शनिवार, 8 जनवरी 2011

राज ठाकरेंनी केली जाधवांची विचारपूस

राज ठाकरेंनी केली जाधवांची विचारपूस
सकाळ वृत्तसेवा
Sunday, January 09, 2011 AT 11:45 AM (IST)


औरंगाबाद - पोलिसांनी केलेल्या मारहाणीत जंभीर जखमी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कन्नड येथील आमदार हर्षवर्धन जाधव यांची विचारपूस करण्यासाठी "मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे आज शहरात दाखल झाले. घाटी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या जाधव यांची विचारपूस करण्यासाठी ते रूग्णालयात पोहोचले. तेथे ते सुमारे १५ मिनिटे होते. या वेळी रूग्णालयाबाहेर "मनसे'च्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती.

जाधव यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलणार असून ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या पहिल्याच बैठकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आमदारांनी हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध करणारे निवेदन दिले असून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

मनसे आमदार मारहाणीचा सेनेकडून निषेध

मनसे आमदार मारहाणीचा सेनेकडून निषेध
सकाळ वृत्तसेवा
Saturday, January 08, 2011 AT 04:43 PM (IST)

मुंबई - मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. याप्रकरणी जाधव यांची बाजू ऐकून घेण्यासाठी शिवसेनेचे एक पथक औरंगाबादला पाठविण्याची त्यांनी घोषणा केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले,""मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा आम्ही तीव्र निषेध करतो. मारहाणीस जबाबदार असलेल्या पोलिसांना गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा सामना करण्यासाठी पाठवायला हवे. पोलिसांची अरेरावी कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही.''

दरम्यान, जाधव यांची बाजू ऐकून घेण्यासाठी शिवसेनेना आमदारांची तीन सदस्यीय समिती औरंगाबादला जाणार आहे.

मनसेतर्फे आजपासून 9 रु. दराने कांदाविक्री

मनसेतर्फे आजपासून 9 रु. दराने कांदाविक्री
सकाळ वृत्तसेवा
Sunday, January 09, 2011 AT 12:00 AM (IST)

मुंबई - कांदाभाववाढीमुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात आलेले पाणी पुसण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेने कंबरी कसली आहे. गेल्या काही दिवसांत साठ ते सत्तर रुपये किलो भावाने विकला जाणारा कांदा उद्या (ता.9) पासून मुंबई व ठाण्यात फक्त 9 ते 13 रुपये किलोने मनसे उपलब्ध करून देणार आहे.

याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या उपाध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी सांगितले, की राज्यातील शेतकरी नऊ रुपये किलोने कांदा विकत असताना सर्वसामान्य जनतेला मात्र हा कांदा तब्बल 60 ते 70 रुपये किलोने विकत घ्यावा लागत आहे. कांद्यांच्या दरातील ही वाढ दलाल व विक्रेत्यांचा नफा लक्षात घेतला असता अक्षरशः विकृत वाटते. विक्रेत्यांच्या या बेसुमार नफेखोरीला आळा घालण्यासाठी मनसे थेट शेतकऱ्यांकडून कांदा विकत घेऊन सर्वसामान्य जनतेला 9 ते 13 रुपये किलोने विकणार आहे.

शिवडी-भायखळा परिसरात आमदार बाळा नांदगावकर व मनसेच्या उपाध्यक्षा आशा मामेदी, गोरगाव परिसरात शालिनी ठाकरे, बोरिवलीमध्ये आमदार प्रवीण दरेकर, तर दादरमध्ये आमदार नितीन सरदेसाई व मनमसेच्या उपाध्यक्षा रिटा गुप्ता यांच्या पुढाकाराने सवलतीच्या दराने कांद्याची विक्री करण्यात येणार आहे.

गुरुवार, 6 जनवरी 2011

आमदार जाधव यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी


Bookmark and SharePrintE-mail
औरंगाबाद, ६ जानेवारी/खास प्रतिनिधी
कन्नडचे मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलीस अधिकाऱ्यांनी गुंडासारखी मारहाण केली आहे. दंडुकशाही दाखविणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी मनसेचे गटनेते आमदार बाळ नांदगावकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.
बुधवारी हर्षवर्धन जाधव यांना मारहाण करण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर मनसेचे शिष्टमंडळ गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सुभेदारी विश्रामगृहावर भेटले. या शिष्टमंडळात आमदार नितीन सरदेसाई, मराठवाडा संपर्क नेते अतुल सरपोतदार, जिल्हाध्यक्ष भास्कर गाडेकर, डॉ. सुनील शिंदे, सुमीत खांबेकर आदी उपस्थित होते. मनसेच्या शिष्टमंडळाने औरंगाबादचे ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांचीही भेट घेतली. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मनोज लोहिया यांनी या शिष्टमंडळाला दिले आहे.
हर्षवर्धन जाधव यांना खुलताबाद येथे पोलीस उपनिरीक्षक एस. डी. कोकणे यांच्यासह ४० ते ५० पोलीस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे हर्षवर्धन जाधव यांना नीट उभे राहून चालताही येत नव्हते. आमदारांना झालेली मारहाण निषेधार्ह असल्याचे बाळ नांदगावकर म्हणाले. असा काय गुन्हा केला होता जेणेकरून या पोलीस अधिकाऱ्यांनी आमदार जाधव यांना गुंडासारखी मारहाण केली. मुख्यमंत्री चव्हाण हे संवेदनशील आहेत. ते नक्की या प्रकरणात न्याय देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांना या मारहाणीचे छायाचित्रे दाखविण्यात आली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात पोलिसांनी ‘थर्ड डिग्री’चा वापर केला आहे असे म्हटल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. २००९ मध्ये कन्नडमध्ये अवैध वाहतूक, मटका या विरोधात आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आवाज उठविला होता. त्या वेळी पोलीस उपनिरीक्षक एस. डी. कोकणे हे कन्नडमध्ये कार्यरत होते. याचा राग म्हणून त्यांनी आमदार जाधव यांना मारहाण करून वचपा काढला, असा आरोपही बाळ नांदगावकर यांनी केला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्या वेळी कन्नडच्या या पोलीस उपनिरीक्षकांची बदली करा म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे तक्रारही केली होती.
आमदार जाधव यांची काय चूक होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते मुख्यमंत्र्यांना भेटायला चालले होते. तरीही पोलिसांनी दंडुकशाहीचा अवलंब करून आमदार जाधव यांना बेदम मारहाण केली, असे बाळ नांदगावकर म्हणाले. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर आमचा विश्वास नाही. ते त्यांच्या दलातील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करतील अशी त्यांच्याकडून आमची अपेक्षा नाही; त्यामुळेच संवेदनशील असलेल्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दाद मागितली आहे. या प्रश्नावर विधानसभेतही आवाज उठविला जाईल. पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. वेळ पडली तर न्यायालयातही धाव घेऊ तसेच मानव अधिकार आयोगाकडे दाद मागू, असेही मनसेच्या नेत्यांनी सांगितले.
सध्या आमदार हर्षवर्धन जाधव हे येथील खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांचे सासरे आणि जालन्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रावसाहेब दानवे यांनी रुग्णालयात जाऊन जाधव यांच्या प्रकृतीची विचापूस केली.

मंगलवार, 4 जनवरी 2011

शिवसेनेची मनसेला ऑफर?

शिवसेनेची मनसेला ऑफर?

Wednesday, January 05, 2011 AT 12:00 AM (IST)


डोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक 7 जानेवारी रोजी होत असून मनसेने पहिले अध्यक्षपद घ्यावे, यासाठी शिवसेनेकडून त्यांना ऑफर देण्यात येत आहे. मात्र, अध्यक्षपद स्वीकारावे किंवा नाही, याबाबत एकमत होत नसल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांची द्विधा मनःस्थिती झाली आहे. स्थायी समिती सभापती पदावरून पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे आहेत.

पालिकेच्या पहिल्या महासभेत स्थायी समिती सदस्यांची निवड झाली असली, तरी स्थायी समिती सभापतींची निवड अजून बाकी आहे. ही निवड आता 7 जानेवारी रोजी होणार आहे. शिवसेनेतर्फे जनार्दन म्हात्रे यांचे नाव चर्चेत असून मनसेकडून सुदेश चुडनाईक यांचे नाव पुढे आले आहे. मात्र, मनसेने अध्यक्षपद स्वीकारावे असा आग्रह शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून होत असून शिवसेनेचे काही कार्यकर्ते याला दुजोरा देत आहेत. मात्र, पक्षश्रेष्ठींनी सर्वच बाबतींत तटस्थ राहण्याचे आदेश दिल्यामुळे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. दुसरीकडे आपल्याशिवाय दुसऱ्या कोणालाही अध्यक्षपद मिळू नये यासाठीच शिवसेनेकडून शॉर्ट नोटीस देण्यात आली असल्याची चर्चा सुरू आहे.

शिवसेनेच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेला अडचणीत आणण्यासाठीच त्यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचे गाजर दाखविण्याचा प्रयत्न चालविला असल्याचे बोलले जात आहे. मनसेला सत्तेत सामावून घेतल्यास शिवसेनेला फायदा होणार असला, तरी पूर्ण सत्ता आल्याशिवाय सत्ता स्वीकारायची नाही, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच दिले आहेत. एकीकडे समोरून आलेली सत्ता आणि दुसरीकडे पक्षादेश या कात्रीत मनसे पदाधिकारी सापडले आहेत. यावर अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचाच असणार आहे. यामुळे मनसे शिवसेनेच्या या डावात फसेल, असे चित्र सध्या तरी दिसत नाही.
याबाबत मनसेचे आमदार रमेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, काहीही घडू शकते असे संकेत दिले. मात्र, शिवसेना नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत अध्यक्ष आपलाच होणार असल्याचे सांगितले आहे.

अध्यक्षपदासाठी कॉंग्रेस आघाडीकडून विश्‍वनाथ राणे व भरत पाटील यांची नावे चर्चेत असल्याची माहिती खास सूत्रांनी दिली

परप्रांतीयांना जमिनी देऊ नका

परप्रांतीयांना जमिनी देऊ नका
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, January 05, 2011 AT 12:00 AM (IST)


मुंबई - मुंबईसारख्या परिसरातील अधिकाधिक जागा मराठी उद्योजकांनी खरेदी केल्या पाहिजेत, असा आग्रह करतानाच या जमिनी परप्रांतीयांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवल्या पाहिजेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केले.

व्यापारी मित्र मंडळाच्या 30 व्या वर्धापन दिनानिमित्त ठाकरे बोलत होते. या वेळी मित्र मंडळाचे अध्यक्ष ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर, मंडळाचे उपाध्यक्ष व सारस्वत बॅंकेचे उपाध्यक्ष किशोर रांगणेकर, कार्यवाह किशोर साठे, कार्याध्यक्ष अनंत भालेकर, मुंबई व्यापारी सहकारी पतपेढीचे अध्यक्ष दीपक बापट, सहकार्यवाह मकरंद चुरी, खजिनदार प्रभाकर शिलधनकर आदी उपस्थित होते.

राज ठाकरे यांनी या वेळी राज्य सरकारवरही शाब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले, की सागरी नियंत्रण कायदा (सीआरझेड) लावून येथील शासन समुद्रसपाटीजवळील जमिनी अल्प दरात खरेदी करते. सर्व जमिनी विकत घेऊन झाल्यावर सीआरझेड कायदा रद्द करते आणि त्याचा अधिकाधिक मोबदला मिळविण्याचा प्रयत्न करते. राज्य सरकारचा हा डाव विशेषत: मराठी उद्योजकांच्याही ध्यानी यायला हवा. कोकण किनारपट्टीवरील जमिनी या कोणामार्फत विकत घेतल्या जात आहेत, याचाही अभ्यास करायला पाहिजे, असे आवाहनही ठाकरे यांनी उपस्थित मराठी उद्योजकांना दिले.

या वेळी मित्र मंडळातर्फे यशस्वी मराठी उद्योजक म्हणून मनोहरशेठ रेडीज, देवेंद्र बापट, शंकरराव बोरकर यांचा मराठी उद्योगभूषण म्हणून सत्कार करण्यात आला. कला क्षेत्रातील मराठी कार्याबद्दल सुहास भालेकर यांचा; तर क्रीडा क्षेत्रातील नवतारका कबड्डीपटू स्नेहल साळुंखे यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. "आस्वाद हॉटेल'चे मालक श्रीकृष्ण सरजोशी यांच्या व्यवसाय कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास या वेळी "केसरी टूर्स'चे केसरीनाथ पाटील, मंडळाच्या सल्लागार अचला जोशी, "समर्थ ग्रुप'चे विलास गावकर, कार्यकारिणीचे सदस्य विजय कामेरकर, सहकार्यवाह किरण शेट्ये आदीही उपस्थित होते