शनिवार, 11 सितंबर 2010

Raj Thakre Wikipedia Marathi

राज ठाकरे ( जन्म १४ जून १९६८) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या राजकीय पक्षाचे संस्थापक आहेत. शिवसेनेचे प्रमुख बाळ ठाकरे यांचे ते पुतणे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा यांभोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे. राज ठाकरे यांनी २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तरप्रदेशी लोकांच्या लोंढाला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले, त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवर्‍यात राहिले.

वैयक्तिक

राज ठाकरे (खरे नाव स्वरराज) यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी झाला. त्यांचे वडील श्रीकांत सीताराम ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे लहान बंधू होत. त्यांची आई कुंदा ठाकरे ह्या बाळ ठाकरे यांच्या पत्‍नी कै. मीना ठाकरे यांची बहीण लागतात. आहे. राज ठाकरे यांचे बालपण मुंबईच्या दादर भागात गेले. त्यांचे शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्यालयात झाले तर महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे. कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये झाले. राजचे वडील कै. श्रीकांत ठाकरे हे संगीतकार होते. राज ठाकरे आपले काकांप्रमाणे व्यंग्यचित्रकार आहेत. वॉल्ट डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. राजकारणात नसते तर नक्कीच वॉल्ट डिस्नेसारखे कार्टूनपट करणे आवडले असते असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच चित्रपट निर्मिती व फोटोग्राफी यातही राज ठाकरे यांना रस आहे.
शर्मिला ठाकरे ह्या राज ठाकरे यांच्या पत्‍नी असून, एक मुलगा व एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.

राजकीय वाटचाल

शिवसेना

ठाकरे कुटुंबात जन्मल्यामुळे लहानपणापासूनच राज ठाकरे यांना बाळ ठाकरे यांच्याकडून राजकारणाचे धडे मिळाले. ते अजूनही बाळ ठाकरे यांना आपले दैवताचे स्थान देतात. आपली राजकीय कारकिर्द त्यांनी शिवसेनेतच सुरू केली. उमदे प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून राज ठाकरे यांनी स्वतःला समर्थकांचा मोठा पाठिंबा मिळवला, असे दिसते आहे. शिवसेनेला तरुणांचा बळकट पाठिंबा मिळ्वण्यात राज ठाकरे यांचा वाटा महत्त्वाचा समजला जातो. बाळ ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्रे कोण वाहणार यावर एके काळी राज ठाकरे याच्याकडेच बोट दाखवले जायचे. शिवसेनाप्रमुखांनी कार्यध्यक्षपदी आपले पुत्र उद्धव ठाकरे यांची नियुक्ती केली त्यामुळे राज ठाकरे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष झाला. राज ठाकरे यांना डावलल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. इ.स. २००६, च्या मार्च महिन्यात शिवसेनेमध्ये आपल्याला व आपल्या समर्थकांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या कारण सांगून राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला व काही दिवसांतच शिवसेना पूर्णपणे सोडत असल्याची घोषणा केली. तसेच महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक परिस्थिती सुधारण्याचे व महाराष्ट्रात मराठी भाषेची पत ढळू दिली न जाता तिची उन्नती करण्याचे प्रयत्‍न करीन, अशा प्रकारचा राज ठाकरे यांच्या सुरुवातीच्या भाषणांचा सूर होता.

उत्तरप्रदेशी व बिहारी लोकांवरील टीका-
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांमध्ये मुंबईमध्ये येणाऱ्या लोंढ्यांवर लक्ष वेधले, मुंबई अगोदरच बकाल झाली असून हे लोंढे असेच येत राहिल्यास परिस्थिती अजून बिघडेल, असा इशारा देत त्यांनी उत्तर प्रदेशी व बिहारी लोकांवर आपला शाब्दिक हल्ला चढवला. त्यांच्या राज्यांतील राजकारण्यांमुळे त्या राज्यात रोजगार निर्माण झाला नाही, आणि त्यामुळे तेथील नागरिक सर्व भारतभर रोजगार शोधत फिरतात. त्यांतील सर्वांत जास्त लोंढा महाराष्ट्रात व मुंबईत येतो. त्या राज्यांच्या नाकर्तेपणाचा महाराष्ट्रातील जनतेने का भुर्दंड भ‍रावा? असा सवाल करत तेथील राजकारण्यांवर टीका केली. लालूप्रसाद व पासवान यांच्या भाषणांचा दाखला देत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आहे असा राजकीय आरोपही त्यांनी केला. बाहेरच्या राज्यातील नागरिक महाराष्ट्रात येऊन येथील स्थानिक लोकांच्या नोकऱ्यांच्या संधी कमी करतात. परंतु बिहारी व उत्तरप्रदेशी नागरिक महाराष्ट्रात येऊन येथील सामाजिक वातावरणही गढूळ करतात असा आरोप करत, हे नागरिक महाराष्ट्रात येऊन मराठी शिकत नाहीत, त्यांच्याशी बोलताना हिंदीतच बोलावे लागते हा सर्वसामान्य लोकांच्या अनुभव आहे, असे सांगत त्यांनी मराठी भाषकांची भाषिक अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्‍न केला. जपान, फ्रान्स, जर्मनी या देशातील तसेच तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यातील भाषाप्रेमाचे दाखले देत, ह्या देशांत तसेच राज्यात बाहेरून नागरिक आला तर त्याला स्थानिक भाषा शिकावीच लागते. फक्त, उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिक येथील भाषा का शिकत नाहीत? येथील मराठी संस्कृतीत सामील होत नाहीत व उलटे मराठीला हीन लेखत त्यांच्या राज्यातील कुप्रसिद्ध गुंडशाही येथे आणतात. अशा प्रकारची आरोपवजा टीका राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून व मुलाखतींतून स्पष्टपणे केली.

मनसे व उत्तर भारतीयांविरुद्ध दंगे

३ फेब्रुवारी इ.स. २००८ रोजी मनसेचे कार्यकर्ते व समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते यांच्यात संघर्षाची ठिणगी उडाली. मुंबईत अनेक ठिकाणी चिकटवलेली भित्तीपत्रे (यूपी बिहार तो हमारा है| अब कि बारी बंम्बई है|) व समाजवादी पक्षाची प्रक्षोभक भाषणे हे कारण ठरले. राज ठाकरे यांनी दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यावरही टीकास्त्र सोडले. सामाजिक कार्यासाठी ते आपले मूळ राज्याचीच निवड करतात व ज्या राज्यात त्यांची कारकिर्द घडली त्या राज्यात सामाजिक कार्य करताना हात आखडता घेतात. या वेळेस मुंबईतील अनेक टॅक्सींची तोडफोड करण्यात आली.
फेब्रुवारी १३ इ.स. २००८ रोजी राज्य सरकारला या प्रकरणी ढिलाई दाखवल्याची टीका सहन करावी लागली व काहीतरी करायचे म्हणून राज ठाकरे व समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांना अटक करण्यात आली. जरी दोघांना त्याच दिवशी सोडण्यात आले तरी कोणत्याही प्रकारची वक्तव्ये करण्यास बंदी घालण्यात आली. या अटकेचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची निदर्शने झाली व उत्तर प्रदेशी व बिहारी नागरिकांवरील रोष अजून वाढला व अनेक ठिकाणी मारहाण करण्यात आली. परिणामी महाराष्ट्राच्या अनेक गावांतून उत्तर प्रदेशी व बिहारी कामगार आपापल्या गावी पळून गेले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कामगारांचा तुटवडा निर्माण झाला. या घटनेनंतरही लहान सहान घटना घडत राहिल्या. कामगारांच्या तुटवड्यावर उपाय म्हणून मनसे ने कामगार भर्तीसाठी बेरोजगार मराठी तरुणांना कामास ठेवावे अशी विनंती अनेक उद्योग व बांधकाम व्यावसायिकांना केली. अनेक जिल्ह्यात मराठी तरुणांसाठी अर्ज नोंदणी मेळावे आयोजित करण्यात आले.
ऑक्टोबर २००८मध्ये मराठी उत्तर भारतीय वादाला नव्याने तोंड फुटले.या वेळेस कारण ठरले ते पश्चिम रेल्वे कर्मचारी भरती परीक्षा. पश्चिम रेल्वेच्या परीक्षा मनसे व शिवसेनेने उधळून लावल्या व आलेल्या उत्तर भारतीय परीक्षार्थींना पळवून लावण्यात आले. मनसे व शिवसेनेने या पश्चिम रेल्वेच्या भर्तीसाठी बिहारी परीक्षार्थींचीच का निवड करण्यात आली, तसेच महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात परीक्षेची जाहिरात न देण्यास कारण काय? ’महाराष्ट्रातील मराठी वर्तमानपत्रांतून जाहिराती न देण्याचे धोरण फार पूर्वीपासून आहे” असे लालू प्रसाद यांनी ठणकावून सांगितले. या घटनेनंतर प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांना रत्‍नागिरी येथे अटक करण्यात आली व मुंबईस आणण्यात आले. परंतु या काळात उत्तर भारतीयांविरुद्ध होणारा दंगा बळावला व मुंबई नंतर महाराष्ट्रातील अनेक भागात पसरला. या काळात हिंदी प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली. लालूप्रसाद व नितीशकुमार या बिहारी नेत्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना या प्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली.त्याप्रमाणे मनमोहनसिंग यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यास सांगितले. राज ठाकरे यांच्यावर एकूण ८४ विविध प्रकारचे गुन्हे दाखले करण्यात आले. मनसे च्या कार्यकर्त्यांची अनेक ठिकाणी धरपकड करण्यात आली.बिहारमध्येही यावर प्रतिक्रिया म्हणून काही ठिकाणी रेल्वे डबे जाळण्यात आले, व एक आगगाडी पळवून नेण्यात आली. दिल्लीमधील महाराष्ट्र सदनाच्या कार्यालयावर हल्ला करून मोडतोड करण्यात आली.
या घटनेनंतर नारायण राणे, छगन भुजबळ, यासारखे काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेते यांनी राज ठाकरे यांच्या आंदोलनाला शाब्दिक पाठिंबा दिला व त्यांचे आंदोलन रास्त असल्याचे मत व्यक्त केले परंतु राज ठाकरे यांच्या हिंसक आंदोलनाच्या मार्गावर टीका केली. शोभा डे या मान्यवर लेखिकेने देखील आय.बी.एन या वाहिनीवर डेव्हिल्स ॲडव्होकेट या कार्यक्रमात राज ठाकरे यांचे आंदोलन रास्त असल्याचे मत व्यक्त केले प्रसारमाध्यमांनी देखील राज ठाकऱ्यांची भूमिका व मराठी भाषकांचे मत समजून न घेता पक्षपाती टीका करण्याचा बेजवाबदारपणा दाखवला असे त्यांचे मत होते. ( बिहारमधील रेल्वे जाळणारे ते विद्यार्थी आणि व महाराष्ट्रात आंदोलन करणारे करणारे ते मनसेचे गुंड असा पक्षपाती प्रचार बिहारी आणि उत्तरप्रदेशी नेत्यांनी केला.).

आझाद मैदानावरील दंगल

आझाद मैदानावरील शहीद स्मारकाची मोडतोड करून बिहारमार्गे नेपाळला पळून जात असलेल्या गुन्हेगाराला महाराष्ट्राच्या पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन पकडून आणले. ही बिहारमध्ये मराठी पोलिसांनी केलेली घुसखोरी आहे असा आरोप करून, या घटनेचा निषेध म्हणून बिहारच्या मुख्य सचिवाने महाराष्ट्र सरकारला खडसावून पत्र लिहिले. यावर उत्तर म्हणून राज ठाकऱ्यांनी ‘यापु्ढे महाराष्ट्रातील पोलिसांना कर्तव्य बजावताना बिहारमध्ये अडवलेत तर महाराष्ट्रातल्या एकेक बिहारी माणसाला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकलवून लावू’, अशी घोषणा केली.


गुरुवार, 9 सितंबर 2010

हेलिकॉप्टरमधून उडाल्याने महाराष्ट्र कळत नाही

हेलिकॉप्टरमधून उडाल्याने महाराष्ट्र कळत नाही
सकाळ वृत्तसेवा
Friday, September 10, 2010 AT 12:30 AM (IST)
 

मुंबई - हेलिकॉप्टरमधून चार उड्या मारल्या म्हणजे महाराष्ट्र कळत नाही. मराठी जनतेला काय हवे हे जाणून घ्यायला शिका, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा राहुल गांधी यांच्यावर केली. महागायिका, विश्‍वगायिका वैशाली माडे हिच्या "भरारी' अल्बमचे प्रकाशन केल्यानंतर श्री. ठाकरे बोलत होते.

माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात अल्बमच्या प्रकाशनावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. राज यांनी राहुल गांधी यांना टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, "मी नेहमीच महाराष्ट्रातील जनतेच्या वेदना बोलून दाखवतो. महाराष्ट्रातील जनता कोणाच्या मागे जायला काही मूर्ख नाही. मी जे बोलतो ते त्यांच्या हिताचे बोलतो आणि ते बोलतच राहणार. कायदे मोडणाऱ्या मल्टिप्लेक्‍सवाल्यांना "खळ्ळ', "फटाक' भाषा कळते; ते कायद्याचा वापर करीत नाहीत, त्यामुळे त्यांना त्याच भाषेत समजवावे लागते. मल्टिप्लेक्‍समध्ये रंगभूमीसाठी जागा असावी, हे कायद्यात असूनही त्याचे पालन होत नाही. त्यामुळे माझ्या पद्धतीने काम केले, की सगळे काही व्यवस्थित होते.'' यापुढेही आपण मराठी जनतेसाठी बोलतच राहणार. आपण उचललेला मुद्दा कोणीही उचलला तरी चालेल, पण तो प्रश्‍न सुटणे महत्त्वाचे आहे, असेही राज म्हणाले.

अक्कल शिकविण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा - राज

अक्कल शिकविण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा - राज
सकाळ वृत्तसेवा
Thursday, September 09, 2010 AT 12:30 AM (IST)
 
मुंबई - एक दिवस महाराष्ट्रात येऊन चार उड्या मारण्यापेक्षा, वर्षानुवर्षे ज्या उत्तर प्रदेशातील मतदारांच्या मेहेरबानीवर गांधी कुटुंब निवडून आले व त्यांनी देशाचे पंतप्रधानपद उपभोगले, त्याच उत्तर प्रदेशाचा विकास इतकी वर्षे का झाला नाही, याचे प्रथम स्वतः आत्मपरीक्षण करा व नंतरच दुसऱ्याला अक्कल शिकवा, असा मुँहतोड जबाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना दिला.

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी काल (ता. 7) राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांचा आवाज फक्त मुंबईत असल्याचा टोला राहुल यांनी लावला होता. राज यांनी खास "सकाळ'शी बोलताना राहुल यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, की हेलिकॉप्टरने हवेत फिरण्यापेक्षा जमिनीवर फिरा व मगच बोला. कॉंग्रेस सरकारच्या कारकिर्दीत लोकांना चपला बाहेर काढून ठेवाव्या लागतात. कारण, या दळभद्री कॉंग्रेसच्या नाकर्तेपणावर लोक चपला फेकून मारतील, त्याला हे घाबरतात.''

ते म्हणाले, ""राहुल गांधी यांचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू हे उत्तर प्रदेशातून निवडून आले. ते सुमारे 16 ते 17 वर्षे देशाचे पंतप्रधान होते. त्यानंतर त्यांची आजी इंदिरा गांधी या निवडून आल्या, त्यासुद्धा उत्तर प्रदेशातून. त्याही सुमारे 15 वर्षे पंतप्रधानपदी होत्या. त्यांच्यानंतर पंतप्रधानपदी बसलेले त्यांचे वडील राजीव गांधी हेसुद्धा उत्तर प्रदेशातून निवडून आले. त्यांची आई सोनिया गांधी यासुद्धा उत्तर प्रदेशातील मतदारसंघातून निवडून आल्या व हेसुद्धा उत्तर प्रदेशाच्या मतदारांच्या मेहेरबानीमुळे निवडून आले. जर हे सर्व गांधी कुटुंबीय उत्तर प्रदेशातून निवडून आले, तर इतकी वर्षे उत्तर प्रदेशाचा विकास का झाला नाही? तेथून सुमारे 20 ते 25 लाख लोक नोकरी-धंद्यासाठी महाराष्ट्रात का येतात, याचा आधी विचार करा व मगच विकासाच्या गप्पा मारा. तेथील लोकांचा भार आमच्या महाराष्ट्रावर टाकायचा व येथे येऊन अक्कल शिकविण्याची गरज नाही

सोमवार, 6 सितंबर 2010

'ठाकरे जोडो अभियाना'चा पुन्हा निर्धार

'ठाकरे जोडो अभियाना'चा पुन्हा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:24 AM (IST)

गोविंद येतयेकर - सकाळ वृत्तसेवामुंबई - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनोमिलनासाठी "माझी चळवळ, मी महाराष्ट्राचा'च्या संस्थापकांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले नसले तरी केवळ मराठीच्या अस्मितेसाठी चळवळीच्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठी जनमताचा रेटा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मराठी माणसाला लागलेला दुहीचा शाप नष्ट करण्यासाठी विजयादशमीच्या मुहूर्तावर या "दुहीच्या रावणा'चे दहन करण्याचा विडा चळवळीचे सदस्य उचलणार आहेत.

गेल्या चार वर्षांपासून दुरावलेल्या ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, मराठी अस्मिता, मराठी माणसाला एकजुटीने वाचविण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काही महिन्यांपूर्वी ही चळवळ सुरू झाली. गेल्या काही महिन्यांत जनमताचा कानोसा घेतल्यानंतर काल (ता. 5) या चळवळीचे सदस्य प्रथमच रस्त्यावर उतरले. या मनोमिलनाला राज ठाकरे यांनी चकवा दिला, तर मराठी जनमानसात संदेह निर्माण करू नका व शिवसेनेच्या भगव्याखाली एकत्र येऊन मराठीची ताकद वाढवा, असे आवाहन करीत उद्धव ठाकरे यांनी "ठाकरे जोडो'च्या प्रयत्नांना बगल दिली; परंतु यानंतरही मोहिमेची धुरा सांभाळणारे सतीश वळंजू यांची लढाई संपलेली नाही. मराठीच्या अस्मितेसाठी याप्रकारची लढाई अशी यशस्वी होणार नाही. कारण, मराठ्यांना दुहीचा शाप आहे. हे जाणून या दुहीच्या रावणरूपी शापाचे विजयादशमीच्या दिवशी दहन करण्यात येणार असल्याची माहिती वळंजू यांनी "सकाळ'ला दिली.

"ठाकरे जोडो'साठी काल झालेल्या प्रयत्नांना यश आले नाही; तरीही मराठी जनमताचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न अजून किमान पाच महिने सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवशी म्हणजेच 23 जानेवारी 2011 रोजी भव्य जाहीर सभा घेऊनच या मोहिमेची निर्णायक लढाई लढली जाणार आहे. या पाच महिन्यांत आमची मोहीम आम्ही प्रभावीपणे राबविणार आहोत. "मनसे'ची लोकप्रियता वाढली आहे. मराठी माणसाचे विभाजन झाले आहे व भविष्यातही होणार आहे. त्यात शिवसेनेचे व पर्यायाने मराठी माणसाचे नुकसान होत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
उद्धव व राज यांच्यातील दुहीमुळे मुंबई महापालिकेची सत्ता हातातून निघून जाईल व अमराठी लोकांच्या हाती पालिकेची सत्ता जाईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

रविवार, 5 सितंबर 2010

मनोमीलन चळवळीकडे राजची पाठ

मनोमीलन चळवळीकडे राजची पाठ
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 12:15 AM (IST)

मुंबई  -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मनोमीलनासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांत आज दोन्ही बंधूंनी कोलदांडा घातला. त्यामुळे मनोमीलनाचा संदेश घेऊन आज "कृष्णकुंज' व "मातोश्री'वर गेलेल्या कार्यकर्त्यांची मने काहीशी खट्टू झाली. लेखी पूर्वकल्पना देऊनही राज यांनी घरी न राहणेच पसंत केले. दुसरीकडे उद्धव यांनी मात्र कार्यकर्त्यांची भेट घेतली; मात्र त्यांचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला.

शिवसेना-"मनसे'तील दुहीमुळे हतबल झालेल्यांनी "माझी चळवळ, मी महाराष्ट्राचा' याअंतर्गत आज सकाळी शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला हार घालून मूकमोर्चा काढला. राज व उद्धव यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी पुन्हा एकत्र यावे, यासाठी शिवाजी पार्क येथे स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली. त्यास शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी चांगला प्रतिसादही दिली. विशेष म्हणजे मोर्चाला ज्येष्ठ शिवसैनिकांची उपस्थितीही लक्षणीय होती. शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार व माजी आमदार सुरेश गंभीर हेही मोर्चात सहभागी झाले होते; पण "प्रजा उत्साही मात्र, राजा उदासीन' असेच काहीसे चित्र या मोर्चादरम्यान पाहायला मिळाले. लेखी पूर्वकल्पना देऊनही राज यांनी घरी न राहणेच पसंत केले. दुसरीकडे उद्धव यांनी मात्र कार्यकर्त्यांची भेट घेतली; मात्र त्यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिला.

या वेळी बोलताना उद्धव म्हणाले, ""हे आंदोलक मॉंसाहेबांच्या पुतळ्याला वंदन करून निघाले आहेत आणि घरी आलेल्यांचा सन्मान करणे ही "मॉं'चीच शिकवण असल्यामुळे मला यांची भेट घेणे भागच आहे. अन्यथा, हे कोणत्या उद्देशाने येथे आलेत यात मला रस नाही. राहिला भाग मराठी माणसाच्या हिताचा, तर शिवसेनेचा जन्मच मुळी मराठी माणसाच्या हितासाठी झाला आहे. मराठी माणसाने भगव्याखाली एकत्र यावे तरच मराठी माणसाची ताकद वाढेल.''

दरम्यान, आज आमची सहामाही परीक्षा असून त्यात आम्ही काठावर पास झालो. आंदोलनाचा दुसरा टप्पा दसऱ्याच्या दिवशी असून याची फायनल 23 जानेवारी, 2011 ला होणार आहे. तेव्हा आम्ही प्रचंड जाहीर सभा घेऊन या नेत्यांना एकत्र येण्यास भाग पाडू, असा विश्‍वास या चळवळीचे प्रवक्ते सतीश वळंजू यांनी व्यक्त केला.

'भगव्याखाली मराठी माणसाने एकत्र यावे'

'भगव्याखाली मराठी माणसाने एकत्र यावे'
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 02:51 PM (IST)

मुंबई - शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण्यासाठी आज (रविवार) मुकमोर्चा काढण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोर्चात सहभागी नागरिकांना मराठी माणसाच्या विकासासाठी भगव्या झेंडाखाली एकत्र येण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र चळवळतर्फे आज सकाळी शिवाजी पार्कपासून या मुकमोर्चाला सुरवात झाली. चळवळीचे प्रमुख सतीश वळंजू यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. सुरवातीला मोर्चा राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'कृष्णकुंज' याठिकाणी गेला. राज ठाकरे बाहेर गेले असल्याने त्यांची राज ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. यानंतर मोर्चा 'मातोश्री'कडे रवाना झाला. तिथे त्यांची भेट उद्धव ठाकरे यांच्याशी झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोर्चात सहभागी नागरिकांना मोर्चा काढून प्रयत्न वाया घालविता मराठी माणसाच्या कल्याणासाठी भगव्याखाली एकत्र येण्याचे सांगितले. तसेच त्यांनी शिवसेनेला कोणाची गरज नसल्याचे सांगितले.