शुक्रवार, 8 अप्रैल 2016

सत्ता यांची अन् हे घाबरतात आम्हाला- राज ठाकरे


मुंबई- केंद्रात, राज्यात, महानगर पालिकेत यांची सत्ता असूनही हे आम्हाला घाबरतात, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला आज (शुक्रवार) लगावला. गुढीपाडव्यानिमित्त येथील शिवाजी पार्कवर आयोजित केलेल्या मेळाव्यावेळी ठाकरे बोलत होते.
मनसेचाही ‘भगवा’ झेंडा . 

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे-
  • मुंबईतील शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा
  • होमपिचवर खेळायची संधी मिळाली, आता खेळतोय.
  • दिग्गजांनी सभा घेऊन शिवाजी पार्क मैदाना गाजवले, इथे अटी-शर्ती मग सभा घ्यायच्या कुठे?
  • 50 डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको, असे न्यायालयाने सांगितले. परंतु, बाहेर वाहतुकीचा आवाज 100 डेसिबल असतो.
  • सत्तेत असून शिवसेना मनसेला घाबरते.
  • शिवसेनेची मनपात, राज्यात, केंद्रात सत्ता, मात्र यांना आमच्या सभेमुळे पोटदुखी.
  • सेनेच्या झेंड्यांकडे बाळासाहेबांचा आशिर्वाद म्हणून पाहिले, बाळासाहेब माझ्या पाठिशी.
  • मनसेमुळेच महाराष्ट्रातील 65 टोलनाके बंद झाले.
  • मोबाईलवर मराठी, रेल्वेतील नोकऱ्या, मराठी पाट्या, हे मनसेचं यश.
  • जुना हिशेब मांडण्यासाठी शिवतीर्थावर सभा
  • मनसेने अर्धवट सोडलेले एक आंदोलन दाखवा, जे इतरांना अनेक वर्ष जमले नाही, ते आम्ही आठवड्यात केले.
  • अमित शहा न्यायालयातून सुटले, मग राम मंदिर का सुटत नाही?
  • राम मंदिराच्या मुद्द्यावरून सत्तेत आलात, पण कुठेय राम मंदिर?
  • राम मंदिराच्या आंदोलनाचं काय झाले? कुठे आहे राम मंदिर?
  • जैतापूर आंदोलनाचे काय झाले? सत्तेत राहून विरोध करण्याचे सेनेचे नाटक.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा वाढदिवस लक्षात राहतो, ते तिथे जातात आणि इथे त्यांना शिव्या घालतात.
  • भाजप किंमत देत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा.
  • 100 दिवसात अच्छे दिन येणार होते, काय झाले?
  • नरेंद्र मोदींएवढे परदेश दौरे दुसऱ्या कोणत्याही पंतप्रधानाने केले नाहीत.
  • देशाला मोदींसारखा पंतप्रधान हवा, हे पहिल्यांदा मी म्हटलं होते.
  • गुजरातला महाराष्ट्राच्या पुढे नेण्याचे कारस्थान
  • सराफांना भाजपने फसवले, सराफ म्हणतात, ‘एकही भूल कमल का फूल‘
  • ‘भारत माता की जय‘ हा नारा मी इंदिरा गांधींच्या तोंडून ऐकला आहे.
  • मनसेच्या झेंड्यात निळा-दलित, भगवा-हिंदुत्व अन् जो हिरवा आहे तो कलाम, ए. आर. रहमान यांच्यासाठी.
  • मनसेच्या झेंड्यातील हिरवा रंग हा भेंडी बाजार, भिवंडीसाठी नाही.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्गातल्या मॉनिटरप्रमाणे.
  • ओवेसी बंधू हे भाजपनेच जन्माला घातलेत. यांनीच फायनान्स केलेले आहेत.
  • विदर्भ, मराठवाडा स्वतंत्र करायला यांच्या बापाचा माल आहे का?
  • मा. गो. वैद्य म्हणतात महाराष्ट्राचे 4 तुकडे करा, हा महाराष्ट्र म्हणजे केक आहे का? तुकडे करायला? 
  • विदर्भ, मराठवाड्यातून अनेक मंत्री झाले, त्यांनी लक्ष दिले नसेल तर महाराष्ट्राचा दोष कसा?
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नरचा आणि जिजामातांचा जन्म बुलडाण्याचा. मग विदर्भ वेगळा करून माय-लेकाची ताटातूट करताय का?
  • मंत्र्यांनी त्यांच्या भागाचा विकास केला नाही, म्हणून तुम्ही महाराष्ट्र तोडायला निघालात?
  • तुम्हाला विकास जमत नसेल, तर खुर्च्या खाली करा.
  • संघाची महाराष्ट्र तोडण्याची भूमिका असेल तर त्यांनी आधी त्यांचा लाडका गुजरात तोडावा.
  • पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांप्रमाणे मराठवाड्यातल्या नेत्यांनी साखर कारखाने उभारले, त्यामुळेच दुष्काळ.
  • काँग्रेसच्या राज्यातही शेतकरी आत्महत्या होत्या, आज यांच्या राज्यातही होत आहेत.
  • मंत्रालयाबाहेर एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्यांच्या मेसेजमुळे डोळ्यातून पाणी येत आहे.
  • राज्यात 33 हजार विहिरी बांधल्याचे फडणवीस सांगतात, पण कुठे बांधल्या त्या दाखवा.
  • या सरकारला आता ना अधिकारी विचारतात, ना जनता.
  • देवेंद्र फडणवीस बिनकामाचे, अशा चांगल्या माणसाचा उपयोग नाही.
  • ओवैसी इतके बरळतात, मग त्यांच्यावर गुन्हे का नाहीत? माझ्यावरच का?
  • रिक्षा जाळा म्हटल्याचे दाखवले, मग रामदेवबाबा गर्दन छाटा म्हणाले ते का नाही दाखवले?
  • बाहेरच्यांना पोसण्यासाठी इथल्या जनतेवर पाणीकपातीचे संकट ओढवले आहे.
  • भूजला भूकंप झाला त्यावेळी इथल्या गुजरातींनी भरभरून मदत केली, मग लातूरच्या भूकंपावेळी यांचे हात का ढिले झाले नाहीत?
  • अनधिकृत इमारती अधिकृत करता, पण बिल्डरवर कारवाई का नाही?
  • भारताविरोधी घोषणा देणाऱ्या पीडीपीसोबत भाजपची युती, मग तुमचा राष्ट्रवाद कसला?
  • आरएसएसच्या कामाबद्दल आदर, पण या धंद्यांबद्दल नाही.
  • जेएनयू प्रकरण इतके चालवले, जसे की देशात दुसरे प्रश्नच नव्हते.
  • शिवजयंती जशी साजरी झाली, तशीच बाबासाहेबांची जयंती साजरी करू.
  • शिवजयंतीप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांची 125 जयंतीही जल्लोषात साजरी झाली पाहिजे.