गुरुवार, 9 सितंबर 2010

हेलिकॉप्टरमधून उडाल्याने महाराष्ट्र कळत नाही

हेलिकॉप्टरमधून उडाल्याने महाराष्ट्र कळत नाही
सकाळ वृत्तसेवा
Friday, September 10, 2010 AT 12:30 AM (IST)
 

मुंबई - हेलिकॉप्टरमधून चार उड्या मारल्या म्हणजे महाराष्ट्र कळत नाही. मराठी जनतेला काय हवे हे जाणून घ्यायला शिका, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा राहुल गांधी यांच्यावर केली. महागायिका, विश्‍वगायिका वैशाली माडे हिच्या "भरारी' अल्बमचे प्रकाशन केल्यानंतर श्री. ठाकरे बोलत होते.

माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात अल्बमच्या प्रकाशनावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. राज यांनी राहुल गांधी यांना टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले, "मी नेहमीच महाराष्ट्रातील जनतेच्या वेदना बोलून दाखवतो. महाराष्ट्रातील जनता कोणाच्या मागे जायला काही मूर्ख नाही. मी जे बोलतो ते त्यांच्या हिताचे बोलतो आणि ते बोलतच राहणार. कायदे मोडणाऱ्या मल्टिप्लेक्‍सवाल्यांना "खळ्ळ', "फटाक' भाषा कळते; ते कायद्याचा वापर करीत नाहीत, त्यामुळे त्यांना त्याच भाषेत समजवावे लागते. मल्टिप्लेक्‍समध्ये रंगभूमीसाठी जागा असावी, हे कायद्यात असूनही त्याचे पालन होत नाही. त्यामुळे माझ्या पद्धतीने काम केले, की सगळे काही व्यवस्थित होते.'' यापुढेही आपण मराठी जनतेसाठी बोलतच राहणार. आपण उचललेला मुद्दा कोणीही उचलला तरी चालेल, पण तो प्रश्‍न सुटणे महत्त्वाचे आहे, असेही राज म्हणाले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें