्यास बाहेर पडण्याचा इशारा आठवले यांनी यापूर्वीच दिला आहे. अशा वेळी दिल्लीच्या दिशेने घोडदौडीच्या तयारीत असलेल्या नरेंद्र मोदी यांनी राज आणि रामदास आठवले यांची आसनव्यवस्था जाणूनबुजून तर शेजारी केली नाही ना, अशी चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे राज यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यावर रामदास आठवले यांनी त्यांचे हस्तांदोलन करून स्वागत केले

रविवार, 23 दिसंबर 2012

"बलात्काराच्या राजधानी'त संतापाचा उद्रेक"

"बलात्काराच्या राजधानी'त संतापाचा उद्रेक
 
 "
अनंत बागाईतकर सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, December 24, 2012 AT 12:00 AM (IST)


दिल्लीला "बलात्कारांची राजधानी' असे म्हटले जाते. हे दूषण दूर करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करायला हवे होते; परंतु आजतागायत त्यावर उपाययोजना झाली नाही. सुरक्षा यंत्रणा, पोलिस यंत्रणा, न्याय यंत्रणा यात आवश्‍यक त्या सुधारणा झाल्या पाहिजेत.


दिल्ली सध्या राग, संतापाने पेटलेली आहे. ती दृश्‍ये सर्व वृत्तवाहिन्यांवरून दाखविली जात आहेत. हा राग व संताप नैसर्गिकच मानावा लागेल. एका तरुणीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केला, शिवाय तिला अत्यंत क्रूर वागणूक दिली. दिल्लीचा दक्षिण भाग भाग बंगलेवाल्यांचा म्हणून ओळखला जातो. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली आयआयटी तेथेच आहेत. तेथे विद्यार्थ्यांची वर्दळ असते. बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी पेइंगगेस्ट किंवा सामूहिक पद्धतीने राहतात. "सडक-सख्याहरीं'चे लक्ष या भागावर असते. दिल्लीत थंडीचा ऋतू सुरू झालेला आहे. सायंकाळी साडेपाच- पावणेसहालाच अंधार पडू लागला आहे. जनजीवन व वर्दळही सहा-साडेसहानंतर मंदावते आणि याचाच गैरफायदा समाजकंटक घेतात. एखाद्‌दुसरी महिला, मुलगी दिसली, की तिच्या वाटेला जाण्यापासून बलात्कारापर्यंत सर्व प्रकार होत असतात.

पीडित मुलगी व तिचा मित्र सायंकाळच्या फेरफटक्‍यानंतर घरी जाण्यासाठी निघाले. या दोघांना कोणतेच वाहन मिळेना. दिल्लीत खासगी बसवाले भरपूर आहेत. त्यांचा व्यवसाय बेकायदा असला तरी अनेक नागरिक नाइलाजाने खासगी बसचा वापर करतात. या दोघांनीही नेमके तेच केले. बसमध्ये फक्त पाच- सात जणच असल्याचे त्यांना आढळून आले. ते आपसांत गप्पा मारत होते, म्हणजेच तो परिचितांचा समूह आहे हे पाहूनच दोघांनी तत्काळ खाली उतरणे अपेक्षित होते. पण दुर्दैवाने त्यांनी तसे केले नाही. त्यानंतर त्या अधम प्रकाराला सुरवात झाली. नराधमांनी मुलीला उद्देशून चाळे करण्यास सुरवात केली. तिच्या मित्राने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी प्रथम लोखंडी रॉडने त्याला मारले आणि बेशुद्ध केले. एका नराधमाने सुरीने मुलीचे कपडे टरकविण्यास सुरवात केली. त्या सर्वांनी आळीपाळीने बलात्कार तर केलाच; पण तिला चावणे, चाकूने ओरखाडणे असे प्रकारही केले. या झटापटीत चाकूचा खोल वार तिच्या पोटावर झाला. तिचे आतडे बाहेर आले. पीडित मुलगी बेशुद्ध झाली. नंतर त्यांनी ही मुलगी आणि मुलगा यांना चालत्या बसमधून बाहेर फेकून दिले.

मानवतेला काळिमा फासणारा हा प्रकार चालत्या बसमध्ये सुमारे चाळीस मिनिटे सुरू होता. या काळात बस दोन वेळा रस्त्यात गस्तीसाठी उभ्या असलेल्या पोलिस व्हॅनसमोरून गेली. या बसच्या काचा काळ्या होत्या आणि पडदेही लावण्यात आले होते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे याच बसवाल्या टोळक्‍याने एका सुताराला लुटले होते. त्याच्याजवळचे चौदाशे रुपये त्यांनी लुबाडले होते. तो सुतार पोलिसांकडे गेला असता पोलिसांनी त्यांच्या नेहमीच्या बेफिकिरीने, पहिल्यांदा "तू सुतार आहेस; तुझ्याकडे एवढे पैसे आले कोठून?' असे म्हणून त्यालाच दटावले आणि "उद्या सकाळी ये' असे सांगून कटवले. पोलिसांनी त्याच्या तक्रारीची दखल तत्काळ घेऊन त्याने सांगितलेल्या वर्णनाची ही बस अडविण्याचा प्रयत्न केला असता, तर कदाचित हा दुर्दैवी प्रकार झाला नसता. आता तरी अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठीच्या उपायांचा विचार करावा लागेल. दिल्लीला "बलात्कारांची राजधानी' उपाधी मिळालेली आहे. परंतु आजतागायत सुरक्षा यंत्रणा सुधारून हे प्रकार होणार नाहीत याची खबरदारी घेतली गेलेली नाही, हे खरे आहे. परंतु दिल्लीत झालेला उद्रेक आणि निदर्शनांचे स्वरूप पाहता त्यला अराजकी वळण लागण्याचा धओका स्पष्टपणे दिसतो आहे. इलेक्‍ट्रॉनिक माध्यमे त्यांच्या वृत्तवाहिन्यांची "प्रेक्षणीयता' वाढविण्यासाठी समाजाला चक्क उचकावत असतात. न्याय मागणे वेगळे आणि अन्य हेतूंसाठी रस्त्यावर उतरणे वेगळे. एखाद्या प्रश्‍नावर दंगे करण्यासाठी प्रवृत्त करणे समाजविरोधी आहे. जे "अण्णा- आंदोलना'त घडले त्याचीच पुनरावृत्ती होते आहे. पोलिसांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्‍यक आहे. परंतु केवळ पोलिसांना शिवीगाळ का? न्यायदानात अक्षम्य विलंब लावणाऱ्या न्यायालयांचे काय? दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या महिला न्यायमूर्ती ग्यानसुधा मिश्रा यांनी या प्रकाराबद्दल उद्वेग व्यक्त केला. "न्यायाधीश मुलाखती देत नाहीत; परंतु हा प्रकारच असा आहे, की मला मौन पाळणे अशक्‍य आहे', असे त्या म्हणाल्या. दिल्ली उच्च न्यायालयाने संबंधित पोलिसांची नावे मागितली. ती देण्यात कुचराई करीत असल्याबद्दल पोलिसांवर टीकाही केली. ही चांगली गोष्ट आहे; पण या प्रकरणाचा निकाल वेळेत देऊन आरोपींना अत्यंत कडक शिक्षा देण्याची हमी न्यायालये देतील का, देशात घडणाऱ्या प्रत्येक बलात्काराबद्दल पोटतिडकीने दखल घेतली जाईल का, याचे उत्तरही दिल्लीत इंडिया गेटजवळ मेणबत्त्या लावणाऱ्यांनी द्यावे. केवळ टीव्हीवर चेहरे येण्यासाठी अभिनिवेश दाखविण्याने समाज व व्यवस्था बदलणार नाही. त्याचबरोबर कोणतेही तंत्र किंवा यंत्रणा मोडून या घटनांना आळा बसणार नाही. सुरक्षा यंत्रणा, पोलिस यंत्रणा, न्याय यंत्रणा यात आवश्‍यक त्या सुधारणा, दुरुस्त्या करणे याला प्राधान्य द्यावे लागेल. अन्यथा अराजकता निर्माण होईल. दिल्ली पोलिस केंद्र सरकार म्हणजेच केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकारात येतात. त्यामुळे दिल्लीची कायदा व सुव्यवस्था ही थेट केंद्र सरकारची जबाबदारी आहे. या घटनेनंतर गृह मंत्रालयातर्फे संसदेत निवेदन केले गेले. पण त्यात केवळ तांत्रिक गोष्टींचा समावेश होता. लोकांना आता ठोस कृती हवी आहे. सरकारने ती करून दाखविल्यासच लोकांचा यंत्रणेवरील विश्‍वास टिकण्यास मदत होईल.

"अण्णा आंदोलना'तला एक विनोद. तीस वर्षांनंतर काय स्थिती असेल याबद्दलचा तो विनोद होता. अण्णांचा वारसदार तीस वर्षांनंतरही जंतरमंतरवर जनलोकपालसाठी उपोषणाला बसलेला असेल. सचिन तेंडुलकर त्याच्या पुढच्या शतकाच्या प्रतीक्षेत असेल आणि शेवटी लिहिले होते, "दिल्लीत एक महिला छेडछाड, विनयभंग, बलात्कार न होता सहा इंच पायी चालली!' दिल्लीचीच नव्हे, तर देशातल्या कोणत्याच शहराची अशी अवस्था न होवो




शनिवार, 1 दिसंबर 2012

ठाकरे बंधू एकत्र येतील

ठाकरे बंधू एकत्र येतील
 

 ः सकाळ वृत्तसेवा
Sunday, December 02, 2012 AT 02:30 AM (IST)
गोपीनाथ मुंडे यांना विश्‍वास
मुंबई- "मंत्रालयावर भगवा झेंडा फडकविण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील,' असा ठाम विश्‍वास भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केला. "दोघांची शिवसेनाप्रमुखांवर प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात वेगळे राजकीय चित्र दिसेल,' असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर प्रथमच मुंडे यांनी असा विश्‍वास व्यक्त केला. त्याला अनेक राजकीय अर्थ आहेत.
"राजकारणात कोणीच कोणाचा फार काळ शत्रू आणि मित्र नसतो. अनेक वेळा तत्त्वावर मतभेद असल्यामुळे तणाव निर्माण होतो; परंतु शिवसेनाप्रमुखांबद्दल मनाने दोघेही ठाकरे बंधू एकत्र येतील,' असेही मुंडे यांनी सांगितले.

ते म्हणाले, "राज्यातील आघाडी सरकार घालवून 2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या मंत्रालयावर भगवा झेंडा मला पाहायचा आहे, अशी जाहीर इच्छा बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळा व्यक्‍त केली होती. हे त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी दोघे ठाकरे बंधू एकत्र यावेत, अशी इच्छा माझ्यासह लाखो कार्यकर्त्यांची आहे.'
"राज ठाकरेंना महायुतीत आणले तर रिपाइंचा विरोध असेल, असे वक्‍तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. याबाबत विचारले असता मुंडे म्हणाले, "इंदूमिल प्रश्‍नी आठवले यांची नाराजी होती; परंतु आता इंदूमिल प्रश्‍न सुटणार असल्यामुळे त्यांचा विरोध राहणार नाही. काही मतभेद असतील तर आपण दोघांशी चर्चा करू आणि मार्ग काढू; परंतु सरकारला घालविण्यासाठी राज ठाकरे महायुतीत असावेत, अशी हजारो कार्यकर्त्यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्‍त केली आहे.'

"आघाडी सरकार हटविणे हीच बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे. त्यामुळे दोघे बंधू एकत्र येण्याची कार्यकर्त्यांची मागणी आणि आम्हा सर्वांचे प्रयत्न यशस्वी होतील,' असा विश्‍वास श्री. मुंडे यांनी व्यक्‍त केला.

"ठाकरे बंधूंना एकत्र आणण्यासाठी मी पुढाकार घेईन. या वेळी काहीतरी सकारात्मक निर्णय होईल. जनमताचा आदर आम्हा नेते मंडळींना करावाच लागतो. त्यामुळे मी आशावादी आहे,' असेही खा. मुंडे यांनी सांगितले

शनिवार, 24 नवंबर 2012

...आता कोण?

...आता कोण? (हेमंत देसाई)

हेमंत देसाई hemant.desai001@gmail.com
Sunday, November 25, 2012 AT 03:30 AM (IST)

शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे हेच करतील व ते कदाचित पक्षाच्या ध्येय-धोरणांत आमूलाग्र परिवर्तन आणतील. 2014 पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला पसारा वाढवू पाहील. निवडणुकीत दोन्ही पक्ष जागावाटपात समझोता करतील. या निवडणुकांत समजा दोघांपैकी एकजण अगदीच फिका पडला, तर एकत्रीकरणाची प्रक्रिया कदाचित गतिमान होईल. अशा वेळी "मर्ज्ड' पक्षात कार्याध्यक्षपदंही दोन निर्माण करता येतील. उद्धव व राज ठाकरे यांनी आपापला "इगो' विसरून हस्तांदोलन केलं, तर महाराष्ट्राचं राजकीय चित्रच बदलेल. सत्तेशिवाय आपापली पक्षांतर्गत सत्ता गोंजारत बसायचं की व्यक्तिगत त्याग करून एकत्रित पक्षाची सत्ता राज्यात आणायची, याचा निर्णय शेवटी या दोघांनीच घ्यायचा आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळं केवळ एक कुटुंब व पक्षच पोरका झाला नसून, आपली काळजी वाहणारा एक ज्येष्ठ माणूस हरपला असल्याची सार्वत्रिक भावना मराठी समाजात निर्माण झाली आहे. बाळासाहेबांचा करिश्‍मा सर्वांनाच ठाऊक असला, तरी गर्दीचा इतका महापूर येईल, याची कल्पना कट्टर ठाकरेसमर्थकांनाही नव्हती. दक्षिणेत अण्णादुराई, एम. जी. रामचंद्रन, राजकुमार आदींच्या निधनानंतर छाती पिटत, धाय मोकलून आक्रोश करणारे लोक आपण पाहिलेले आहेत. तसेच एरवी रांगडे दिसणारे हजारो कार्यकर्ते शिवसेनाप्रमुखांच्या वियोगामुळे ढसढसा रडत होते. शिवसेनेच्या कट्टर टीकाकारालाही याची दखल घ्यावी लागेल.

बंद पडत असलेल्या मुंबईतल्या कापडगिरण्या, विस्कटलेली कम्युनिस्ट चळवळ आणि वाढती बेरोजगारी या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेची वाढ झाली. संयुक्त महाराष्ट्र समितीनं दारुण अपेक्षाभंग केला असला, तरी मुंबईवर व महाराष्ट्रावर अन्याय होत आहे, या भावनेनं मूळ धरलं होतं. या पोकळीतच शिवसेनेची वाढ झाली.

आर्थिक वंचना होत असल्याच्या वन्हीस फुंकर घालत सांस्कृतिक-भाषिक अस्मिता जागवण्याचं कार्य बाळासाहेबांनी कधी प्रखरपणे, तर कधी "मार्मिक'तेनं केलं. यासाठी विजयादशमी अर्थात्‌ दसरा मेळाव्यातून वार्षिक इशारे देऊन आणि रस्त्यावर राडेबाजी करून, आम्ही कॉंग्रेस वा समाजवाद्यांप्रमाणं मवाळ नाही, हे दाखवून दिलं जात होतं. महागाईचा वणवा पेटलेला असताना रॉबिनहूड

स्टाइलमध्ये "धारा' तेलाचं वाटप करणं, वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडणं, व्हॅलेंटाइन डेच्या विरोधात राडा करणं, 1992-93 मध्ये हिंदूंच्या रक्षणकर्त्याची भूमिका घेणं, महाआरत्यांचं आयोजन... या सगळ्यांत एक नाट्यमयता होती. समूहाला खेचून घेणारं धक्कातंत्र, ऍक्‍शन आणि ड्रामा हे "बाळासाहेबी राजकारणा'चं आद्य वैशिष्ट्य होय. दिलीपकुमारची अभिनयशैली अमिताभनं अधिक विकसित करावी, त्याप्रमाणं काकांची शैली पुतण्यानं आणखी पुढं नेली.

द्रविड मुन्नेत्र कळघम, अकाली दल, तेलुगू देसम, मुलायम सिंगांचा समाजवादी पक्ष, बिजू जनता दल यांनीही अस्मितावादी राजकारण केलं; परंतु एका टप्प्यानंतर त्यांनी सर्व समाजघटकांना सामावून घेणारं धोरणही स्वीकारलं; परंतु शिवसेनेनं आपला पीळ शेवटपर्यंत सोडला नाही. लोकांनी मतं दिली नाहीत, तेव्हा मराठी माणसाला शिव्या देण्यासही बाळासाहेबांनी मागं-पुढं पाहिलं नाही.

ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून शिवसेनेची घसरण होत राहिली. मुंबई-ठाण्याचे गड कसेबसे राखले गेले. बाळासाहेबांशी निष्ठावंत असलेले अनेक नेते पक्ष सोडून गेले, तरीही बाळासाहेबांचं व्यक्तिगत अपील कमी झालं नाही.

उलट प्रचाराच्या अंतिम टप्प्यात बाळासाहेबांच्याच सभा ठेवाव्या लागल्या वा त्यांची व्हिडिओफित दाखवावी लागली. हे सर्व काय होतं? करिष्म्या-करिष्म्यातही फरक असतो. बाळासाहेबांचा करिष्मा अधिक "पर्सनल'आहे. कार्यकर्त्यांबद्दल ममत्व बाळगणारा हा नेता. तो आपल्यासारखाच दिसणारा, वागणारा, बोलणारा, चिडणारा, डिवचणारा, मारणारा आणि माघार घेणारा...हे कार्यकर्त्यांना ठाऊक होतं. आपल्या फटकाऱ्यांनी प्रतिपक्षाला घायाळ करणारा आणि शब्दांनी वचक निर्माण करणारा हा माणूस समाजात कुठलीही प्रतिष्ठा नसलेल्यांचा नेता होता! बाळासाहेबांच्या राजकारणात, भूमिकांत अनेक विसंगती असूनही, त्यांना आपल्या राजकारणाबद्दल आत्‌ मविश्‍वास होता. कम्युनिस्टांशी दोन हात करायचे असल्यामुळंच शिवसेनेला उजवा पक्ष म्हणायचं एवढंच. अन्यथा शिवसेनेनं कॉंग्रेसशी दोस्ती केली, आणीबाणीचं समर्थन केलं आणि नंतर जनता पक्षात विलीन होण्यापर्यंतचाही विचार झाला होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाशी हिंदुत्ववादी संबंध प्रस्थापित करण्यापर्यंत मजल मारण्यात आली. बाबरी मशीद पाडण्याचं समर्थन आणि त्याच वेळी अयोध्येत पाडलेल्या मशिदीच्या जागी सार्वजनिक रुग्णालय उभारण्याची सूचना, संयुक्त पुरोगामी आगाडीला एकीकडं लाखोली आणि त्याच वेळी त्यांच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला पाठिंबा, अशी भूमिका घेऊनही शिवसैनिकांचं त्यांच्यावरचं वा संघटनेवरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही, हे विलक्षण आहे.

कोणत्याही विषयाच्या खोलात न जाता, त्याची सांगोपांग मांडणी न करताही, विशिष्ट आर्थिक-सामाजिक विचारसरणी नसूनही माणसाळलेल्या या "वाघा'वर शिवसैनिक नसलेलेही लुब्ध होते. सलमान रश्‍दी (द मूर्स लास्ट साय्‌) व खुशवंतसिंग यांच्यासारख्यांनी कितीही टीका केली, तरी बाळासाहेब आपल्या विचारांपासून मागं हटले नाहीत. कॉंग्रेसच्याच दुधावर पोसलेल्या या "वाघा'नं बघता बघता कॉंग्रेसविरोधी अवकाश व्यापला आणि आता बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरही (पृथ्वीराज चव्हाण यांनी तसं भाकीत केव्हाच केलं होतं) शिवसेना संपणार नाही.

बाळासाहेबांच्या नेतृत्वाचं स्थलांतर कुणाकडं होणार, उद्धवकडं की राजकडं, अशी चर्चा सुरू असतानाच राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापना केली. "उद्धवला शिवसेनेचा कार्याध्यक्ष करण्याचा ठराव राजनं मांडला, मी काही केलं नाही,' असं बाळासाहेबांनी वारंवार सांगितलंय; पण "उद्धवला आणि आदित्यला सांभाळा,' असंच शेवटचं आवाहन करून त्यांनी जणू आपली अं तिम इच्छाच प्रकट केली. हे आवाहन करताना त्यांनी राज यांचा उल्लेख टाळला. शिवाय, "उद्धव व आदित्य यांना एकाकी पडू देऊ नका,' अशी साद घालताना, हीच विनंती त्यांनी राज यांनाही खासगीत केली असल्यास कळायला मार्ग नाही; पण त्यांचा वारस उद्धव असून, उद्या त्यांची प्रकृती नरम-गरम राहिल्यास नेतृत्व आदित्यकडं जावं, अशीच बाळासाहेबांची इच्छा होती, असं दिसतं.

बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेतही राज यांच्या वाट्याला उपेक्षा आल्याच्या बातम्या आहेत. मात्र, समाचाराला येणाऱ्यांच्या सांत्वनाचा स्वीकार उद्धव व राज एकत्रितपणे करत असल्याचंही दृश्‍य शिवाजी पार्कवर दिसलं. वयानं राज हे उद्धव यांच्यापेक्षा लहान असले, तरी राजकारणात ते "सीनिअर'आहेत. राज हे भारतीय विद्यार्थी सेनेचे नेते होते आणि बेरोजगार तरुणांचे मोर्चे वगैरे काढत असत. 1990 च्या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडं आलं नि विदर्भ-मराठवाड्यात दौरे करून पक्ष रुजवणारे छगन भुजबळ साहजिकच रुसले. पुढच्याच वर्षी ते समर्थक आमदारांसह कॉं ग्रेसमध्ये गेले. म्हणजे एकीकडं शिवसेना विस्तारत होती व त्याच वेळी तिला संघटनात्मक प्रश्‍नांनाही तोंड द्यावं लागत होतं. उद्धव व राज यांचा शिवसेनेत नेते म्हणून उदय झाला, तो या पार्श्‍वभूमीवर. घराणेशाहीविरुद्ध पक्षात नाराजी असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, तेव्हा ठाकरे फॅमिलीच शिवसेनेचा त्याग करत असल्याची धक्कादायक घोषणा बाळासाहेबांनी केली. त्यामुळं सैनिक तापले व जुने- जाणते नेते थंड पडले. त्यातून राज-उद्धवच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं; परंतु 1999 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारांच्या तिकीटवाटपाच्या वेळी उभयतांत मतभेद होते. तेव्हापासून राज यांचे पंख कापण्यास सुरवात झाली. 2001-2002 च्या महापालिका निवडणुकीत मतभेद चव्हाट्यावर आले, तेव्हा मग राज-गटानं मुंबईत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना धूळ चाखण्यास भाग पाडलं. यथावकाश उद्धव कार्याध्यक्ष झाले. 2004 च्या विधानसभा निवडणुकीचं तिकीटवाटप उद्धव यांच्या इच्छेनुसार झालं. संघटनेवर उद्धव यांची पकड व बहुसंख्य आमदारही त्याच्याच गटाचे. त्यामुळं नारायण राणे व राज यांच्या बंडानं तरही शिवसेनेत उभी फूट पडली नाही; परंतु शिवसेनेची संघटनात्मक ताकद मात्र नक्कीच कमी झाली.



करिष्म्याचा वारसा आपल्याकडेच असल्याचं राज यांनी पक्षाबाहेर पडल्यावर सिद्ध करून दाखवलं. उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या मृत्यूनंतर मुकेश व अनिल अंबानी वेगवेगळे झाले. त्यांच्यातली कटुता मात्र आता कमी झालेली आहे.

उद्धव व राज यांच्यातलं वैमनस्य बाळासाहेबांच्या नजरेसमोरच प्रकटलं आणि उद्धव व बाळासाहेबांच्या आजारपणापासून राज हे भावनिकदृष्ट्या "मातोश्री'च्या जवळ आले आहेत; परंतु भावना वेगळ्या व राजकारण वेगळं.

मुकेश व अनिल यांच्या मनोमीलनानंतरही त्यांच्या कंपन्यांचं एकमेकांत विलीनीकरण झालेलं नाही. कॉंग्रेसबाहेर पडून राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना करण्यात आल्यानंतर दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले; पण तरीही राष्ट्रवादीनं आपली वेगळी "आयडेंटिटी' जपली आहे; "राष्ट्रवादीनं मूळ पक्षात विलीन व्हावं,' अशी इच्छा विलासराव देशमुखांपासून ते दिग्विजयसिंग यांच्यापर्यंत अनेकांनी व्यक्त केलेली असली, तरीही! त्यामुळं तूर्तास तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपलं अस्तित्व कायम ठेवेल. "मर्जर' झालं तर केडरमधील सत्तापदांच्या वाटणीचा मोठा पेच तयार होईल. काहींना तिकिटं व पदं मिळणार नाहीत. शिवाय, स्थानिक पातळीवर शत्रुत्व मिटवणं सोपं नसतं.

शिवसेनेची व मनसेची मतपेढी एकच असली, तरी दोघांची स्टाइल अलग अलग आहे. शाळेत जशी नापासांची यादी असते, तशी राजकीय निरीक्षकांकडंही एक यादी असते. बहुतेकांनी उद्धव यांना नापास केलंय! उद्धव भले "अमिताभ' नसेलही; पण तो "भारतभूषण'ही नाही, हे लक्षात घ्यायला हवं. उद्धव यांनी मुंबई पालिकेत शिवसेनेला सलग दोनदा विजय मिळवून दिला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वीजटंचाई, कुपोषण अशा प्रश्‍नांवर त्यांनी ग्रामीण भागांत जोरदार आंदोलनं केली आहेत.

ऊस, कापूस, कांद्याचा आधारभाव, निर्यातबंदी, दुष्काळ यांसारखे विषय त्यांनी हाताळले आहेत. जुन्यांपैकी दिवाकर रावते यांच्यासारख्या अभ्यासू नेत्याला उद्धव यांनी जवळ केलंय; तर महिलांच्या तसंच सामाजिक समस्या प्रभावीपणे मांडणाऱ्या डॉ. नीलम गोऱ्हे, पक्षाची व्यवस्थापकीय सूत्रं सांभाळणारे अनिल देसाई, पालिकेतले संयमी नेते सुनील प्रभू, आरोग्य व अन्य प्रश्‍न नेटानं लावून धरणारे डॉ. दीपक सावंत आणि ग्रामीण वेदनांना तोंड फोडणारे विजय शिवतारे असे नेते उद्धव यांच्या काळात पुढं आले आहेत.

बाळासाहेबांच्या स्मारकावरून वादाची काडी पेटवली ती मनोहर जोशी यांनी. उलट, "हा वाद थांबवावा,' असं संयमी आवाहन उद्धव यांनी केलं आहे. "मी मुंबईकर' असं सर्वसमावेशक आवाहनही त्यांनीच केलं होतं.

"अमुकला हाणा', "तमुकला अद्दल घडवा' अशी भाषा उद्धव यांनी कधीच केलेली नाही. बाळासाहेब हयात असताना उद्धव यांना शिवसेनेचा मूळ स्वभाव बदलता येणं शक्‍य नव्हतं. आजही या गोष्टी लगेच होणार नाहीत; परंतु मुळातच आनंद दिघे यांचा मृत्यू, छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज यांचा शिवसेनात्याग यामुळं शिवसेना आधीच निवळलेली आहे.

राज यांनी राडेबाजी आणि इतरांचा द्वेष करत मराठी मतांची मोळी बांधली; पण त्यांनी मनसे स्थापन होऊन सहा वर्षं उलटली तरीही राज्याच्या विकासाचा आराखडा जाहीर केलेला नाही. मागास विभागांचा अनुशेष, सिंचनाचे प्रश्‍न, सहकारी संस्थांचा कारभार, महिला, दलित यांची होत असलेली वंचना हे प्रश्‍न मनसेनं हातीच घेतलेले नाहीत.

शिवसेनेनं 1966 पासून पहिली पाच-सात वर्षं "ड्रामेबाजी' करून "सही रे सही' सारखे हिट प्रयोग केले. मनसे तोच कित्ता गिरवत आहे; परंतु जिथं हाती सत्ता आली, तिथंही या पक्षानं अपवादात्मक प्रमाणातच यश मिळवलंय. सत्तेत भागीदार असताना वा विरोधात असताना मनसेच्या नगरसेवकांनी फारशी चमक दाखवलेली नव्हती. नाशिकमध्ये व इतरत्र मनसेनं अन्य पक्षांसारख्याच तडजोडी केल्या आहेत. शिवसेनेला आता एका सळसळणाऱ्या संघटनेपासून सर्वसाधारण राजकीय पक्षाच्या दिशेनं वाटचाल करायची आहे; तर प्रस्थापितांसारखा व्यवहार करूनही मनसेला "रंग माझा वेगळा' असं दाखवायचंय!

शिवसेना ग्रामीण भागात घुसली तरी आहे; तर मनसे शहरकेंद्रित, त्यातही "सुवर्णचतुष्कोना'तच (मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद) भिरभिरत आहे. वास्तविक बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, प्रवीण दरेकर, शिरीष पारकर, राम कदम, वसंत गीते, संदीप देशपांडे असे कितीतरी "तेजतर्रार' मोहरे मनसेकडं आहेत; परंतु महिला, शेतकरी, दलित, आदिवासी, मागासांमधील नेतृत्व पुढं आणलं गेलेलं नाही. उद्धव भरपूर फिरले आहेत; राज त्यामानानं कमीच. तरुणांमधली राज यांची लोकप्रियता लक्षात घेऊन उद्धव यांनी आदित्यच्या नेतृत्वाखाली "युवा सेना' काढली आहे. बाळासाहेबांइतकेच राज हे आक्रमक, अस्मितावादी आणि थेट कृतीवर भर देणारे आहेत. उद्धव यांच्यापेक्षा राज यांच्याकडं मराठी बाणा अधिक आहे. उद्धव हे सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारे नाहीत; राज यांचं उलट आहे. त्यामुळं बाळासाहेबांचा नैसर्गिक वारसा राज यांच्याकडं येतो. उद्धव कुटुंबात रमणारा माणूस आहे. मात्र, तरीही संघटनाबा ंधणी, विकासाच्या समस्यांचं भान, जिद्द, कष्ट करण्याची व कठोर टीका सोसण्याची तयारी हे त्यांचे गुण आहेत. 1966 च्या वेळी मराठी माणसांना नोकऱ्या मिळत नव्हत्या. आता शिकल्या-सवरल्या मराठीजनांना पर्यटन, आयटी, हॉटेल व्यवस्थापन, निर्यातक्षेत्रात नोकऱ्या मिळत आहेत. ते व्यवसाय-उद्योगही करत आहेत. त्या वेळी कारखानदारी हे एकच क्षेत्र मुख्य होतं. आता सेवाक्षेत्रानं अर्थव्यवस्थेचा अर्धा-अधिक वाटा व्यापला आहे. तेव्हा लायसन्स-परमिट राज होतं, आज उदारीकरण येऊनही दोन दशकं लोटली आहेत. स्त्रियांना बऱ्यापैकी मोकळं आकाश मिळालं आहे. सांस्कृतिक संकल्पना बदलल्या आहेत. शेजारी देशांशी व राज्यांशी सौहार्द जपण्याचा हा काळ आहे. त्यामुळंच "एकही मारा, लेकिन सॉलिड मारा की नही?' यापेक्षा "करून दाखवलं'चा हा समय आहे! शिवसेनेचं नेतृत्व उद्धव हेच करतील व ते कदाचित पक्षाच्या ध्येयधोरणांत आमूलाग्र परिवर्तन आणतील. 2014 पर्यंत मनसे आपला पसारा वाढवू पाहील. निवडणुकीत दोन्ही पक्ष जागावाटपात समझोता करतील. या निवडणुकांत समजा दोघांपैकी एकजण अगदीच फिका पडला, तर एकत्रीकरणाची प्रक्रिया कदाचित गतिमान होईल. अशा वेळी "मर्ज्ड' पक्षात कार्याध्यक्षपदंही दोन निर्माण करता येतील. उद्धव व राज यांनी आपापला "इगो' मागं ठेवून हस्तांदोलन केलं, तर महाराष्ट्राचं राजकीय चित्रच बदलेल. सत्तेशिवाय आपापली पक्षांतर्गत सत्ता गोंजारत बसायचं की व्यक्तिगत त्याग करून एकत्रित पक्षाची सत्ता राज्यात आणायची, याचा निर्णय शेवटी या दोघांनीच घ्यायचा आहे. एकाधिकारशाहीवादी पक्ष असल्यानं सैनिकांच्या हातात मान डोलावण्याखेरीज दुसरं काही नाही...

-----------------------------------------------------------
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा वाद घालण्याची ही वेळ नाही. स्मारकावरून वाद घालणाऱ्यांनी आणि टीकेचा सूर काढणाऱ्यांनी आमच्या सगळ्यांच्या भावना समजून घ्याव्यात. ठाकरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवसेना परिवार या धक्‍क्‍यातून सावरलेला नसताना स्मारकाचा हा वाद का निर्माण व्हावा?
- उद्धव ठाकरे
-----------------------------------------------------------
पुढच्या पंधरा-वीस वर्षांनंतर जेव्हा कधी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष या देशात येईल, तेव्हा त्याच्या अजेंड्यावर एक गोष्ट नक्की पाहिजे, की मला महाराष्ट्रात जायचं आहे. तिकडं विदर्भात असं असं झालंय, तिकडं मराठवाड्यात असं असं झालंय...मला तिकडं जायचं आहे, भेट द्यायची आहे, हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला वाटलं पाहिजे...इथंपर्यंत माझा महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे.
- राज ठाकरे



रविवार, 18 नवंबर 2012

बाळासाहेबांची अंत्ययात्रा शिवाजी पार्कमध्ये दाखल

बाळासाहेबांची अंत्ययात्रा शिवाजी पार्कमध्ये दाखल
 

- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, November 17, 2012 AT 05:11 PM (IST)

मुंबई- "जय भवानी, जय शिवाजी', "अमर रहे, अमर रहे, बाळासाहेब अमर रहे',"आवाज कुणाचा... शिवसेनेचा' अशा गगनभेदी घोषणांच्या निनादात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा शिवाजी पार्कमध्ये नुकतीच दाखल झाली.

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत, सुपरस्टार अमिताभ बच्चन, उद्योजक अनिल अंबानी, लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, खासदार राजीव शुक्ला, भाजपचे नेते अरुण जेटली, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, अभिनेते नाना पाटेकर, रितेश देशमुख यांच्यासह अनेक लहान-मोठे कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर शिवाजी पार्कमध्ये उपस्थित आहेत.

बाळासाहेबांचे पार्थिव काही काळ शिवसेना भवनात ठेवल्यानंतर अंत्ययात्रा शिवाजी पार्ककडे मार्गस्थ झाली होती. नुकतीच अंत्ययात्रा शिवाजी पार्कमध्ये दाखल झाली आहे. आज (रविवार) संध्याकाळी सहाच्या सुमारास बाळासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. अंत्ययात्रा "मातोश्री' येथून वेस्टर्न एक्‍स्प्रेस हायवे, त्यानंतर माहीम, माटुंगा आणि नंतर "शिवसेना भवन' येथे दाखल आली होती. आता अंत्ययात्रा शिवाजी पार्कमध्ये आली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेला आज सकाळी सुरवात झाली. यावेळी महारथावर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, पत्नी रश्‍मी ठाकरे यांच्यासह इतर कुटुंबीय उपस्थित होते. "मनसे"चे अध्यक्ष राज ठाकरेही अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अंत्ययात्रा सुरू होण्यापूर्वी "मातोश्री'समोर पोलिसांनी शासकीय इतमामात बाळासाहेबांना मानवंदना दिली.

मराठी अस्मितेचा आवाज बुलंद करणारे, आपल्या अफलातून व्यंग्यचित्रांनी कधी फटकारे; तर कधी आधार देणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (वय 86) नावाचा झंझावात काल दुपारी शांत झाला. वांद्य्रातील कलानगरमधील "मातोश्री' या आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला अन्‌ जमलेल्या असंख्य शिवसैनिकांच्या अश्रूंचा बांध फुटला... गेली चार दशके महाराष्ट्राचे राजकारण अक्षरशः ढवळून काढणाऱ्या शिवसेनाप्रमुखांवर आज (ता. 18) मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा आज (रविवारी) सकाळी साडेसात वाजता मातोश्री बंगल्यापासून निघणार असून, ती शिवाजी पार्क येथे जाईल. तिथे अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात येत असून, संध्याकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच मुंबईतील सर्व व्यवहार ठप्प झाले. अवघ्या काही मिनिटांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या निधनाचे वृत्त पसरले आणि पाहता पाहता महाराष्ट्र जणू जागच्या जागी थांबला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचा "ढाण्या वाघ' हरपल्याची भावना महाराष्ट्रात उमटली.

शिवसेनाप्रमुखांची प्रकृती ढासळत असल्याचे यंदाच्या दसरा मेळाव्यात दाखविलेल्या त्यांच्या चित्रफितीवरून स्पष्ट झाले होते. त्यांनी स्वत:च तसे बोलूनही दाखविले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली. मंगळवार (ता. 13 नोव्हेंबर) रात्रीपासून ते अत्यवस्थच होते. मात्र, ते या दुखण्यातूनही बाहेर येतील, असा लाखो शिवसैनिकांचा आणि चाहत्यांचा दुर्दम्य आशावाद होता. पण, अखेर या नेत्याची प्राणज्योत दुपारी मालवली. त्या वेळी ठाकरे कुटुंबातील प्रत्येक जण, सर्व शिवसेना नेते तसेच त्यांच्यावर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्‍टर्स उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुखांचे अंत्यदर्शन घेता यावे म्हणून मुंबईतील उपनगरी रेल्वेवरील रविवारचा मेगा ब्लॉक रद्द केला आहे. एसटी व बेस्टतर्फे जादा बसेस सोडण्यात येण्याची शक्‍यता आहे. वाहतूक वगळता मुंबईतील अन्य व्यवहार उद्याही बंद राहण्याची शक्‍यता आहे. अंत्यदर्शनासाठी राज्यभरातून काही लाख लोक येतील, हे लक्षात घेऊन पोलिसांनी शहरभर बंदोबस्त वाढविला आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी राज्य राखीव पोलिस व केंद्रीय राखीव दलाचे जवान असतील.

गेली 45 वर्षे शिवसेनाप्रमुख समोर येताच, "आव्वाज कुणाचा, शिवसेनेचा...' अशा जोरदार घोषणा देणाऱ्या शिवसैनिकांचा आवाज त्यांच्या निधनाच्या वृत्ताने फुटेनासा झाला. शिवसेनाप्रमुख आपल्यात राहिले नाहीत, हेच त्यांना सहन होत नव्हते. ज्याने मराठी माणसाच्या न्याय्य हक्‍कांसाठी 50 वर्षे लढा दिला, असंख्य मराठी तरुणांना नोकऱ्या वा रोजगार मिळवून दिला आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वाभिमान मिळवून दिला; तो नेता यापुढे पाहायला मिळणार नाही, ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. "मातोश्री' या त्यांच्या निवासस्थाच्या आतील आणि बाहेरील वातावरण हेलावून टाकणारे होते. पुरुष, महिला, लहान मुले, तरुण, तरुणी रडताना पाहून त्यांना धीर देणारे नेतेही गलबलून जात होते.

शिवसेनाप्रमुखांच्या निधनाची घोषणा होताच, तेथे उपस्थित असलेल्या नेत्यांनाच नव्हे, तर अनेक वर्षे त्यांच्यासमवेत असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही रडू कोसळले. रस्त्यावर असलेल्या शिवसैनिकांनी तर हंबरडाच फोडला. शिवसेनेच्या यानंतरच्या एकाही सभेत बाळासाहेब दिसणार नाहीत आणि त्यांचा आवाजही ऐकायला मिळणार नाही, याचे दु:ख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटले होते



बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेत राज ठाकरेंची पदयात्रा

बाळासाहेबांच्या अंत्ययात्रेत राज ठाकरेंची पदयात्रा

- वृत्तसंस्था
Sunday, November 18, 2012 AT 03:44 PM (IST)

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे पायी चालत सहभागी झाले होते.

मातोश्री या बाळासाहेबांच्या निवासस्थानापासून सुरु झालेली अंत्ययात्रा दादरमध्ये दाखल झाल्यानंतर राज ठाकरे आपल्या 'कृष्णकुंज' या निवासस्थानी गेले. तेथून ते शिवाजी पार्कवर येणार आहेत. दादरमधील शिवसेना भवनामध्ये बाळासाहेबांचे पार्थिव काही काळ ठेवण्यात येणार असल्याने राज ठाकरेंनी कृष्णकुंजची वाट धरल्याचे बोलले जात आहे.

अंत्ययात्रेत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह सर्व ठाकरे कुटुंबीय बाळासाहेबांच्या पार्थिवासोबत असताना, राज ठाकरे आपल्या समर्थकांसोबत चालत आहेत. शिवाजी पार्कवरील सर्व व्यवस्थेचा आढावा घेऊन ते सकाळी आठ वाजता 'मातोश्री'वर पोचले होते



बाळासाहेबांची अंत्ययात्रा माटुंगा परिसरात

बाळासाहेबांची अंत्ययात्रा माटुंगा परिसरात

- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, November 17, 2012 AT 05:11 PM (IST)

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेत अथांग जनसागर सहभागी झाला आहे. "जय भवानी, जय शिवाजी', "अमर रहे, अमर रहे, बाळासाहेब अमर रहे',"आवाज कुणाचा... शिवसेनेचा',"आला आला कोण आला, शिवसेनेचा वाघ आला,' अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला आहे. त्यांच्या चाहत्यांच्या मनातील दुःख डोळ्यांतून भळाभळा वाहत असल्याचे दिसून येत आहे. अंत्ययात्रा वेस्टर्न एक्‍स्प्रेस हायवेनंतर माहीम आणि आता माटुंगा परिसरात दाखल आली आहे. थोड्याच वेळात अंत्ययात्रा शिवसेना भवनासमोर येणार असल्याचे समजते.

बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेला सकाळी सुरवात झाली. त्यांचे पार्थिव असलेला महारथ शिवसेना भवनाकडे मार्गक्रमण करीत आहे. महारथावर त्यांचे कुटुंबीय उपस्थित आहेत. "मनसे"चे अध्यक्ष राज ठाकरेही अंत्ययात्रेत सहभागी झाले आहेत. अंत्ययात्रा सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी शासकीय इतमामात बाळासाहेबांना मानवंदना दिली. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

मराठी अस्मितेचा आवाज बुलंद करणारे, आपल्या अफलातून व्यंग्यचित्रांनी कधी फटकारे; तर कधी आधार देणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (वय 86) नावाचा झंझावात काल दुपारी शांत झाला. वांद्य्रातील कलानगरमधील "मातोश्री' या आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला अन्‌ जमलेल्या असंख्य शिवसैनिकांच्या अश्रूंचा बांध फुटला... गेली चार दशके महाराष्ट्राचे राजकारण अक्षरशः ढवळून काढणाऱ्या शिवसेनाप्रमुखांवर आज (ता. 18) मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा आज (रविवारी) सकाळी साडेसात वाजता मातोश्री बंगल्यापासून निघणार असून, ती शिवाजी पार्क येथे जाईल. तिथे अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात येत असून, संध्याकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच मुंबईतील सर्व व्यवहार ठप्प झाले. अवघ्या काही मिनिटांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या निधनाचे वृत्त पसरले आणि पाहता पाहता महाराष्ट्र जणू जागच्या जागी थांबला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचा "ढाण्या वाघ' हरपल्याची भावना महाराष्ट्रात उमटली.

शिवसेनाप्रमुखांची प्रकृती ढासळत असल्याचे यंदाच्या दसरा मेळाव्यात दाखविलेल्या त्यांच्या चित्रफितीवरून स्पष्ट झाले होते. त्यांनी स्वत:च तसे बोलूनही दाखविले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली. मंगळवार (ता. 13 नोव्हेंबर) रात्रीपासून ते अत्यवस्थच होते. मात्र, ते या दुखण्यातूनही बाहेर येतील, असा लाखो शिवसैनिकांचा आणि चाहत्यांचा दुर्दम्य आशावाद होता. पण, अखेर या नेत्याची प्राणज्योत दुपारी मालवली. त्या वेळी ठाकरे कुटुंबातील प्रत्येक जण, सर्व शिवसेना नेते तसेच त्यांच्यावर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्‍टर्स उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुखांचे अंत्यदर्शन घेता यावे म्हणून मुंबईतील उपनगरी रेल्वेवरील रविवारचा मेगा ब्लॉक रद्द केला आहे. एसटी व बेस्टतर्फे जादा बसेस सोडण्यात येण्याची शक्‍यता आहे. वाहतूक वगळता मुंबईतील अन्य व्यवहार उद्याही बंद राहण्याची शक्‍यता आहे. अंत्यदर्शनासाठी राज्यभरातून काही लाख लोक येतील, हे लक्षात घेऊन पोलिसांनी शहरभर बंदोबस्त वाढविला आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी राज्य राखीव पोलिस व केंद्रीय राखीव दलाचे जवान असतील.

गेली 45 वर्षे शिवसेनाप्रमुख समोर येताच, "आव्वाज कुणाचा, शिवसेनेचा...' अशा जोरदार घोषणा देणाऱ्या शिवसैनिकांचा आवाज त्यांच्या निधनाच्या वृत्ताने फुटेनासा झाला. शिवसेनाप्रमुख आपल्यात राहिले नाहीत, हेच त्यांना सहन होत नव्हते. ज्याने मराठी माणसाच्या न्याय्य हक्‍कांसाठी 50 वर्षे लढा दिला, असंख्य मराठी तरुणांना नोकऱ्या वा रोजगार मिळवून दिला आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वाभिमान मिळवून दिला; तो नेता यापुढे पाहायला मिळणार नाही, ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. "मातोश्री' या त्यांच्या निवासस्थाच्या आतील आणि बाहेरील वातावरण हेलावून टाकणारे होते. पुरुष, महिला, लहान मुले, तरुण, तरुणी रडताना पाहून त्यांना धीर देणारे नेतेही गलबलून जात होते.

शिवसेनाप्रमुखांच्या निधनाची घोषणा होताच, तेथे उपस्थित असलेल्या नेत्यांनाच नव्हे, तर अनेक वर्षे त्यांच्यासमवेत असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही रडू कोसळले. रस्त्यावर असलेल्या शिवसैनिकांनी तर हंबरडाच फोडला. शिवसेनेच्या यानंतरच्या एकाही सभेत बाळासाहेब दिसणार नाहीत आणि त्यांचा आवाजही ऐकायला मिळणार नाही, याचे दु:ख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटले होते



शनिवार, 17 नवंबर 2012

"मातोश्री'समोर जनसागर लोटला

"मातोश्री'समोर जनसागर लोटला



- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, November 17, 2012 AT 05:11 PM (IST)

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी "मातोश्री'समोर अथांग जनसागर लोटला आहे. "जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला आहे. त्यांच्या चाहत्यांच्या मनातील दुःख डोळ्यांतून भळाभळा वाहत असल्याचे दिसून येत आहे. थोड्याच वेळात अंत्ययात्रेला सुरवात होणार असल्याचे समजते. अंत्ययात्रेसाठी महारथ तयार करण्यात आला आहे. शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह ज्येष्ठ-वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित आहेत. "मनसे"चे अध्यक्ष राज ठाकरेही "मातोश्री'वर दाखल झाल्याचे समजते.

मराठी अस्मितेचा आवाज बुलंद करणारे, आपल्या अफलातून व्यंग्यचित्रांनी कधी फटकारे; तर कधी आधार देणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (वय 86) नावाचा झंझावात काल दुपारी शांत झाला. वांद्य्रातील कलानगरमधील "मातोश्री' या आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला अन्‌ जमलेल्या असंख्य शिवसैनिकांच्या अश्रूंचा बांध फुटला... गेली चार दशके महाराष्ट्राचे राजकारण अक्षरशः ढवळून काढणाऱ्या शिवसेनाप्रमुखांवर आज (ता. 18) मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा आज (रविवारी) सकाळी साडेसात वाजता मातोश्री बंगल्यापासून निघणार असून, ती शिवाजी पार्क येथे जाईल. तिथे अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात येत असून, संध्याकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच मुंबईतील सर्व व्यवहार ठप्प झाले. अवघ्या काही मिनिटांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या निधनाचे वृत्त पसरले आणि पाहता पाहता महाराष्ट्र जणू जागच्या जागी थांबला. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचा "ढाण्या वाघ' हरपल्याची भावना महाराष्ट्रात उमटली.

शिवसेनाप्रमुखांची प्रकृती ढासळत असल्याचे यंदाच्या दसरा मेळाव्यात दाखविलेल्या त्यांच्या चित्रफितीवरून स्पष्ट झाले होते. त्यांनी स्वत:च तसे बोलूनही दाखविले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली. मंगळवार (ता. 13 नोव्हेंबर) रात्रीपासून ते अत्यवस्थच होते. मात्र, ते या दुखण्यातूनही बाहेर येतील, असा लाखो शिवसैनिकांचा आणि चाहत्यांचा दुर्दम्य आशावाद होता. पण, अखेर या नेत्याची प्राणज्योत दुपारी मालवली. त्या वेळी ठाकरे कुटुंबातील प्रत्येक जण, सर्व शिवसेना नेते तसेच त्यांच्यावर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्‍टर्स उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुखांचे अंत्यदर्शन घेता यावे म्हणून मुंबईतील उपनगरी रेल्वेवरील रविवारचा मेगा ब्लॉक रद्द केला आहे. एसटी व बेस्टतर्फे जादा बसेस सोडण्यात येण्याची शक्‍यता आहे. वाहतूक वगळता मुंबईतील अन्य व्यवहार उद्याही बंद राहण्याची शक्‍यता आहे. अंत्यदर्शनासाठी राज्यभरातून काही लाख लोक येतील, हे लक्षात घेऊन पोलिसांनी शहरभर बंदोबस्त वाढविला आहे. मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी राज्य राखीव पोलिस व केंद्रीय राखीव दलाचे जवान असतील.

गेली 45 वर्षे शिवसेनाप्रमुख समोर येताच, "आव्वाज कुणाचा, शिवसेनेचा...' अशा जोरदार घोषणा देणाऱ्या शिवसैनिकांचा आवाज त्यांच्या निधनाच्या वृत्ताने फुटेनासा झाला. शिवसेनाप्रमुख आपल्यात राहिले नाहीत, हेच त्यांना सहन होत नव्हते. ज्याने मराठी माणसाच्या न्याय्य हक्‍कांसाठी 50 वर्षे लढा दिला, असंख्य मराठी तरुणांना नोकऱ्या वा रोजगार मिळवून दिला आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वाभिमान मिळवून दिला; तो नेता यापुढे पाहायला मिळणार नाही, ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. "मातोश्री' या त्यांच्या निवासस्थाच्या आतील आणि बाहेरील वातावरण हेलावून टाकणारे होते. पुरुष, महिला, लहान मुले, तरुण, तरुणी रडताना पाहून त्यांना धीर देणारे नेतेही गलबलून जात होते.

शिवसेनाप्रमुखांच्या निधनाची घोषणा होताच, तेथे उपस्थित असलेल्या नेत्यांनाच नव्हे, तर अनेक वर्षे त्यांच्यासमवेत असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही रडू कोसळले. रस्त्यावर असलेल्या शिवसैनिकांनी तर हंबरडाच फोडला. शिवसेनेच्या यानंतरच्या एकाही सभेत बाळासाहेब दिसणार नाहीत आणि त्यांचा आवाजही ऐकायला मिळणार नाही, याचे दु:ख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटले होते



गुरुवार, 15 नवंबर 2012

काळजीनंतर दिलासा

काळजीनंतर दिलासा
 

-
Friday, November 16, 2012 AT 12:00 AM (IST)

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गेल्या काही दिवसांपासून खालावलेली प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी आश्‍वासक घोषणा शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी गुरुवारी संध्याकाळी केली आणि ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर पसरलेले तणावाचे तसेच चिंतेचे वातावरण काही प्रमाणात तरी निवळले. पाठोपाठ उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनीही तशीच ग्वाही दिली असून, लोकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन उद्धव यांनी केले.

दिवाळीत पाडव्याच्या दिवशी, बुधवारी रात्री ठाकरे यांची प्रकृती झपाट्याने बिघडत असल्याचे वृत्त आले आणि मुंबई तसेच राज्यभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. शिवसेनेच्या बहुतेक बड्या नेत्यांबरोबरच एकेकाळचे "शिवसैनिक' छगन भुजबळ आणि बाळासाहेबांचे सुहृद अमिताभ बच्चन यांनीही मध्यरात्रीच्या सुमारास "मातोश्री' या ठाकरे यांच्या निवासस्थानी धाव घेतल्यामुळे वातावरण अधिकच काळजीचे बनले. त्यामुळे गुरुवारी मुंबईचा माहोल भाऊबीज असूनही अगदीच वेगळा होता. अवघ्या मुंबापुरीने काळजीपोटी "अघोषित बंद' पुकारल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. त्यात सकाळीच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मुंबई दौरा रद्द केल्याचे व पाठोपाठ पोलिसांच्या सुट्याही रद्द झाल्याच्या बातम्या आल्या आणि अफवांचे पीक आले.

पण देसाई यांनी गुरुवारी संध्याकाळी बाळासाहेब औषधोपचाराला प्रतिसाद देत असल्याचे जाहीर करताच, "मातोश्री'वर जमलेल्या हजारो शिवसैनिकांचा नूरच पालटला आणि त्यांनी एकसाथ "गणपती बाप्पा मोरया!'चा गजर सुरू केला. "दवा आणि दुवा यांचा हा परिणाम आहे,' असे देसाई यांनी सांगितले.
त्यापूर्वी बुधवारी रात्रीपासूनच तेथे मोठ्या संख्येने केवळ मुंबईतीलच नव्हे तर राज्याच्या अन्य भागांतूनही बाळासाहेबांचे चाहते जमा होऊ लागले होते. पण त्यांना अधिकृत माहिती काहीच मिळत नव्हती, तरी नेहमीचा उफाळणारा शिवसैनिक स्तब्ध उभा राहून, मूकपणे "मातोश्री'कडे नजर लावून तासन्‌ तास उभा होता. त्यात महिलांची संख्या तर लक्षणीय होती. या चाहत्यांमध्ये मशिदीतील जपमाळ घेतलेले काही मुस्लिम आणि तुळशीच्या माळा घातलेली मराठी माणसेही प्रार्थना करताना दिसत होती. सगळेच वातावरण सद्‌गदित करणारेच होते. पण संध्याकाळनंतर वातावरण आशादायी बनले आणि सगळ्यांनीच बाळासाहेबांच्या प्रकृतीला आराम पडो, अशा प्रार्थना सुरू केल्या. मुंबई आणि राज्याच्या अन्य काही भागांतील "बंद'ही निवळत गेला आणि वातावरण सुरळीत होत गेले.

तत्पूर्वी, प्रचंड पोलिस बंदोबस्त असतानाही बुधवारी मध्यरात्रीपासून वातावरणात तणाव होता; मात्र कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पहाटे दोन वाजता शिवसैनिकांना शांततेचे आवाहन करीत शिवसेनाप्रमुखांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. "मातोश्री'बाहेर येणाऱ्या शिवसेनेच्या नेत्याने अथवा पदाधिकाऱ्याने बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगताच शिवसैनिक जल्लोष करत होते. "बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद'च्या घोषणा देत होते. त्यातही "एकच साहेब, बाळासाहेब' ही घोषणा अधिक लक्षवेधी ठरत होती.

"मातोश्री'वरून आलेल्या नेत्यांचा "बाईट' घेण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांची धावपळ सुरू होती; मात्र शिवसेनाप्रमुख "स्टेबल' एवढीच प्रतिक्रिया मिळत होती. कलानगरला गडकोटाचे स्वरूप आले होते. आत काय घडतेय, याची काळजी प्रत्येकालाच होती.

"मातोश्री'वर रीघ
राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप अध्यक्ष नितीन गडकरी, ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, उद्योगपती राहुल बजाज, उद्योगपती वेणुगोपाल धूत, शिवसेना नेते मनोहर जोशी, चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल, एकनाथ शिंदे, अनंत गिते, विनोद तावडे, हुसेन दलवाई, साबीर शेख, आनंदराव अडसूळ, अनिल देसाई, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, गणेश नाईक, सरदार तारासिंग, बॉबी बिंद्रा, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, नाना पाटेकर, संजय दत्त, सलीम खान, सलमान खान, अरबाज खान, मधुर भांडारकर, महेश मांजरेकर, मनोजकुमार, राज बब्बर, रणधीर कपूर, हरिहरन, गोविंदा, विक्रम गोखले, रमेश देव, अजिंक्‍य देव, विनय आपटे यांच्यासह अनेक राजकीय नेते, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी "मातोश्री'वर आले होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बाळासाहेबांची जातीने विचारपूस केल्यावर "उदो हो उदो! बाळासाहेब यातून बाहेर निघतील... त्यांना आई जगदंबेचा आशीर्वाद आहे....' अशी ग्वाही दिली.

ओबी व्हॅन फोडली
बुधवार संध्याकाळपासूनच "मातोश्री'च्या दिशेने शिवसैनिकांची पावले वळू लागली. त्यातच एका वृत्तवाहिनीने शिवसेनाप्रमुख अत्यव्यस्थ अशी बातमी प्रसिद्ध केल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी त्या वृत्तवाहिनीची ओबी व्हॅन फोडली. शिवसैनिकांच्या गर्दीमुळे "मातोश्री' परिसरातील रस्त्यांवर चक्का-जाम झाला होता. गुरुवारी पहाटे अडीचनंतर येथील गर्दी ओसरू लागली.



शनिवार, 10 नवंबर 2012

बाळासाहेबांची प्रकृती स्थिर - राज ठाकरे

बाळासाहेबांची प्रकृती स्थिर - राज ठाकरे


Sunday, November 11, 2012 AT 08:22 AM (IST)

मुंबई - "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती स्थिर आहे,' अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी रात्री अकरा वाजता दिली.

"बाळासाहेबांनी बोलविल्यावरून मी कुटुंबीयांसह त्यांना भेटायला "मातोश्री'वर आलो. त्यांची प्रकृती स्थिर आहे. चिंता करण्याचे काही कारण नाही. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत सुरु असलेल्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये,' असेही राज यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, शनिवारी अनेक नेत्यांनी "मातोश्री'वर भेट देऊन बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि देवीसिंह शेखावत यांनी संध्याकाळी बाळासाहेबांची भेट घेतली



शनिवार, 27 अक्तूबर 2012

बाळासाहेबांच्या हाकेला राज ठाकरेंचा प्रतिसाद

बाळासाहेबांच्या हाकेला राज ठाकरेंचा प्रतिसाद
- सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, October 27, 2012 AT 03:45 AM (IST)मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या भावनिक हाकेला तत्काळ प्रतिसाद देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी "मातोश्री'वर धाव घेतली. सुमारे दीड तास राज "मातोश्री'वर उपस्थित होते. गेल्या महिन्याभरात प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज दुसऱ्यांदा "मातोश्री'वर आले होते.

दुपारी साडेबारा वाजता "मातोश्री'वर आलेले राज ठाकरे दोनच्या सुमारास "मातोश्री'च्या बाहेर पडले. पण त्यांनी या भेटीबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. राज यांच्या भेटीच्या वेळी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेही उपस्थित असल्याचे समजते. पण ही कौटुंबिक बाब असल्याचे सांगत दोन्ही पक्षांच्या वतीने या भेटीची सविस्तर माहिती देणे टाळण्यात आले.

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी शिवसेनेचे दादर पडल्याचे दुःख व्यक्त केले होते. मनसेचे नाव न घेता मराठी मतांचे तुकडे पाडल्यानेच हा पराभव झाल्याची खंत व्यक्त करून यापुढे मराठी माणसाने एकजुटीने शिवसेनेच्या मागे उभे राहण्याचे भावनिक आवाहन केले होते. ही हाक केवळ मराठी माणसालाच नव्हे, तर मनसेचे अध्यक्ष राज यांच्यासाठीही होती, असे मानले जात होते. विशेष म्हणजे या हाकेला प्रतिसाद देत राज तत्काळ "मातोश्री'वर दाखल झाल्याचे पाहावयास मिळाले. दसरा मेळाव्यात "मला आता चालवतही नाही,' असे उद्‌गार बाळासाहेबांनी काढताच शिवाजी पार्कवरील लाखो शिवसैनिकांच्या जिवाची घालमेल झाली होती. एरवी मेळाव्यानंतरही घोषणांनी दुमदुमणारा शिवाजी पार्क बाळासाहेबांच्या भाषणानंतर मात्र यंदा निःशब्द झाल्याचे पाहावयास मिळाले होते. अशा वेळी राज यांनी बाळासाहेबांची घेतलेली भेट ही राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची मानली जात आहे



बुधवार, 24 अक्तूबर 2012

राज ठाकरे यांची तोफ नववर्षापासून पुन्हा धडाडणार

राज ठाकरे यांची तोफ नववर्षापासून पुन्हा धडाडणार
-
Thursday, October 25, 2012 AT 03:45 AM (IST)

मुंबई - मी सध्या काय करतोय, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. पण मी कुठेही गेलेलो नाही. सणासुदीचे दिवस असल्याने मी गप्प आहे. मात्र नववर्षापासून माझी तोफ पुन्हा धडाडू लागेल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे स्पष्ट केले.

सहकारी बॅंक नवनिर्माण कर्मचारी सेनेच्या करी रोड येथील कार्यालयाचे आज राज ठाकरे यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, मंगेश सांगळे, प्रकाश भोईर, नाशिकचे महापौर यतिन वाघ, मनसेचे सरचिटणीस प्रवीण दरेकर, पुणे महापालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे, महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे अध्यक्ष शिवाजीराव नलावडे, मुंबई विभागीय अध्यक्ष नितीन बनकर व संयुक्त सरचिटणीस अनिल गजरे, सहकारी बॅंक नवनिर्माण कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष विनायक म्हशीलकर व खजिनदार अमिन शेख आदी उपस्थित होते.

सहकार क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी, सहकार क्षेत्रातील कामगार, बेरोजगार, महिला, शेतकऱ्यांना त्यांचे हक्क व अधिकारांची माहिती देण्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी मनसेने सहकारी बॅंक नवनिर्माण कर्मचारी सेनेची स्थापना झाली आहे, असे शिवाजीराव नलावडे सांगितले.

राज्यात सव्वादोन लाख नोंदणीकृत सहकार संस्था आहेत. या संस्थांचे 8 कोटी 80 लाख सभासद आहेत. आमचे स्वयंसेवक या सभासदांना त्यांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन करतील. त्यादृष्टीने या स्वयंसेवकांना आवश्‍यक प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती नलावडे यांनी या कार्यक्रमांनतर "सकाळ'ला दिली



बुधवार, 26 सितंबर 2012

राज ठाकरेंना फुल देणाऱ्या पोलिसावर कारवाई

राज ठाकरेंना फुल देणाऱ्या पोलिसावर कारवाई
- वृत्तसंस्था
Wednesday, September 26, 2012 AT 12:00 PM (IST)
मुंबई - काही दिवसांपूर्वी भर सभेमध्ये व्यासपीठावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद तावडे यांनी गुलाबपुष्प दिले होते. याप्रकरणी शिस्तभंगाच्या कारवाईला तावडे यांना सामोरे जावे लागणार आहे. तशी कारवाई सुरु झाली आहे.

ऑगस्ट महिन्यात मुंबईमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रॅली काढली होती. गिरगाव चौपाटीवर त्यांची सभासुद्धा झाली. यावेळी पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद तावडे यांनी व्यासपीठावर जाऊन राज ठाकरे यांना गुलाबपुष्प दिले होते. पोलिसांची बाजू मांडल्याबाबत त्यांचे अभिनंदनही केले. त्यामुळे तावडे एका क्षणात महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले. मात्र, त्यांना आता याची किंमत मोजावी लागणार आहे. उपायुक्त बीएम यादव (वायरलेस) या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. यासंदर्भातील अहवाल लवकराच लवकर उपायुक्तांपुढे सादर करण्याचे आदेश मिळाले आहेत.

पोलिस कॉन्स्टेबल तावडे हे भायखळा वायरलेस डिव्हीजन अंतर्गत त्यादिवशी ड्यूटीवर होते. वरिष्ठांची परवानगी न घेता किंवा वरिष्ठांना कल्पना न देता ड्यूटीची जागा सोडणे, अंगावर वर्दी असताना एखाद्या राजकीय कार्यक्रमात सहभागी होत नेत्याला गुलाबपुष्प देणे आणि अंगावर वर्दी असताना प्रसारमाध्यमांसमोर पोलिस खात्यासंदर्भातील चुकिचे मत मांडणे हे तीन आरोप त्यांच्यावर, ठेवण्यात आले आहेत

मंगलवार, 25 सितंबर 2012

अजित पवारांचा राजीनामा ही नौटंकी - राज

अजित पवारांचा राजीनामा ही नौटंकी - राज
- सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, September 26, 2012 AT 04:00 AM (IST)
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनामा अस्त्राकडे राज्यातील राजकीय भूकंप म्हणून पाहिले जात असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या राजीनाम्याची संभावना "नौटंकी' म्हणून केली आहे; तर शिवसेनेच्या वतीने हा राजीनामा म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमधील अंतर्गत कलहाचा परिपाक असल्याची टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी या राजीनाम्याच्या विषयावर अधिक भाष्य टाळून आपली प्रतिक्रिया केवळ "नौटंकी' एवढेच असल्याचे स्पष्ट केले; तर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी हा राजीनामा म्हणजे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एकमेकांवरील कुरघोडीचा परिपाक असल्याचे सांगितले. गेली 15 वर्षे महाराष्ट्रात हे दोन्ही पक्ष केवळ एकमेकांचे पाय खेचण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्याचीच परिणती म्हणून हा राजीनामा देण्यात आला असल्याची टीका त्यांनी केली

मंगलवार, 18 सितंबर 2012

राज्यात परकी गुंतवणूक आवश्यक - राज

राज्यात परकी गुंतवणूक आवश्यक - राज
- सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 18, 2012 AT 05:48 PM (IST)

मुंबई- केंद्र सरकारने रिलेटमध्ये परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिल्यानंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या गुंतवणुकीला पूर्णपणे पाठिंबा दर्शविला आहे. राज्यात परकी गुंतवणूक आलीच पाहिजे, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

राज ठाकरे म्हणाले, 'थेट परकी गुंतवणुकीमुळे (एफडीआय) राज्यात रोजगार निर्माण होतील, त्यामुळे त्याला विरोध करता कामा नये. परदेशी कंपन्यांनी फक्त स्थानिक व मराठी माणसाला रोजगार द्यायला हवा. या कंपन्यांमध्ये कोणत्याही प्रकारे परप्रतीयांची भरती खपवून घेतली जाणार नाही. 'एफडीआय'मुळे नवनवीन रोजगार निर्माण होतील, त्यामुळे या गुंतवणुकीला 'मनसे' संपूर्ण पाठिंबा देत आहे. मात्र, ज्या राज्यांनी 'एफडीआय'ला विरोध केला आहे, त्या राज्यांमधील लोंढे येथे येता कामा नयेत.'

डिझेल दरवाढीला 'मनसे'ने विरोध केला असून, डिझेल दरवाढीवरील कर महाराष्ट्र सरकारने कमी करावेत. त्याचबरोबर 'भारत बंद'मध्ये मनसे सहभाग घेणार नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले






रविवार, 16 सितंबर 2012

न्यूज, व्ह्यूज आणि इन्फोटेन्मेंट! (समीरण वाळवेकर)

न्यूज, व्ह्यूज आणि इन्फोटेन्मेंट! (समीरण वाळवेकर)
समीरण वाळवेकर sameeranw@gmail.com
Sunday, September 16, 2012 AT 03:15 AM (IST)

माध्यमांच्या गजबजाटात प्रत्येकाचा एक "अजेंडा' असतो. प्रत्येकाची एक भूमिका किंवा दृष्टिकोन असतो. "आपल्याला वाटतं तेच खरं किंवा तेच सत्य' असाच साऱ्यांचा आवेश असतो. घटना घडत असतात. त्या घडण्यामागं किंवा घडवण्यामागं अनेक "फोर्सेस' कार्यरत असतात; पण राजकारणी, माध्यमं आणि वाचक किंवा प्रेक्षक-श्रोते आपापल्या चष्म्यातून त्या घटनांकडं बघत असतात, त्यावर प्रतिक्रिया देत असतात. सध्या तर असं चित्र दिसतंय, की माध्यमं आणि राजकारणी, दोघंही सर्रास आणि व्यवस्थितपणे एकमेकांचा वापर करून घेत आहेत!

काही राजकीय नेत्यांच्या मुलाखती, सभा आणि बातम्या प्रादेशिक वाहिन्यांना "टीआरपी' आणि जास्त प्रेक्षक-श्रोते मिळवून देतात. त्यात त्या नेत्यांचाही फायदा असला, तरी माध्यमं सदासर्वदा त्यांना उचलून धरतील, असं नाही. वेळ आली तर माध्यमांनीही राजकीय नेत्यांना टीकास्त्रानं घायाळ केलेलं आहे. माध्यमं आणि राजकीय नेत्यांना एकमेकांचा फायदा होत असला तरी यापुढं त्यांना एकमेकांना गृहीत धरता येणार नाही. काही महिन्यांनी येणाऱ्या निवडणुका माध्यमांद्वारा खेळल्या जाण्याची शक्‍यता अधिक आहे. इलेक्‍ट्रॉनिक जगतात वाहिन्यांवर नव्यानं सुरू झालेल्या "इन्फोटेन्मेंट'मुळे "न्यूज आणि व्ह्यूज' दोहोंचीही सरमिसळ अपरिहार्य झाली आहे. जनतेच्या मनातला उद्रेक छोट्या पडद्यावर दिसला तरी तो मतपेटीत परावर्तित होईल का आणि माध्यमं जनमत घडवतील का, हे खरे प्रश्‍न आहेत. कोणत्याही वाहिनीवर यापुढं कोणत्याही पक्षाचा किंवा राजकीय जवळिकीचा शिक्का बसणं हिताचं ठरणार नाही; पण प्रत्येक वाहिनीच्या मालकाची कोणत्या ना कोणत्या पक्षाशी जवळीक किंवा बांधिलकी असते, असं अनेकदा दिसून येतं. अर्थात काही अपवाद नक्कीच आहेत. आजकाल वर्तमानपत्रं सुरू करण्याप्रमाणेच वृत्तवाहिन्या सुरू करण्याचे राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. आंध्र प्रदेशात भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या विचारसरणीची वाहिनी सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करत आणली आहे. इतर काही वाहिन्यांच्या प्रमुखपदांवर आपल्या विचारांचे संपादक किंवा अधिकारी बसवण्यामागं किंवा नेमण्यामागंसुद्धा एक धूर्त, चाणाक्ष खेळी असते. गुंतवणुकीचा त्रास नको; पण आपला फायदा करून देणारी, आपली बांधिलकी जपणारी धोरणं आखणं त्यामुळे सोपं जातं.

माध्यमांच्या या गजबजाटात प्रत्येकाचा एक अजेंडा असतो. प्रत्येकाची एक भूमिका किंवा दृष्टिकोन असतो. "आपल्याला वाटतं तेच खरं किंवा तेच सत्य' असाच साऱ्यांचा आवेश असतो. घटना घडत असतात. त्या घडण्यामागं किंवा घडवण्यामागं अनेक "फोर्सेस' कार्यरत असतात; पण राजकारणी, माध्यमं आणि वाचक किंवा प्रेक्षक-श्रोते आपापल्या चष्म्यातून त्या घटनांकडं बघत असतात, त्यावर प्रतिक्रिया देत असतात. सध्या तर चित्र दिसतंय, की माध्यमं आणि राजकारणी, दोघंही सर्रास आणि व्यवस्थितपणे एकमेकांचा वापर करून घेत आहेत! दोघांनाही प्रसिद्धी गरजेची आहे. टेलिव्हिजनच्या वाहिन्यांना "टीआरपी' हवा आहे; तर राजकीय नेत्यांना मोठी प्रसिद्धी हवी आहे. या सर्वांच्या केंद्रस्थानी जरी वाचक, प्रेक्षक-श्रोते, मतदारराजा असला, तरी त्याला या प्रक्रियेत फारसा काही "चॉइस' नाहीए! कारण जे दाखवलं किंवा छापलं जातं, तेच त्याला वाचावं किंवा पाहावं-ऐकावं लागतं. नंतर भले त्यानं त्यावर आपल्याला हवी ती प्रतिक्रिया द्यावी; ती छापली किंवा दाखवली जाईलच असं नाही.

या संदर्भात गेल्या काही दिवसांत घडलेल्या दोन-तीन ठळक घटनांचा उल्लेख आवश्‍यक आहे. कोळसा खाणप्रकरणाच्या (कोल-गेट) बातम्या यायला सुरवात झाली आणि त्यांत नावं आलेल्या काही कॉंग्रेसनेत्यांची भागीदारी असलेल्या एका मराठी वृत्तवाहिनीची "इकडं आड आणि तिकडं विहीर' अशीच परिस्थिती झाली. अर्थात्‌ त्या मराठी वाहिनीमध्येच त्या कॉंग्रेसनेत्यांची भागीदारी आहे; त्या वाहिनीच्या समूहातील हिंदी किंवा इंग्लिश वाहिनीमध्ये नाही. त्यामुळे त्या समूहाच्या मुख्य संपादकांनी काही तासांच्या आत त्या गैरव्यवहारात नाव आलेल्या कॉंग्रेसनेत्यांची थेट मुलाखत आपल्या इंग्लिश वाहिनीवर दाखवली. इतकंच नव्हे तर, त्यांची, इतर नेत्यांची करतात तशीच चिरफाडही व्यवस्थितपणे केली. आपल्या ज्येष्ठ भावंडानंच ही भूमिका घेतल्यानंतर त्या मराठी वाहिनीलासुद्धा आपल्या मालकाच्या भागीदाराबद्दलची बातमी सविस्तर दाखवताना हात आखडता घ्यावा लागलाच नाही! अर्थात या भागीदारांच्या बचावार्थ "कोल-गेट'मधील व्यक्तींशी सत्ताधारीच नव्हे तर, विरोधी पक्षातील बड्या नेत्यांचेसुद्धा कसे संबंध आहेत, याचे फोटोसुद्धा सतत दाखवायला ही वाहिनी विसरली नाही! पण इतकंसुद्धा धाडस आज किती वर्तमानपत्रं किंवा टीव्ही वाहिन्यांचे संपादक, मालक दाखवू शकतात? काय वाटेल ते झालं तरी आपल्या मालकाबाबत चकार शब्द विरोधात छापून येऊ नये, असा दंडकच घातला जातो! अर्थात या परवाच्या प्रकरणातल्या त्या मराठी वृत्तवाहिनीचे संपादकसुद्धा तितकेच खमके आहेत; पण त्यांनासुद्धा "फेसबुक'वरून लोकांनी चांगलंच फैलावर घेतलं!

"आता कुठं गेली तुमची निर्भीड पत्रकारिता?' असे प्रश्‍न विचारणाऱ्यांनी दुर्दैवानं याच वाहिनीनं केलेलं आपल्या मालक भागीदाराच्याच विरोधातलं वार्तांकन किंवा चर्चा बघितल्याच नव्हत्या. हा मोठा विरोधाभास आणि आश्‍चर्याचा भाग म्हणावा लागेल. तरीही त्या संपादकाला जनक्षोभाला सामोरं जावं लागत आहे.

दुसरी घटना होती ती बिहारमध्ये पकडलेल्या दंगेखोराबाबतच्या आणि बिहार पोलिसांच्या भूमिकेवर राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेची. राज यांनी काहीही बोललं, की त्याला मराठी वाहिन्यांपैकी काही ठराविक वाहिन्या अमाप, भरमसाठ प्रसिद्धी देतात, तर काही वाहिन्या त्या वक्तव्यांबाबत जर वाद निर्माण झाला, तरच त्यावर चर्चा, जनमत वगैरे घेत बसतात; पण "राज'प्रेमी वाहिन्यांचा "टीआरपी' केवळ "राज फॅक्‍टर'मुळे इतका अफाट वाढतो, की भल्याभल्या हिंदी, इंग्लिश वाहिन्यांनासुद्धा तो तोंडात बोटं घालायला लावतो! राज ठाकरे यांचे मुद्दे कोणाला राजकीयदृष्ट्या पटोत; न पटोत, ते तर्काच्या किंवा घटनेच्या कसोटीवर उतरोत किंवा न उतरोत; पण त्यांची वक्तव्यं, त्यांचं वक्तृत्व, त्यांचे विचार ऐकायला मराठी जनसामान्य उत्सुक असतात, हे नक्की. त्यांच्या अफाट लोकप्रियतेला जशी इलेक्‍ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी दिलेली अमाप प्रसिद्धी कारणीभूत आहे, तशीच राज यांची आक्रमक आणि काहीशी "बुलडोझ' करणारी स्टाइलसुद्धा! अनेक राजकारणी नेत्यांना ठरवूनसुद्धा अशी प्रसिद्धी मिळवता आलेली नाही किंवा अशा सभा घेता आल्या नाहीत की अशी प्रतिमाही निर्माण करता आलेली नाही. शिवाय राज काही रोज उठून माध्यमांकडं जात नाहीत; पण माध्यमं मात्र रोज त्यांचं काही ना काही "कव्हरेज' मिळवण्याच्या मागं लागली आहेत. कारण त्यामुळे "टीआरपी' वाढतो! आता तर मराठी वृत्तवाहिन्यांच्या काही संपादकांना "न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन'च्या ज्येष्ठांकडून तंबी मिळाल्यासारखं वातावरण दिसतं आहे. ""अशा नेत्यांच्या विरुद्ध बातम्यासुद्धा लावा, सरळ टीकासुद्धा करत चला!'' अशा प्रकारचं तंबीचं बदलतं वातावरण लक्षात येऊ लागलं आहे. त्यामुळे कालपर्यंत डोक्‍यावर घेऊन नाचणाऱ्या वृत्तवाहिन्या आता टीकेचा विरोधी सूरही लावू लागल्या आहेत. राजकीय नेत्यांना आता या विरोधी किंवा टीकेच्या "कव्हरेजची'सुद्धा सवय करायला हवी.

एका वाहिनीनं राज यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली, की इतर वाहिन्यांच्या पोटात गोळे येतात. त्यानंतर आणखी दोन-चार वाहिन्यासुद्धा "कृष्णकुंज'कडं धावत सुटतात! पण त्याला इलाज नाही. अपवाद होता तो अर्णब गोस्वामी यांना राज यांनी (चांगल्या) हिंदीत दिलेल्या मुलाखतीचा! या मुलाखतीत राज आक्रमक तर दिसलेच; पण त्यांनी आपल्या वक्तव्यांचा विपर्यास करणाऱ्या काही हिंदी वाहिन्यांना सरळसरळ आव्हानही दिलं आणि दमही भरला! आपल्याला देशद्रोही म्हणणाऱ्यांचा राग त्यांनी या मुलाखतीत काढला! काही क्षण त्यांचाही संयम सुटला; पण त्यांनी तो लगेच सावरलासुद्धा. अर्थात यापुढच्या काळात अमराठी वाहिन्या राज यांच्यावर टीकेची संधी सोडणार नाहीत हे नक्की असलं, तरी मराठी जनमानसाची नस ओळखणाऱ्या, आपल्याच मराठी वाहिन्यांवर आपण म्हणतो तसाच टीकेचा सूर लावायला या हिंदी-इंग्लिश वाहिन्या कशा आणि कितपत भाग पाडतात, हे उत्सुकतेचं ठरेल. अशा वेळी महाराष्ट्रातल्या मराठी संपादकांना त्यांच्या दिल्लीतल्या वरिष्ठांचं ऐकावंच लागतं, हे उघड आहे.

लोकसभेच्या आणि विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुका कधी होतात, वेळेवर की मुदतपूर्व, ते सांगता येत नसलं तरी एक गोष्ट मात्र नक्की ः येणाऱ्या निवडणुकांचे आखाडे गावागावांतील निवडणूक सभांपेक्षा विविध माध्यमांत, वाहिन्यांवर, इंटरनेट आणि सोशल वेबसाइट्‌सवर आणि वृत्तपत्रांतच जास्त रंगणार आहेत. "पेड न्यूज'बाबतच्या किंवा त्यावरील नियंत्रणाच्या कितीही बाता मारल्या गेल्या तरी तळागाळात काम करणाऱ्या पत्रकारांना खरी परिस्थिती चांगलीच माहीत असते. कारण असली "टारगेट'ची पूर्तता निवडणुकीत त्यांच्याकडूनच करवून घेतली जाते! निवडणुका तोंडावर असताना शक्‍यतो शहाणे, समंजस राजकारणी माध्यमांशी "पंगा' घेत नाहीत, असा आजपर्यंतचा प्रघात होता; पण आता गणित बदललं आहे. वादग्रस्त, तडाखेबाज, बिनधास्त विधानं, टीका आणि प्रत्युत्तरं ही माध्यमांना जशी आयती खाद्यं मिळवून देतात, तशी सपक, निद्रिस्त राजकारणाला जाग आणून राजकारण्यांना अमाप प्रसिद्धी मिळवून देतात. त्यामुळे अब्रूनुकसानीचा विचार न करता "ऍटॅक इज नॉट ओन्ली डिफेन्स, बट बेस्ट वे टू सेल युवरसेल्फ अँड मार्केट युवर नेम!' असा हा सारा "फंडा' आहे. आता माध्यमांवरसुद्धा राजकारणी घणाघाती टीका करतात ते यामुळेच!

दिग्विजयसिंग किंवा सुब्रह्मण्यम स्वामींसारख्यांनी रोज बोलत राहायचं, नितीशकुमार, लालूप्रसाद यादव ह्यांनी प्रतिक्रिया द्यायच्या आणि संबंधितांनी या सर्वांवर तुटून पडायचं! सारं काही तसंच अपेक्षेप्रमाणे घडतं! एखाद्या आखीवरेखीव स्क्रीन प्लेसारखं! काहीच नसलं, तर "महाराष्ट्रात बंधुप्रेमामुळे महायुती आघाडीला खाणार का?' हा रोज आवडीचा विषय असतोच! "बिहार ते कोल-गेट' आणि "महायुती ते मराठी बाणा' अशा या प्रवासात माध्यमांच्या भस्मासुराला विषयांची कमतरता नाही आणि वाचक-प्रेक्षक-श्रोत्यांची तर नाहीच नाही.

पक्षांकडं चांगले प्रवक्ते नाहीत, ही मोठी समस्या आहे! आपल्याला कळत असो वा नसो, "प्रतोद' असल्यानं त्याच चेहऱ्यांना जगातल्या सर्व विषयांवर टिप्पणी करून पक्षाची भूमिका मांडणं हे जितकं कर्मकठीण, तितकंच ठराविक चेहऱ्यांना रोज सहन करणं हे प्रेक्षकांचा अंत बघणारं!

एकुणात काय, तर राजकारणी आणि आजकालची इलेक्‍ट्रॉनिक माध्यमं यांना एकमेकांशिवाय करमत नाही आणि पटतही नाही! पण यापुढं सर्वच वाहिन्यांना आपण आपल्या प्रभावाखाली ठेवू शकतो, असं कुणी म्हणू शकणार नाही किंवा कुणा एकाच्या लोकप्रियतेमुळे वाहिन्या चालणार नाहीत. कारण प्रेक्षकच आता शहाणे होत चालले आहेत! फक्त त्यांचा शहाणपणा मतदानयंत्रातून मतांच्या रूपानं कधी उमटतो, याची वाट पाहणं महत्त्वाचं!



बुधवार, 12 सितंबर 2012

राजसाहेब, करा हो एकदा तरी टीका..!

राजसाहेब, करा हो एकदा तरी टीका..!
सु. ल. खुटवड
Wednesday, September 12, 2012 AT 12:06 PM (IST)
(राज ठाकरे आणि 'मनसे'तील आमदार व पदाधिकारी कृष्णकुंजवर गप्पा मारत बसले आहेत. वेळ सकाळची. राज यांच्या लागोपाठच्या दोन सभांना मिळालेल्या प्रतिसादामुळे सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहताना दिसतो आहे).

नितीन सरदेसाई - साहेब, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार सुशीलकुमार शिंदे तुमच्यावर खूप नाराज आहेत?
राज - असणारच. त्यांना संसदेत बारा राज्यांची बारा टाळकी भंडावून सोडत असतीलच ना. 'कारवाई करा. कारवाई करा' म्हणून.
राम कदम - त्याबद्दल ते नाराज नाहीत. तुम्ही जाहीर सभांमधून राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा राजीनामा मागता. त्यांच्यावर टीका करता. तुमची सगळी भाषणे चॅनेलवाले दिवसभर दाखवतात. त्यामुळं त्यांची प्रसिद्धी पार दिल्लीपर्यंत पोचलीय. बिहार, उत्तर प्रदेशच काय, पण झारखंडमधील खेडोपाड्यांतही आर. आर. आबांचे नाव सर्वतोमुखी झालंय. पण मी देशाचा गृहमंत्री असूनही राज ठाकरे माझा साधा उल्लेखही करत नाहीत. टीका करणं तर लांब राहिलं. दिल्लीतील मराठी माणसांविषयी एवढा परकेपणा बरा नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं देशाच्या खेड्यापाड्यांत त्यांचं नाव पोचणं तर दूरच राहिलं. त्यांच्या सोलापुरात अजूनही लोकांना ते केंद्रीय उर्जामंत्री आहेत, असंच वाटतंय.
बाळा नांदगावकर - गृहखात्याचा कारभार घेतल्यापासून अनेक मोठमोठ्या दुर्घटना घडल्या. पण राजीनामा मागणं तर राहिलं लांब, एकदाही साधी बिनपाण्यानंही केली नाही, अशी सुशीलकुमारांची खंत आहे.
राज - आयला ते राहिलंच. उर्जामंत्री असताना निम्मा देश यांनी अंधारात घालवला. ते पाहून सोनिया गांधी खूप चिडल्या आणि 'गो टू होम' असं जोरात ओरडल्या. आपल्या पंतप्रधानांनी नेमकं ते ऐकलं आणि त्याच रात्री त्यांना तातडीने 'होम मिनिस्ट्री' दिली. मॅडमचा आदेश डावलणार कसा? असला दळभद्री कारभार या काँग्रेसचा. कोण काय म्हणतंय आणि कोण काय त्यातून अर्थ काढतंय, काही सांगता येत नाही.
बाळा नांदगावकर - साहेब अभिनेता गोविंदा आणि अनुराधा पौडवाल यांचाही फोन होता. गोविंदाचं म्हणणं आहे, की चार- पाच वर्षांपूर्वी अमिताभ बच्चनवर तुम्ही कडाडून हल्ला चढवला होता. तेव्हापासून त्यांचं करिअर एकदम जोरात चालू झालंय. माझ्यावर अशी एकदा तरी टीका करा ना. हल्ली माझं कुठंच नाव नसतं. हिंदीतील मराठी नटांवर असा अन्याय करू नका आणि आशाबाईंवर टीका करण्यापेक्षा मला जाहीर सभेतून काहीतरी सल्ला द्या. एकदा तरी दिवसभर टीव्हीवर झळकू द्या, अशी अनुराधा पौडवाल यांची अपेक्षा आहे.
राज - अरे, यांच्या प्रसिद्धीसाठी मी काय सुपाऱ्या घेतल्यात का?
शिरिष पारकर - त्यांचं तेच म्हणणं आहे. निवडणुकीत तुमच्या पक्षाचा प्रचार करायला कितीही दिवस फुकट येऊ. पण तेवढी आमच्यावर टीका करा. मराठी माणसांचं हित तुमच्या डोळ्यासमोर आहे ना. मग करा ना आमच्यावर कडाडून हल्ला. दिसू द्या ना आम्हाला दिवसभर चॅनेल्सवर. होऊ द्या आमची प्रसिद्धी. लागू द्या आमचंही करिअर मार्गी.
राज - आयला ! मराठी माणसांचं हे असं जगावंगळंच असतंय.

(दिल्लीतील दिग्विजयसिंग यांचं निवासस्थान. वेळ सकाळची. कपिल सिब्बल आणि मनीष तिवारी आणि स्वतः दिग्विजयसिंग लॉनवर गप्पा मारत आहेत).

कपिल सिब्बल -
दिग्गिराजा, मानलं हं तुम्हाला. काय अचूक टायमिंग साधलंत?
दिग्गिराजा - अहो सवयच आहे मला तशी. तुम्हाला नाश्‍त्याला छोले - भटुरे आवडतात, हे माहिती आहे मला.
सिब्बल - नाश्‍त्याविषयी मी बोलत नाही. ठाकरे कुटुबियांचं मूळ हे बिहारमध्ये आहे, हे शोधलंत त्याबद्दल.
दिग्गिराजा - मीडियाला आपल्या तालावर कसं नाचवावं, हे देशात फक्त दोघांनाच जमतं. एक म्हणजे राज ठाकरे आणि दुसरा मी.
विषय अण्णा हजारेंचा असो, ठाकरे कुटुबियांचा असो, संततीनियमन असो की भाववाढ असो, मी बरोबर भाव खाऊन जातो.
सिब्बल - तेच म्हणतो मी. मी एवढा कायदेपंडित असूनही मला जमत नाही ते.
दिग्गिराजा - काय आहे इथं फार हुशार असून चालत नाही. निरर्थक आणि बाष्कळ बोलायला थोडा - फार अभ्यास लागतो. नाही असं नाही. पण सरावानं जमतं सगळं.
मनीष तिवारी - ते ही बरोबर आहे म्हणा. मुख्यमंत्री असताना व केंद्रात मंत्री असताना तुम्ही ते सिद्ध केलंच आहे.
दिग्गिराजा - कसं आहे पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली असते. ती पार पाडायची असते. पक्षाने सांगितलं, की वेड्यासारखं चॅनेल्ससमोर बडबडत रहा. आपण तेच करायचं. त्यामुळं मूळ मुद्दा बाजूला पडतो व चर्चा दुसरीकडे जाते. हेच पक्षाला अभिप्रेत असतं. मी माझं काम चोख बजावतो.
मनीष तिवारी - पण ठाकरे कुटुबियांचं मूळ कसं शोधलंत?
दिग्गिराजा - शोधायचं कशाला? दिलं ठोकून. चॅनेल्समोर बोलायला पुरावे लागत नाहीत. उद्या गरज पडली तर बिहारमधील ठाकोर मंडळी ही ठाकरे कुटुबियांपैकीच आहेत, असंही सांगेन. त्यामुळं हीच ठाकोर मंडळी नंतर धारला गेली व तेथून मुंबईला गेली. असं म्हणायचं. तशी कागदपत्रं रंगवायची. हाय काय आणि नाय काय !
सिब्बल - मग आता आणखी कोणाचं मूळ शोधणार आहात?
दिग्गिराजा - काय आहे. गेली सात- आठ वर्ष मी संशोधन करून असं सिद्ध केलंय, की सोनिया गांधी यांचे मूळ हे दिल्लीतलंच आहे. त्यांचे पूर्वज सहज इटलीला सहलीसाठी गेले आणि त्यांना भारतात येण्यासाठी वर्षभर जहाजच मिळालं नाही. त्यामुळं ते तिकडंच राहिले व तिथंच रूळले. पण मूळच्या त्या भारतीय वंशाच्या आहेत. त्यामुळं त्या अस्सल भारतीयच आहेत. त्यांचा परदेशीपणाचा मुद्दा उपस्थित करणं हा महामूर्खपणा आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधान होण्यासाठी त्याच योग्य आहेत. त्यांच्यासारख्या कर्तबगार आणि धाडसी महिला...

(त्यानंतर तासभर दिग्गिराजांनी सोनिया स्तुतीची कॅसेट लावली. ज्यावेळी त्यांची तंद्री भंगली. त्यावेळी कपिल सिब्बल व मनीष तिवारीही त्यांच्यासमोर नसल्याचे त्यांना दिसले...)
 






मंगलवार, 11 सितंबर 2012

असीमवरील देशद्रोहाचा गुन्हा मागे घ्या!


विशेष प्रतिनिधी ,  मुंबई

गृहमंत्री आर. आर. पाटील यांना गृहखात्याचा कारभार कळत नाही, हे आपण समजू शकतो. मात्र त्यांना व्यंगचित्रेही कळत नाहीत, हे दुर्दैवी आहे. असीम त्रिवेदी या तरुणाने काढलेले व्यंगचित्र सामान्य नागरिकांच्या मनातील चीड व्यक्त करणारे आहे. त्यामुळे त्याच्यावर दाखल केलेला देशद्रोहाचा गुन्हा मागे घ्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी मंगळवारी केली. कृष्णभुवन या त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत भाष्य केले. असीम त्रिवेदीने ज्या संसदेचा अपमान करणारे चित्र काढले आहे, त्या संसदेवर दहशतवादी हल्ला करणारा अफझल गुरू अजूनही जिवंत आहे. कसाबला फाशी देण्याऐवजी बिर्याणी भरवणारे सरकार आपल्या देशात आहे. अशा वेळी सामान्य माणसाला सर्व व्यवस्थेबद्दल चीड असणे  स्वाभाविक आहे. ती चीड आणि तो संताप असीमने आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त केला. देशातल्या  परिस्थितीवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून भाष्य करण्याचा हक्क प्रत्येकाला आहे, असे राज ठाकरे म्हणाले.



सोमवार, 10 सितंबर 2012

राज माझा वारसा पुढे चालविणार - बाळासाहेब

राज माझा वारसा पुढे चालविणार - बाळासाहेब


मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे माझ्यातील व्यंगचित्रकाराचा वारसा पुढे चालविणार असल्याचे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले.

'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रात गेल्या काही दिवसांपासून बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत सुरु आहे. आज (सोमवार) प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरे यांनी आपले मत स्पष्ट केले आहे. व्यंगचित्रकाराची तुमची भूमिका कोण पुढे नेऊ शकते? याबाबत विचारले असता बाळासाहेब म्हणाले, ''वारसा कोण पुढे नेऊ शकतो, याबाबत मला वाटतेय माझा हा वारसा राजा पुढे नेऊ शकतो. (राज ठाकरे यांना 'राजा' या टोपण नावाने ओळखले जाते). सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण आणि लालकृष्ण अडवानी यांचे चेहरे व्यंगचित्र काढण्यासाठी एकदम योग्य आहेत.''

छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व्यंगचित्रांवर एक पुस्तक तयार करत आहेत. माध्यमांना लक्ष्य करत बाळासाहेब म्हणाले, की सध्या संपादकांची विक्री होत आहे. ते राजकारण पक्षांचे चमचे बनले आहेत. त्यामुळे काय लिहायचे हे ठरवून केले जाते



शनिवार, 8 सितंबर 2012

अराजकधर्म सोडावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ।।

अराजकधर्म सोडावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा ।। (हेमंत देसाई)
हेमंत देसाई hemant.desai001@gmail.com
Sunday, September 09, 2012 AT 03:45 AM (IST)

राज ठाकरे यांचं नेतृत्व उद्या देशस्तरावरही फुलू शकतं. राज्याराज्यांतल्या प्रादेशिक अस्मितांचे ते "सेंट्रल हीरो' बनू शकतात. मात्र, हे करताना त्यांनी विधायक आणि विकासाधारित राजकारण करायला हवं.

"माझ्या डोक्‍याचा पारा चढवू नका...' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी "सिंघम'मधल्या अजय देवगणप्रमाणं "आता माझी सटकली' असा इशारा हावभाव करत बिहारला दिला, तेव्हा पुन्हा एकदा माध्यमकेंद्रित "हाय ड्रामा' निर्माण झाला...

"बिहारमध्ये जाऊन गुन्हेगारांना पकडणाऱ्या महाराष्ट्राच्या पोलिसांवर जर अपहरणाच्या केसेस टाकल्या, तर इथल्या बिहारींना घुसखोर ठरवून हाकलून दिलं जाईल', अशी थेट धमकी देऊन राज पुन्हा मूळपदावर गेले."आपली विधानं महत्त्वाचे शब्द गाळून विकृत स्वरूपात दाखवणाऱ्या हिंदी चॅनेल्सचा खेळ थांबवू,' अशी गर्जनाही त्यांनी केली. 11 ऑगस्टला आझाद मैदानाच्या दिशेनं मोर्चा काढून राज यांनी पोलिसांचं मनोधैर्य वाढवलं आणि "आता पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या अंगाला हात लावाल तर...,' असा पवित्रा घेत पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या मतदारसंघांवर ताबा मिळवला आहे. पाकिस्तानी कलाकारांना विरोध करण्यावर मनसेनं इतके दिवस भर दिला नव्हता. "26/11' नंतर राजकीय संबंध तोडूनही उपयोग होत नाही, हे लक्षात आल्यावर भारतानं पाकिस्तानबरोबरचा व्यापार वाढवला. व्हिसा-निर्बंध सैल केले. शिवसेना वा मनसेनं याला ठोस विरोध न करता, कलावंतांचं "सॉफ्ट टार्गेट' निवडलं. पाकिस्तानी गझलगायक गुलाम अली यांची मैफल उधळणारी शिवसेना व "कलर्स' या वाहिनीला धमकावणारी मनसे यात फरक राहिलेला नाही.

"माय नेम इज खान'च्या प्रदर्शनाला शिवसेनेनं विरोध दर्शवला, राहुल गांधींविरुद्ध निदर्शनं केली, त्या वेळी मनसे शांत राहिली होती. आज मात्र मनसेनं पाकिस्तानी कलावंतांविरुद्ध भूमिका घेतली व शिवसेनेनं त्याची "री' ओढली. काही महिन्यांपूर्वी मुंबईत झालेल्या "बिहारदिना'च्या वेळी राज यांनी वातावरणात सुरुंग पेरले, तेव्हा शिवसेना बघ्याच्या भूमिकेत होती. त्या वेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अत्यंत चतुराईनं परिस्थिती हाताळली व संघर्ष टाळला. आज राज यांनी संघर्ष उकरून काढला असताना, नितीशकुमार यांच्यासारख्या नेमस्त नेत्यानं राज यांना "सरफिरा' असं संबोधून वातावरणात आरडीएक्‍स ठासून भरलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका बिहारी मंत्र्यानं "राज यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा खटला भरावा,' अशी मागणी केली, तेव्हा महाराष्ट्रात मनसेसमवेत महायुतीसाठी गोपीनाथ मुंडे-सुधीर मुनगंटीवार आग्रही असल्याचं त्या मंत्र्याच्या गावीही नसावं... संयुक्त जनता दलाचे जुने-जाणते, मूळचे समाजवादी नेते शिवानंद तिवारी यांनी तर "कॉंग्रेसचेच नेते महाराष्ट्रात "राजरूपी भिंद्रनवाले'ला जन्म देत आहेत,' असा आरोप केला...तर "ठाकरे घराणं मूळचं बिहारचं आहे,' असा जावईशोध कॉंग्रेसचे "पोपटराव' दिग्विजयसिंग यांनी लावला.

थोडक्‍यात, राज ठाकरे यांना जे पाहिजे, तेच घडत गेलं. वाहिन्यांच्या साक्षीनं वादग्रस्त व जहरी वक्तव्यं करायची, लोकांना "प्रोव्होक' करायचं, मराठी विरुद्ध परप्रांतीय, असा विरोध निर्माण करायचा आणि आपणच महाराष्ट्राचे व मराठीचे तारणहार असल्याचा भ्रम तयार करायचा, ही राज यांची व्यूहरचना आहे. "वेक अप सिद' या चित्रपटात नायिका कोंकणा सेन हिच्या तोंडात "बॉम्बे' हा शब्द येतो, तेव्हा त्याला मनसेनं आक्षेप घेतला. मग निर्माता करण जोहर राज यांना भेटला व नंतर चित्रपटात "मुंबई' असा उल्लेख करण्यात आला. पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याबद्दल शाहरुख खाननं केलेल्या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी हरकत घेतली व "माय नेम इज खान'च्या प्रदर्शनात अडथळा आणला. वातावरण थंडावल्यानंतर काही दिवसांतच "सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रात या चित्रपटाची पूर्ण पान जाहिरात प्रसिद्ध झाली होती...!

"ठाकरे मूळचे भोर संस्थानातील पाली ह्या गावचे; पण आमचा नि पालकर ठाकऱ्यांचा आडनावापलीकडं फारसा संबंध कधीच आलेला नाही, घोडपकर असेही आमचे एक जादा आडनाव आहे; पण आमचे वडील किंवा ठाकरेबंधू या आडनावाच्या आडवळणाला फारसे कधी गेले नाहीत. नाशिक जिल्ह्यात घोडप किल्ला आहे. तेथे आमचे एक पूर्वज किल्लेदार होते', असं "प्रबोधन'कार ठाकरे यांनी "जीवनगाथा' ह्या त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलं आहे.



"प्रबोधन'कारांचं वय 18 असतानाच त्यांचे वडील वारले. लहान-थोर दहा-बारा माणसांची जबाबदारी त्यांच्यावर पडली. खरं तर "प्रबोधन'कारांचं शिक्षण देवास इथं झालं. आज देवास (शास्त्रीय गायक दिवंगत कुमार गंधर्व यांचं गाव) मध्य प्रदेशात आहे. देवास संस्थानात त्यांचे मामा वकिली करायचे. ते "प्रबोधन'कारांना घेऊन देवासला गेले आणि त्यांनी तेथील व्हिक्‍टोरिया हायस्कुलात त्यांचं नाव दाखल केलं. धारचे लेलेमास्तर भूगर्भशास्त्रापासून ते मिल्टन, ऑलिव्हर गोल्डस्मिथ यांचं काव्य शिकवत. ऍनी बेझंट आदींची व्याख्यानंही तिथं होत असत. व्हिक्‍टोरिया क्‍लासमध्ये "प्रिन्सिपॉल गंगाधर नारायण शास्त्री, एम. ए.' यांच्यापुढं "प्रबोधन'कार प्रवेशासाठी गेले. तेव्हा त्यांनी सुरवातच इंग्लिशमधून केली...

देवासमध्ये सब कुछ हिंदी होतं. हिंदी, मराठी, उर्दू सगळ्या शाळांतलं शिक्षण मोफत होते. 1902 मध्ये देवासहून परतल्यावर पुढच्या सहा-सात वर्षांत अधिक शिक्षणासाठी आणि नंतर कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी "प्रबोधन'कारांनी नाना उद्योग केले. नोकरीसाठी आजूबाजूच्या गावांतून कुणीही तरुण आला, की ते त्याला वृत्तपत्राच्या कार्यालयात घेऊन जायचे. तिथं "वॉंटेड'च्या जाहिराती दाखवायचे आणि नोकरीसाठी अर्ज लिहून देण्याचं काम करायचे. मुंबईत नोकरीसाठी कुठून कुठून लोक येतात, हे "प्रबोधन'कारांना ठाऊक होतं. नाटकात शिरल्यानं त्यांनी महाराष्ट्रपर्यटन केलं आणि नाना उपक्रमांसाठी ते देशात इतरत्रही फिरले. त्यांना बऱ्याच भाषा यायच्या आणि लोकमान्यांपासून ते नाथमाधवांपर्यंत अनेकजणांशी त्यांचा परिचय होता. त्यामुळे त्यांची दृष्टी व्यापक झाली. याउलट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुळात फारसं फिरलेले नाहीत. त्यांचं वाचन चौफेर असलं, तरी दृष्टी व्यापक नाही. त्यामुळे 1969 मध्ये शिवसेनेनं "यंडूगुंडूं'ना "टार्गेट' करताना "मुंबईचा कलकत्ता होईल,' अशी गर्भित धमकीही दिली. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी झगडतानाच "यंडूगुंडूं'च्या हॉटेलांचीही जाळपोळ केली गेली.

"बिहारनं मुंबई पोलिसांना गुन्हेगारांसाठी आत येऊ न दिल्यास आम्ही छत्रपतींच्या भूमीतले आहोत, हे दाखवून देऊ' असे उद्गार बाळासाहेबांनी काढले आहेत. नितीशकुमार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतले (रालोआ) एका पक्षाचे नेते असले, तरी "देशापेक्षा महाराष्ट्र मोठा,' ही शिवसेनेची लाईन आहे. दुर्दैवानं मनसेचं रूपांतर आता शिवसेनेत होऊ लागलं आहे. त्यामुळे बांगलादेश घुसखोरांविरुद्ध रस्त्यावर उतरणारे राज बिहारींनाही घुसखोर ठरवू लागले आहेत. राज हे "जर-तर'ची शब्दयोजना करत असले, तरी त्यांचे काही सहकारी मुंबईतील सगळ्याच बिहारींना घुसखोर मानत आहेत. अशा वक्तव्यांमुळं उद्या मुंबईत भाषिक दंगे झाले, तर त्यांना कोण जबाबदार असेल? गंमत म्हणजे, "पृथ्वीराज चव्हाण सरकारनं राज यांच्या प्रक्षोभक भाषणांकडं दुर्लक्ष करून सरकारी गव्हर्नन्स आउटसोर्स केलं आहे' असा आरोप करून नितीशकुमार यांनीही सुजाणपणाशी फारकत घेतलेली आहे. वास्तविक मुंबई पोलीस आयुक्तांची हकालपट्टी हा केवळ मनसेच्या मागणीचा परिपाक नव्हता, तर एकूणच जनमताचं दडपणही होतं. हे दडपण "रिलीज' होण्यासाठी कारवाई करणं जरुरीचं होतं. काही वर्षांपूर्वी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ ह्यांनी बाळासाहेब ठाकरे ह्यांना अटक करून दाखवली खरी; पण तेव्हा शहरातलं टेन्शन वाढलं होतं. शिवाय ठाकरे ह्यांच्या अटकेनं साधलं काय? उद्या राज ह्यांच्यावर अशीच कारवाई केल्यास तिचे काय परिणाम होतील? बाबा-आबा मोठे होतील की राजच, ह्याचा डोकं शांत ठेवून विचार केला पाहिजे.राज ह्यांच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला राजकीय आखाड्यात उतरावं लागेल. न्यायालयात खटले दाखल करून त्यांचा पाठपुरावा करावा लागेल. राज यांची भडक विधानं वाहिन्यांवरून किती व कशी दाखवावीत, हे माध्यमांनीही पाहिलं पाहिजे.

पण प्रश्‍न केवळ तेवढाच नाही. आज पश्‍चिम बंगाल सरकारवर टीका करणाऱ्या लेखक-पत्रकार-व्यंगचित्रकारांची "ममते'नं मुस्कटदाबी सुरू आहे. जयललिता यांच्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमच्या कार्यकर्त्यांनीही असहिष्णुतेचं प्रदर्शन केलं होतं. आज श्रीलंकेतील पर्यटकांना तामिळनाडूत पाऊल ठेवण्याचीही भीती वाटत आहे. आसाममधील कोक्राझारमध्ये बोडो आणि बांगलादेशी घुसखोर यांच्या संघर्षात देशातील विविध जाती-धर्मांचे लोकही भरडले गेले. या हिंसाचारानंतरच्या पाकिस्तानपुरस्कृत टेक्‍नो-अपप्रचारामुळे पुण्यापासून बंगळूरपर्यंत सर्वत्र ईशान्य भारतीयांची पळापळ सुरू झाली. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात परप्रांतीयांना मारहाण झाल्यामुळं पुणे, नाशिक, मुंबईतील भय्ये भयभीत होऊन आपापले गमछे तोंडासमोर धरून पलायन करते झाले...

बाळासाहेबांनी पूर्वी शीख समाजावर बहिष्कार टाकण्याची हाक दिली होती. "मुसलमानांनो, इथं राहायचं असेल, तर हिंदुस्थानचे नागरिक होऊन राहा' अशी त्यांची विधानं प्रसिद्ध आहेत. "आमच्या आघाडीचं सरकार केंद्रात आले, तर पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा चुटकीसरशी निकाल लावू,' "मी पंतप्रधान झालो, तर आठ दिवसांत काश्‍मीर प्रश्‍न सोडवीन' अशीही त्यांची विधानं आहेत. राज यांच्यासमोर केवळ बाळासाहेबांचाच नव्हे, तर नरेंद्र मोदी यांचाही आदर्श आहे. सन 1969 वा 1992-93 मधले आक्रमक बाळासाहेब आधी मराठीहृदयसम्राट व मग हिंदुहृदयसम्राट झाले. शिवसेना मुंबईहून मराठवाडा-विदर्भापर्यंत विस्तारली. "विकासाचे मुद्दे घेऊन लोकप्रियता मिळणार नाही, तेव्हा बाळासाहेब वा मोदी यांच्याप्रमाणं प्रथम भावना पेटवण्याचं राजकारण करावं व मग सत्ता आल्यावर विकासाचं पाहू या,' ही राज यांची योजना दिसते. त्यामुळे मनसेचे काही आमदार व नगरसेवकही विकासाचं कोणतंही काम करत नाहीत. "निवडणुका आल्या की विकासाचा अजेंडा मांडू', असं राज म्हणतात. कार्यक्रमाच्या आधारे नव्हे, तर टाळ्याखाऊ भाषणांच्या आधारेच राजकारण करण्याचा व निवडणुकाही जिंकण्याचा हा प्रकार वैशिष्ट्यपूर्ण मानावा लागेल. इतरांना वगळणारं, हुल्लडबाजीचं, आगलावू राजकारण ही शिवसेनेची स्टाईल. राज ह्यांनी या राजकारणाला अभ्यासाची जोड दिली. पत्रकारांवर कधीही हात चालवला नाही, मराठी पुस्तकांची प्रदर्शनं भरवली, तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिरं घेतली, हुशार व तळमळीची माणसं पक्षाशी जोडली.

उद्या राज यांचं नेतृत्व देशस्तरावरही फुलू शकतं. राज्याराज्यातल्या प्रादेशिक अस्मितांचे ते "सेंट्रल हीरो' बनू शकतात. ते बाळासाहेबांपेक्षाही मोठे होऊ शकतात; पण त्यासाठी त्यांनी बाळासाहेबांचे गुण घेताना दोष टाळले पाहिजेत. विद्वेषी, विखारी राजकारण सोडलं पाहिजे. मुंबईवर लोंढ्यांचा ताण येत आहेच; परंतु हा प्रश्‍न पायाभूत सुविधांशी जोडला पाहिजे. बिहार, उत्तर प्रदेशात जाऊन आपले मुद्दे तिथल्या जनतेला पटवून दिले पाहिजेत. मुंबई-पुणे-नाशिकमधील परप्रांतीयांचे मेळावे घेऊन त्यांना "मराठी संस्कृती म्हणजे काय,' हे प्रेमानं समजावून सांगितलं पाहिजे. त्यांना मराठी भाषा शिकवली पाहिजे.

राज्यात येणाऱ्यांची नोंद ठेवायलाच हवी; पण केरळात तशा फक्त हालचालीच सुरू आहेत. गोव्यात प्रतापसिंह राणे यांनी मुख्यमंत्री असताना ते करून दाखवलं; कारण गोव्यात परदेशी पर्यटकांवरील हल्ले वाढले होते. आपल्याकडं "आधार कार्डा'चा उपयोग करून लक्ष ठेवता येऊ शकतं.

मुंबईतील परप्रांतीयांची गुन्हेगारी वाढली आहे, हे कॉंग्रेस पक्षानंही मान्य करून टाकावं. सुरक्षारक्षक, मोलकरणी यांची माहिती पोलीस ठाण्यांना देण्याचं कर्तव्य हाउसिंग सोसायट्यांत राहणारे मध्यमवर्गीयही बजावत नाहीत. प्रगत देशांत नोंदी चोख असतात, त्यामुळे गुन्ह्यांचा शोध त्वरेनं लागतो. बिहार, उत्तर प्रदेशातील लोकांबद्दल शीला दीक्षित, पी. चिदंबरम यांनीही टीका केली होती. तिथले लोक नियम पाळत नाहीत, असं मत एका न्यायाधीशांनीही व्यक्त केलं होतं. तेव्हा हे फक्त राजच बोलतात असं नव्हे.

राज ठाकरे यांना लाखोली वाहणाऱ्यांनी आपल्या चुकांचाही विचार केला पाहिजे. तसा ते तो करत नाहीत. मनसेला वा मोदींना टार्गेट करून मुसलमानांमधील व बिहारींमधील मतं वाढतात, असं नितीशकुमारांना वाटतं. एकूण, राज व नितीशकुमार एकमेकांना वाढवत आहेत!

आज नागपूरसारख्या शहरात हा संघर्ष दिसत नाही. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा, बालाघाट, सिवनी या जिल्ह्यांमधील लोक नागपुरात येऊन रिक्षा चालवतात. छत्तीसगड मजूर बांधकामाच्या "साइट्‌स'वर दिसतात. भाजी मार्केटमध्ये छत्तीसगढी स्त्रिया टोपल्या उचलतात. चंद्रपूर, गडचिरोली ह्या जिल्ह्यांना लागून असलेल्या आंध्र प्रदेशातून शेकडो लोक नागपूरला येऊन चाटविक्रीचा व्यवसाय करतात. पाव-भाजी, पुलाव तयार करण्यात राजस्थानी, फळविक्रीत उत्तर प्रदेशी, तर भेळ-पुरीच्या व्यवसायात बिहारी आहेत.

मध्य प्रदेश व छत्तीसगड ह्या राज्यांतील काही शहरं पूर्वी मध्य प्रांताचा भाग होती. तिथल्या बऱ्याच मुली नागपुरातील घरच्या सुना होऊन सुखानं नांदत आहेत. त्यामुळे हिंदी भाषा नागपूरच्या जनजीवनाचा भाग आहे. वर्षानुवर्षं नागपुरी असणारे पंजाबी, सिंधी, हिंदी, गुजराती, दाक्षिणात्य आपापल्या भाषांत बोलतात व मराठीभाषकही एकमेकांशी हिंदीत बोलतात.

हे चांगलं की वाईट हा निवाडा कोण करणार? राज यांना विकास हवा असेल, तर या प्रक्रियेत स्थलांतरितांचा समावेश करावाच लागणार. कारण त्यांच्यामुळं वेतनावरचा खर्च कमी होतो. मनसेच्या धमक्‍यांमुळं इथले परप्रांतीय कायमचे गावी गेले, असं झालं नाही व होणारही नाही. आज अर्ध्या दादरवासीयांची मुलं-मुली युरोप-अमेरिका-ऑस्ट्रेलियात आहेत. त्यांनाही तिथून हाकलता येणार नाही.

मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा
हे समर्थ रामदास यांचं वचन आपल्याला ठाऊकच आहे. शिवाजीमहाराजांनी महाराष्ट्रात जी राज्यक्रांती घडवून आणली, त्यापूर्वी मराठी साधू-संतांनी सामाजिक क्रांतीनं महाराष्ट्रातील जनतेला जागृत केलं होतं. जन्ममूलक वर्णभेद, आचार, संप्रदाय, यज्ञयाग, कर्मकांडाच्या अनिष्ट प्रथांवर त्यांनी हल्ला केला होता. संतांचं आवाहन माणुसकीसाठी होतं. राज यांनी मनसेला अवश्‍य मोठं करावं, स्वतःही मोठं व्हावं; पण महाराष्ट्राला कुठंही छोटेपण आणू नये. मराठीपण विस्तारावं आणि स्थलांतरितांचे प्रश्‍न आर्थिक-सामाजिक चौकटीतच सोडवावेत. नाहीतर "मनसे गयी मन से' असंच लोक म्हणतील!

महाराष्ट्रातच का?
न्या. महादेव गोविंद रानडे यांनी "मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष' या ग्रंथात विचारलं आहे , "भारतामध्ये येणाऱ्या प्रत्येक परकीय सत्तेशी टक्कर देण्याचा प्रयत्न प्रथम महाराष्ट्रातच का झाला?' याचं उत्तर त्यांनीच असं दिलं आहे, ""आपली स्वभावतःच ठेवण अशी आहे, की महाराष्ट्रातल्या लोकांचा उत्कर्ष झालाच पाहिजे. महाराष्ट्राच्या पश्‍चिमेस सह्याद्री आहे व उत्तरेस विंध्याद्री व सातपुडा. त्यांच्या दऱ्या-खोऱ्यातून उगम पावणाऱ्या व गोदावरी व कृष्णेला मिळणाऱ्या लहानसहान नद्यांचे जाळे आहे. बहुतेक टेकड्यांवरील किल्ल्यांमुळे महाराष्ट्राचा बचाव स्वभावतःच होतो. उत्तर हिंदुस्थानासारखी आपल्याकडील हवा कधी अती थंड तर कधी अती उष्ण नाही. हवा उत्साहजनक असून लोक सशक्त, काटक व काटेकोर आहेत. मराठी माणसाच्या अंगी स्वाभिमान, बाणेदारपणा तुडुंब भरलेला आहे. यालाच आम्ही मराठीपण म्हणतो.''

या मराठीपणाचे "महाराष्ट्र नवनिर्माण सेना'कृत प्रदर्शनीय सामने आपण अलीकडील काळात पाहिले आहेत; पण मराठी मुलांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून निर्माण झालेली शिवसेना व तिच्या उदरातून जन्माला आलेली "मनसे' रोजगार, व्यवसाय, प्रशिक्षण याविषयी आज बोलत नाही