शनिवार, 30 अक्तूबर 2010

राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस

राज ठाकरेंना निवडणूक आयोगाची नोटीस
वृत्तसंस्था
Saturday, October 30, 2010 AT 12:48 PM (IST)


मुंबई- कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईतून डोंबिवलीत तळ हलविलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्य निवडणूक आयोगाने डोंबिवली सोडण्यासाठी नोटीस बजावली आहे.
या निवडणुकीसाठी मतदान रविवारी (३१ ऑक्‍टोबर) सुरू होणार आहे. त्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील आपला तळ हलविणे आवश्‍यक आहे.
शुक्रवारी रात्री डोंबिवलीच्या पूर्व भागातील ठाकरे यांच्या निवासस्थानी आयोगाने ही नोटीस बजावली.



 

शुक्रवार, 29 अक्तूबर 2010

मनसेची भूमिका निर्णायक ठरणार!

मनसेची भूमिका निर्णायक ठरणार!
सकाळ वृत्तसेवा
Saturday, October 30, 2010 AT 12:30 AM (IST)
कल्याण - कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातच मुख्य लढत असली, तरी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्‍यता नाही. "पालिकेत आमचाच महापौर असेल,' अशी घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने निकालानंतर त्रिशंकू स्थिती झाल्यास ते युतीचा पाठिंबा घेणार की आघाडीचा, यावरच सर्व राजकीय गणिते अवलंबून आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे विरुद्ध मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात कलगीतुरा रंगल्याने कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीला यंदा प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी यथेच्छ चिखलफेक झाल्याने निकालानंतर युती आणि मनसे कितपत एकत्र येतील, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोणत्याही एका आघाडीला बहुमत न मिळाल्यास मनसेची भूमिका निर्णायक ठरेल. अंबरनाथ नगरपालिकेत मनसेने युतीला पाठिंबा दिल्याने त्या बदल्यात मनसे युतीचा पाठिंबा घेईल की आघाडीचा, हे पाहणे रंजक ठरेल. आघाडीचा पाठिंबा घेतल्यास मनसेला अनेक आरोपांना तोंड द्यावे लागेल. त्यामुळेच राज ठाकरे सातत्याने "पूर्ण सत्ता द्या,' असे आवाहन मतदारांना करीत आहेत. "आम्ही कॉंग्रेसशी चर्चा केली, तर त्याला "डील' म्हणू नका,' असेही त्यांनी युतीच्या नेत्यांना खडसावल्याने पुढील राजकारण मनसेभोवती कसे फिरेल, त्याची ही चुणूक मानली जात आहे. या पालिकेसाठी येत्या रविवारी (ता. 31) मतदान होणार असून सोमवारी (ता. 1) सकाळी 10.30 पासून मतमोजणी सुरू होईल.

एखादा पक्ष किंवा आघाडीला निर्णायक किंवा स्पष्ट कौल न देण्याची येथील मतदारांची आजवरच्या तीन निवडणुकांतील परंपरा आहे. 1995 ते 2005 या कालावधीत शिवसेना-भाजप युतीला अपक्षांची मदत घेऊनच सत्ता हस्तगत करावी होती. गेल्या पाच वर्षांत आधीची अडीच वर्षे आघाडी आणि आताची अडीच वर्षे शिवसेना-भाजप युती सत्तेत आहे. या अडीचकीच्या सत्तेची मदारही अपक्षांवरच होती.

पालिकेच्या 107 जागांपैकी शिवसेना 62 जागा लढवीत असून भाजपची लढाई 45 जागांवर आहे. युतीसाठी यंदाची निवडणूक ही अस्तित्वाची लढाई आहे. नजीकच्या काळातील मुंबई, ठाण्याच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर युतीसाठी ही जनमत चाचणी आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांपैकी एकाही राजकीय पक्षाने स्वबळावर 107 जागा लढविलेल्या नाहीत. फक्त मनसे सर्व जागा लढवीत आहे. कॉंग्रेसविरोधातील बंडखोरांनी यंदा "कल्याण-डोंबिवली विकास आघाडी' उघडली आहे आणि या आघाडीचे 12 उमेदवार रिंगणात आहेत. या आघाडीचे "रिंगमास्टर' "राष्ट्रवादी'पुरस्कृत आमदार गणपत गायकवाड असल्याने कॉंग्रेसपुढे आव्हान उभे ठाकले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जागावाटपावरून आधी वाद झाला असला आणि नंतर कॉंग्रेस 55, राष्ट्रवादी 52 या सूत्रावर तो मिटविण्यात आला असला, तरी कमी जागा लढवून अधिक जागांवर विजय मिळविण्याची परंपरा राष्ट्रवादी कॉंग्रेस यंदाही कायम राखते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे."रिडालोस'चे 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या वेळी रिपाईंना तीन व बसपला एक जागा मिळाली होती. या वेळी ते आहे ती स्थिती कायम राखतात का, हेही सोमवारी स्पष्ट होईल.

प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीतच तळ ठोकला असून गेल्या आठवड्यात त्यांच्या चार सभा पार पडल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी "रोड शो' अणि प्रचारसभांचा सपाटा लावला आहे. राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही "रोड शो' केला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत डोंबिवलीच्या माहेरवाशीण असलेल्या त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे आणि "युवा सेने'चे सेनापती आदित्य ठाकरे हेही रणधुमाळीत सहभागी झाल्याने ठाकरे कुटुंबीय प्रचारात उतरल्याचे दिसून आले. आघाडीतर्फे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह आर. आर. पाटील, नारायण राणे, सुनील तटकरे, गणेश नाईक, जयंत पाटील, वसंत डावखरे आदी दिग्गजांनी सभा आणि "रोड शो' केले. भाजपतर्फे सुधीर मुनगंटीवार यांच्यासह मुंबई-ठाण्यातील आमदारांनी प्रचाराचा डोलारा सांभाळला.

विकासापेक्षा भाऊबंदकीच प्रचाराचा मुख्य मुद्दा! कल्याण-डोंबिवलीच्या विकासापेक्षा ठाकरे घराण्यातील वाद हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरल्याचे दिसून आले. दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या आतषबाजीला सुरुवात केली आणि कालांतराने सर्वच नेते त्यात सहभागी झाले. प्रचारात युतीने आपल्या आजवरच्या कामांवर भर दिला; तर राज ठाकरे आणि आघाडीच्या नेतेमंडळींनी युतीने शहराचा कसा सत्यानाश केला, यावर भर दिला. आघाडीने शहर विकासाला निधी देण्याचे आश्‍वासन दिले; तर रामदास आठवले यांनी जातीयवादी शक्तींना सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन केले. प्रचारात रस्ते, प्रदूषण, अनधिकृत बांधकामे यांचाही उल्लेख झाला. शिवसेना आणि मनसेने "एसएमएस', "वेबसाईट', "एलसीडी'चा वापर करीत प्रचार हायटेक केला

अभद्र युतीला घालवा - राज ठाकरे

अभद्र युतीला घालवा - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Saturday, October 30, 2010 AT 12:15 AM (IST)
 

कल्याण - कल्याण व डोंबिवली शहरांना शिवसेना-भाजप युतीने बकाल केले. त्यामुळे या अभद्र युतीला सत्तेवरून खाली खेचा आणि मनसेच्या हाती पूर्ण बहुमतात सत्ता द्या आणि शहरांच्या विकासाबाबत निश्‍चिंत राहा, असे आवाहन राज ठाकरे यांनी सुभाष मैदानात झालेल्या प्रचारसभेत मतदारांना केले. या वेळी

कल्याण-डोंबिवलीत सात दिवस मुक्काम आहे, हे नाटक नसून ती सत्ता आल्यानंतरची "प्रॅक्‍टिस' आहे, असे राज म्हणाले. वाहतूक कोंडी, उखडलेले रस्ते, उघडी गटारे आणि सर्वत्र भटकणारी कुत्री, कचऱ्याचे साचलेले ढीग याने नागरिक त्रस्त आहेत. 1995 पासून शिवसेना सत्तेत आहे. त्या वेळी राज्यात युतीचेच सरकार होते तेव्हा या शहरांचा विकास का नाही केला, असा सवाल त्यांनी केला.

पालिका सत्ताधाऱ्यांनी टक्केवारी मिळवली. कंत्राटदारांचे लाड केले. सर्वांनीच आपले उखळ पांढरे केले. ते नागरिकांचे काय कल्याण करणार, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

सध्या राज्यात विरोधी पक्ष शिल्लक आहेच कुठे, स्वार्थासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले आहेत आणि नागरिकांची फसवणूक करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

राज्यात आघाडीची सत्ता असताना कल्याण-डोंबिवलीत विजेचे भारनियमन का, असा सवाल मुख्यमंत्र्यांना करतानाच पालिकेची सत्ता हाती मागणाऱ्या आघाडी नेत्यांची कथनी आणि करणी भलतीच आहे, अशा शब्दांत टीका केली

या वेळी मुख्यमंत्र्यांच्या "छप्पर फाडके' आश्‍वासनांचा खरपूस समाचार घेतला.

"एमएमआरडीए' आणि राज्य सरकार निधी देत नाही, असे युतीवाले म्हणत आहेत. याच "एमएमआरडीए'च्या अधिकृत सदस्यांत शिवसेनेचे महापौर व अन्य सदस्य आहेत. मग त्यांना निधी का आणता आला नाही. विकासासाठी इच्छा लागते. तीच यांच्याकडे नाही. मनसेकडे पूर्ण सत्ता द्या. कल्याण-डोंबिवलीचा चेहरामोहरा बदलतो, असे आवाहन शेवटी त्यांनी मतदारांना केले

गुरुवार, 28 अक्तूबर 2010

Raj Thakre At Kalyan 27/10/2010 p2

Raj Thakre At Kalyan 27/10/2010

स्वत:ला काय शिवाजी समजतोस काय?

स्वत:ला काय शिवाजी समजतोस काय?
-
Friday, October 29, 2010 AT 12:17 AM (IST)

डोंबिवली - 'हा खंडू खोपडे, तो सूर्याजी पिसाळ; मग हा कोण शिवाजी का,'' अशी बोचरी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आज येथे केली.

डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील अप्पा दातार चौकात सायंकाळी मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. काल कल्याणमध्ये झालेल्या प्रचारसभेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर सडकून टीका केली होती. त्याला राज ठाकरे यांनी या सभेतून प्रत्युत्तर दिले.

कसाबला फाशी का दिली जात नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत उपस्थित केला होता. त्यावर कसाबच्या फाशीचा कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांशी काय संबंध, असा सवाल राज यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत अफझलखानाचा शिवाजी महाराजांनी कसा कोथळा बाहेर काढला याविषयी वक्तव्य केले होते. त्याची, सत्तेवर असताना कल्याण-डोंबिवलीकरांचा कोथळा बाहेर काढला त्याचे काय, असे विचारून राज यांनी खिल्ली उडविली आहे. आपणास अंतर्गत वाद वाढवायचे नाहीत, असेही त्यांनी भाषणाच्या ओघात सांगितले.

या वेळी राज यांनी भाजपचाही समाचार घेतला. युतीच्या अंगाशी येते तेव्हा ते प्रशासनाला दोष देतात. टेंडरमध्ये पैसे खाताना प्रशासन आड येत नाही. टेंडर कशी पास होतात, असे विचारून राज म्हणाले, की सर्व बाजूने शहरे पोखरून काढणाऱ्या या लोकांना जरासुद्धा लाज वाटत नाही? माझ्या हाती सत्ता द्या. येथील समस्या दूर केल्या नाहीत, तर मी पुन्हा तोंड दाखवायलासुद्धा कल्याण-डोंबिवलीत पाय ठेवणार नाही, असेही ते म्हणाले. या वेळी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरही त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाष्य केले.

अपक्षांना थारा देऊ नका, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

ते भेटले की क्रांती, आम्ही भेटलो की डील?

ते भेटले की क्रांती, आम्ही भेटलो की डील?
सकाळ वृत्तसेवा
Thursday, October 28, 2010 AT 12:15 AM (IST)

डोंबिवली - 'जनतेच्या कामासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, की युतीचे नेते आघाडीशी आतून समझोता झाल्याची टीका करतात. ते भेटले, की क्रांती आणि आम्ही भेटलो की डील? आमच्यावर अशी टीका करणारी शिवसेना-भाजप युती निवडणुका लढवितेच कशाला? त्यांनी निवडणुका लढवू नयेत,'' असे सडेतोड उत्तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी युतीच्या नेत्यांना दिले.

'ठाकरे घराण्यातील भांडणे कल्याण-डोंबिवलीच्या निवडणूक रिंगणात कशाला?'' अशी ओरड आघाडीच्या नेत्यांनी सुरू केली आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले,

'आधी त्यांनी त्यांचे धोतर सांभाळावे. मग आमच्या वादाविषयी बोलावे. दोन महिने मी काहीच बोललो नव्हतो, तेव्हा काहीच बोलत नाही, अशी टीका सुरू होती. आता तोंड उघडले, की म्हणतात, "पेटवतो'.'' "दोन ठाकरेंमधील वादामुळे मराठी मतांचे विभाजन होत नाही का' असा प्रश्‍न विचारला असता, 'कॉंग्रेस-राष्ट्रवादीला काय कानडी माणूस मतदान करतो का? हे प्रश्‍न मराठी माणसाला विचारले गेलेच पाहिजेत. कारण मतदान तो करणार आहे.''

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा मनसेचा वचकनामा राज ठाकरे यांच्या हस्ते डोंबिवली पूर्वेतील हेरिटेज हॉलमध्ये प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, रमेश पाटील, शिशिर शिंदे, राजन गावंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. ""गेली साडे बारा वर्षे सत्तेत असलेली युती राज्य सरकारने सापत्न वागणूक दिली, शहर विकासाला निधी दिला नाही,'' असा प्रचार करीत आहे. त्यावर ""राज्य शासन कामे अडवून ठेवत असेल आणि निधी देत नसेल; तर शिवसेना-भाजप युती निवडणुका लढवितेच कशाला. नका लढवू निवडणुका,'' असा टोला ठाकरे यांनी दिला.

'शिवसेनाप्रमुखांनी नऊ वर्षांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्याध्यक्षपदाच्या नेमणुकीचा मुद्दा उकरून काढला आहे. एकच मुद्दा किती वेळा बोलणार आहात, असे सांगत डोंबिवलीतील प्रचारसभेत भाषणाच्या सुरुवातीला मी "कॉपी'च्या आणि उद्धवच्या नेमणुकीच्या मुद्द्याला उत्तर दिले; बाकीचे सगळे भाषण हे कल्याण-डोंबिवली शहरातील समस्यांशी निगडित होते. पेपरवाल्यांनी ते प्रसिद्ध न करता नेमका हाच मुद्दा उचलून धरला. तसेच खोबरे नसलेल्या करवंट्या आणि शेंदूर फासलेले दगड, असे विधान शिवसेनाप्रमुखांच्या आजूबाजुला असलेल्या लोकांविषयी केले होते,'' याकडे राज यांनी लक्ष वेधले. "माय नेम इज खान' या चित्रपटाला विरोध करून त्यानंतर त्याच चित्रपटाची जाहिरात शिवसेनेच्या मुखपत्रात छापण्यात आली. ही जाहिरात मागितलेली होती. आता ते म्हणतील, की जाहिरात त्यांनी (शाहरूखच्या कंपनीने) पाठविली होती. पण मग ती नाकारण्याचा अधिकार होता ना,'' असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आणि अप्रत्यक्षरित्या आंदोलनासाठी लाठ्या खाणाऱ्या शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची बाजू मांडली. राज ठाकरे यांनीच महाबळेश्‍वर येथे उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्षपदी निवडल्याची चित्रफीत शिवसेना प्रचारात दाखविणार आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, ती काय ऍडल्ट फिल्म आहे का? असे सांगत राज ठाकरे यांनी ही फिल्म दाखवून काय साध्य होणार, असा प्रतिप्रश्‍न केला.

कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक मला अन्य कोणत्याही मुद्द्याभोवती फिरवायची नसून जनतेच्या प्रश्‍नाभोवतीच ठेवायची आहे. नागरिकांच्या प्रश्‍नांशी संबंधित असलेल्या मुद्द्यांवरच मनसे निवडणूक लढवित असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आणि यापुढील सभांत याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले.

भाऊबंदकीचा दुसरा अंक

भाऊबंदकीचा दुसरा अंक
-
Thursday, October 28, 2010 AT 01:15 AM (IST)


दुभंगलेले ठाकरे घराणे पुन्हा एकत्र करून त्यातून शिवसेनेची वज्रमूठ उभी करण्याचे स्वप्न जे बघत होते, त्यांना काका-पुतण्याच्या सवाल-जवाबातून बोध घेणे भाग आहे.

दिवाळी सुरू होण्याआधीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्यात वाक्‌बाण युद्ध सुरू झाले आहे. शब्दांची आतषबाजीही रंगू लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यापासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात जाहीर शिव्याशाप सुरू होते. "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी मात्र मी कधीही काही बोलणार नाही,' असे राज नेहमी सांगत असत; पण उद्धव यांनी थेट सामना करायचे टाळून जेव्हा बाळासाहेबांमार्फत शरसंधान सुरू केले तेव्हा राज यांना आपली प्रतिज्ञा कधी ना कधी मोडावी लागणार, हे स्पष्ट होते. बाळासाहेबांची प्रकृती ठीक नव्हती त्या वेळी त्यांच्या नावे प्रसिद्धीला दिल्या जाणाऱ्या पत्रकातून किंवा "सामना'च्या कार्यकारी संपादकांना त्यांनी दिलेल्या मुलाखतीतून राज यांच्या टिकेला उत्तरे दिली जात असत. प्रकृती स्थिरावल्यानंतर या वेळी ते दसरा मेळाव्याला आले आणि त्यांच्या तोंडूनच राज यांची टिंगलटवाळी केली गेली. आपल्या नातवाचे लॉंचिंग करताना शिवसेनाप्रमुखांनी पुतण्यावर केलेले शरसंधान घराणेशाहीची कक्षा आणखी संकुचित करणारे होते. राज यांनी त्याला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचे निमित्त साधून उत्तर दिले. शिवसेनाप्रमुखांनी या देशातल्या एकाही नेत्याला आपल्या ठाकरी शैलीतून सोडलेले नाही. त्यामुळे त्यांचेच बाळकडू घेऊन मोठ्या झालेल्या राज यांनी तरी किती काळ तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करायचा? "अरे'ला "कारे' करणे हा ठाकरी बाणा असेल, तर राजही "ठाकरे'च आहेत हे त्यांनी डोंबिवलीच्या मैदानात दाखवून दिले.

राज यांच्या टीकेला उत्तर देताना शिवसेनाप्रमुखांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात "राज ठाकरे' हीदेखील घराणेशाहीच असल्याचे म्हटले आहे. ते बरोबरच आहे. त्यामुळे बाळासाहेब यांना राज यांनी दिलेल्या घरच्या आहेराने देशातले सारेच राजकारणी थक्क झाले तर नवल नाही. शिवसेनाप्रमुखांच्या वयाचा विचार करून गेल्या काही दिवसांत सर्वच राजकारण्यांनी त्यांना आपल्या राजकीय टीकेच्या वर्तुळाबाहेर ठेवले होते. पण आता खुद्द त्यांच्या पुतण्यानेच हे वर्तुळ छेदले असल्याने राजकारणातील इतर नेत्यांनाही बोलायला मोकळीक मिळणार आहे. महसूलमंत्री नारायण राणे यांनीही शिवसेना सोडल्यानंतर राज यांच्यासारखीच प्रतिज्ञा केली होती. पण त्यांनाही ही प्रतिज्ञा मोडायला शिवसेनेने भाग पाडले. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंवरच "हल्लाबोल' केला. त्याचा त्यांना बराच त्रास झाला. बरीच शक्ती वाया गेली. त्यापासून धडा घेऊन राज आणि राणे या दोघांनीही बाळासाहेब यांना टिकेपासून दूर ठेवून उद्धव यांनाच आपले लक्ष्य केले होते. उद्धव यांच्या दृष्टीने हीच मोठी अडचण होती. या दोघांना थेट बाळासाहेबांच्या तोंडी देणे उद्धव यांची राजकीय गरज होती. राज यांनी बाळासाहेबांवर तोंडसुख घेण्याआधी काही दिवस राणे यांनीही "मातोश्रीवरील लीला' सांगण्याची धमकी दिली होती. त्यालाही बाळासाहेबांनाच उत्तर द्यावे लागले. त्यामुळे बाळासाहेबांना दैवत मानणारा शिवसेनेचा विरोधक उद्धव यांनी शिल्लक ठेवला नाही, असे म्हणता येईल. ही बेरीज समजायची की वजाबाकी याचा विचार शिवसेनेच्या नेत्यांना करावा लागणार आहे. राज आणि उद्धव यांच्यात दुभंगलेले "ठाकरे घर' सांधण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांनाही आपोआपच खिळ बसणार आहे. ठाकरे घराणे पुन्हा एकत्र करण्याचे, त्यातून शिवसेनेची वज्रमूठ उभी करण्
याचे आणि मराठी माणसाचे राजकारण सांधण्याचे स्वप्न जे बघत होते, त्यांना काका-पुतण्याच्या या सवाल-जवाबातून बोध घेणे भाग आहे. राज काय आणि बाळासाहेब काय, दोघेही बोलले ते खरेच आहे. राज बाळासाहेबांच्याच तालमीत तयार झाले हेही खरे आणि बाळासाहेबांनी त्यांच्या संयमाचा विचार न करता आगपाखड केली हेही खरेच. तरीही दोघांनीही जे बोलायला हवे, ते टाळलेच आहे. केवळ व्यक्तिगत शेरेबाजी आणि टिंगलटवाळी यापुरताच विषय थांबला आहे. अशा व्यक्तिगत निंदानालस्तीतून लोकांची घटकाभर करमणूक होते; पण त्यातून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने काहीच साध्य होत नाही. दोघांनाही परस्परांविषयी खरे बोलायचे असेल तर बोलण्यासारखे पुष्कळ आहे. त्यातून कदाचित सार्वजनिक हितही साधले जाईल! पण तसे काही होणार नाही. काचेच्या घरात राहणारे दुसऱ्याच्या घरावर दगड मारत नाहीत, हे भारतातील राजकारणी चांगले जाणून असतात. त्यामुळे ठाकरे घराण्याने कल्याण-डोंबिवलीमध्ये जो धोबीघाट घातला, त्यातून ना कल्याण-डोंबिवलीच्या नागरिकांचे कल्याण होणार, ना महाराष्ट्रातील जनतेचे.

.

बुधवार, 27 अक्तूबर 2010

युतीनेच केला कल्याण-डोंबिवलीचा सत्यानाश

युतीनेच केला कल्याण-डोंबिवलीचा सत्यानाश
सकाळ वृत्तसेवा
Thursday, October 28, 2010 AT 12:30 AM (IST)

कल्याण  - ऐतिहासिक वारसा असलेल्या, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याणमध्ये ज्यांच्या हाती भगवा झेंडा होता, त्यांनी कल्याण-डोंबिवली शहराचा सत्यानाश केला,'' अशी जळजळीत टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथील प्रचारसभेत केली. नेहमीच्या आक्रमक शैलीत त्यांनी युती, आघाडीवर सडकून टीका केली असली, तरी त्यांचा सर्वाधिक भर विकासाच्या मुद्द्यावरच होता.

कल्याण पूर्वेतील डबल टॉवर येथे मनसेतर्फे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी आमदार बाळा नांदगावकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा शालिनी ठाकरे, काका मांडले, आमदार प्रकाश भोईर आदी उपस्थित होते.

'पत्रकारांनी मला प्रश्‍न विचारला, की तुम्हाला विकासकामांचा अनुभव काय? मग सांगा, लग्नाच्या वेळी अनुभव विचारला जातो का? माझा आत्मविश्‍वासच हा माझा अनुभव आहे. कल्याणची परंपरा ऐतिहासिक आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी कल्याण जिंकले होते. त्या वेळी कल्याणमध्ये त्यांना सोन्याच्या मोहोरांचे हंडे सापडले होते. आता हंडा सापडत नाही. सगळे गिळून टाकले सत्ताधारी पक्षाने. पहिल्या बाजीरावांचे लग्न कल्याणमध्ये झाले; पण या ऐतिहासिक शहराची युतीने विल्हेवाट लावली. नगरसेवकांनी काय करून ठेवले आहे, याचा बाळासाहेबांना पत्ताच नाही. युतीने कल्याण-डोंबिवली शहरे भकास करून ठेवली. आता माझ्या हाती सत्ता द्या, केळी सोलल्यासारखे एकेकाला सोलून ठेवतो,'' असे सांगत त्यांनी युतीच्या कारभारावर हल्ला चढविला.

'गटारे उघडी, रस्ते नाहीत, रुग्णालये नाहीत; यांनी काही केले नाही तरी लोक मतदान करतात. त्यामुळे तुम्हाला गृहित धरण्यात आले आहे. जोपर्यंत त्यांचा विश्‍वास मोडीत काढत नाहीत, तोपर्यंत काही वेगळं घडणार नाही. हा विश्‍वास मोडून काढण्याची संधी चालून आली आहे. निवडून दिलेले लोक रग्गड झाले. शहर भकास झाले. निवडून दिलेल्या सत्ताधारी पक्षाने शहराच्या विकासाचा आत्मियतेने विचारच केला नाही. सकाळी दोन-तीन तास आणि सायंकाळी तीन तास वीज भारनियमन केले जाते. रोज करण्यासाठी काय तो व्यायाम आहे,'' असा सवाल राज यांनी केला. "माय नेम इज खान'च्या वेळी काठ्या खाणाऱ्या शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या वाढदिवसाला "सामना' मुखपत्रात चित्रपटाची जाहिरात छापून आल्यावर काय वाटले असेल? मी जर कृपाशंकरच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेलो, तर काय वाटेल माझ्याविषयी? तेच वाटले होते शिवसैनिकांना, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

आजवर मी जे बोललो तेच केले आहे, असे सांगत मराठीतून दुकानांच्या पाट्या, मोबाईल फोनवरही मराठीला प्राधान्य, असे दाखले त्यांनी दिले. ""कल्याण डोंबिवलीबाबत बोलतोय तेच खरे करून दाखविणार आहे. कारण टेंडरवर माझे घर चालत नाही,'' असे सांगून ते म्हणाले, ""दात स्वच्छ होत नसतील, तर लोक टूथपेस्टही बदलतात. तुम्ही तर पंधरा-पंधरा वर्षे दात खराब झाले, पडायला आले तरी एकच टूथपेस्ट (युती) वापरत आहात. आता मनसे ही नवी टूथपेस्ट आहे. नवीन चकाचक. ती 31 ऑक्‍टोबरला वापरावीच लागेल; त्याशिवाय गत्यंतर नाही,'' अशी मल्लीनाथी राज ठाकरे यांनी केली.

शांतता नाही, तोपर्यंत भाषण नाही!सभेच्या ठिकाणी गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. उपस्थितांचा एकच गोंधळ सुरू होता. त्यामुळे सुरुवातीला 15 मिनिटे राज ठाकरे काहीच बोलले नाहीत. "जोपर्यंत शांतता होत नाही, तोपर्यंत भाषण करणार नाही; अन्यथा भाषण न करताच निघून जाईन,' असा दमही त्यांनी उपस्थितांना भरला. त्यानंतर गैरसोयीविषयी दिलगिरी व्यक्त करीत आधीच्या लोकांनी (सत्ताधारी युतीचे नेते) सगळ्या मोकळ्या जागा खाऊन टाकल्याने सभांसाठी जागा मिळत नसल्याचा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.

ठाकरी शैलीत रंगलाय "वस्त्रहरणा'चा प्रयोग

ठाकरी शैलीत रंगलाय "वस्त्रहरणा'चा प्रयोग
सकाळ वृत्तसेवा
Thursday, October 28, 2010 AT 01:00 AM (IST)

राज हा वार करणारा "वार'करी - उद्धव ठाकरेडोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मतदानासाठी आता चारच दिवस उरले असताना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांच्याही जाहीर सभांचे कुरुक्षेत्र बुधवारी चांगलेच रंगले. एकूणच या प्रचारात वैयक्तिक टीका करताना ठाकरी शैलीत एकमेकांच्या "वस्त्रहरणा'चा प्रयोग रंगत आहे. डोंबिवलीच्या "कल्याणा'चा मात्र या ठाकरी कलहात विसर पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

'ज्या बाळासाहेबांना विठ्ठल म्हणतो, त्यांच्यावरच वार करणारा हा वारकरी आहे,'' असा हल्ला चढवत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. ""सभेला कपडे कोणते घालू म्हणत होतास; पण कपडे काढल्यासारखा बोललास. माझ्यावर टीका केली, तरी मी गप्प राहिलो; पण बाळासाहेबांवर-माझ्या वडिलांवर हल्ला चढवशील, तर महाभारतातल्या अर्जुनासारखा-षंढासारखा मी गप्प बसणार नाही,'' असे प्रत्युत्तर उद्धव यांनी दिले. येथील युतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी त्यांच्यासोबत लोकसभेतील भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

रुळावरून घसरलेले रेल्वे इंजिन प्रदूषण करीत फिरत आहे, अशी टीका करताना उद्धव यांनी राज यांच्या प्रत्येक मुद्‌द्‌याचा समाचार घेतला आणि त्यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला. मनसेचा धनसे असा उल्लेख ते सतत करीत होते. 'ज्याला अंगाखांद्यावर खेळविले, त्याने पूर्वी कपडे खराब केले होते. आता मोठा झालास. आता तरी आमचे कपडे खराब करू नकोस,'' असा टोला लगावताना राज यांचा उल्लेख त्यांनी "नालायक', "खंडोजी खोपडे' असा केला. 'शिवसेनेत खोबरे काढलेल्या करवंट्या उरल्या आहेत, असे म्हणून तू शिवसैनिकांचा अपमान केला आहेस; पण तुझ्याभोवती गळकी टमरेलं आहेत. शिवसैनिक होते म्हणून मुंबईच्या दंगलीत हिंदू आणि मराठी माणसे वाचली,'' याचे स्मरण त्यांनी करून दिले.

सत्ता दिलीत, तर विकासासाठी मी कल्याण-डोंबिवलीत पंधरवड्यातून तीन दिवस मुक्काम ठोकेन, असे राज यांनी जाहीर केले होते, त्याचा संदर्भ देत उद्धव म्हणाले, ""इथे तिथे मुक्काम ठोकायला मी नाटकी नाही आणि गाव दिसले की मुक्काम टाकायला ही काही तमाशाची बारी नाही.'' शिवसेनेत अधिकार नव्हते, तर राजला नाशिकचा विकास कसा करता आला, असा प्रश्‍नही त्यांनी केला. तुझा लढा नेमका कोणाशी, शिवसेनेशी की कॉंग्रेसशी, हे एकदा जाहीर कर, असे आव्हानही त्यांनी राज यांना दिले.

युतीमुळे कल्याण-डोंबिवलीचा सत्यानाश - राजकल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीचा मनसेचा "वचकनामा' राज ठाकरे यांच्या हस्ते डोंबिवली पूर्वेतील हेरिटेज हॉलमध्ये प्रकाशित करण्यात आला. या प्रसंगी मनसेचे आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, रमेश पाटील, शिशिर शिंदे, राजन गावंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी राज यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

'शिवसेनाप्रमुखांनी नऊ वर्षांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्याध्यक्षपदाच्या नेमणुकीचा मुद्दा उकरून काढला आहे. एकच मुद्दा किती वेळा बोलणार आहात, असे मी डोंबिवलीतील प्रचारसभेत भाषणाच्या सुरवातीला "कॉपी'च्या आणि उद्धवच्या नेमणुकीच्या मुद्‌द्‌याला उत्तर दिले; बाकीचे सगळे भाषण कल्याण-डोंबिवली शहरातील समस्यांशी निगडित होते,'' याकडे राज यांनी लक्ष वेधले. ""माय नेम इज खान' या चित्रपटाला विरोध करून त्यानंतर त्याच चित्रपटाची जाहिरात शिवसेनेच्या मुखपत्रात छापण्यात आली. ही जाहिरात मागितलेली होती. आता ते म्हणतील की, जाहिरात त्यांनी (शाहरुखच्या कंपनीने) पाठविली होती. पण मग ती नाकारण्याचा अधिकार होता ना,'' असा सवाल राज यांनी केला व आंदोलनासाठी लाठ्या खाणाऱ्या शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची बाजू मांडली. राज यांनीच महाबळेश्‍वर येथे उद्धव यांना कार्याध्यक्षपदी निवडल्याची चित्रफीत शिवसेना प्रचारात दाखविणार आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता, "ती फिल्म दाखवून काय साध्य होणार,' असा प्रतिप्रश्‍न राज यांनी केला.

'ठाकरे घराण्यातील भांडणे कल्याण-डोंबिवलीच्या निवडणूक रिंगणात कशाला?''

अशी ओरड आघाडीच्या नेत्यांनी सुरू केली आहे. त्यावर राज ठाकरे म्हणाले, 'आधी त्यांनी त्यांचे धोतर सांभाळावे. मग आमच्या वादाविषयी बोलावे. दोन महिने मी काहीच बोललो नव्हतो, तेव्हा काहीच बोलत नाही, अशी टीका सुरू होती. आता तोंड उघडले की म्हणतात, "पेटवतो'.'' "दोन ठाकरेंमधील वादामुळे मराठी मतांचे विभाजन होत नाही का,' असा प्रश्‍न विचारला असता, 'कॉंग्रेस-राष्ट्रवादीला काय कानडी माणूस मतदान करतो का? हे प्रश्‍न मराठी माणसाला विचारले गेलेच पाहिजेत. कारण मतदान तो करणार आहे.''

'पालिकेत गेली साडेबारा वर्षे सत्तेत असलेली युती राज्य सरकारने सापत्न वागणूक दिली, शहर विकासाला निधी दिला नाही,'' असा प्रचार करीत आहे. त्यावर 'राज्य शासन कामे अडवून ठेवत असेल आणि निधी देत नसेल तर शिवसेना-भाजप युती निवडणुका लढवितेच कशाला. नका लढवू निवडणुका,'' असा टोला राज ठाकरे यांनी मारला.

'जनतेच्या कामासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली की युतीचे नेते आघाडीशी आतून समझोता झाल्याची टीका करतात. ते भेटले की क्रांती आणि आम्ही भेटलो की डील? आमच्यावर अशी टीका करणारी शिवसेना-भाजप युती निवडणुका लढवितेच कशाला? त्यांनी निवडणुका लढवू नयेत,'' असे सडेतोड उत्तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी युतीच्या नेत्यांना दिले.

'ऐतिहासिक वारसा असलेल्या, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याणमध्ये ज्यांच्या हाती भगवा झेंडा होता, त्यांनी कल्याण-डोंबिवली शहराचा सत्यानाश केला,'' अशी जळजळीत टीका राज ठाकरे यांनी रात्री झालेल्या प्रचारसभेत केली.

'पत्रकारांनी मला प्रश्‍न विचारला की, तुम्हाला विकासकामांचा अनुभव काय? मग सांगा, लग्नाच्या वेळी अनुभव विचारला जातो का? माझा आत्मविश्‍वासच हा माझा अनुभव आहे. कल्याणची परंपरा ऐतिहासिक आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी कल्याण जिंकले होते. त्या वेळी कल्याणमध्ये त्यांना सोन्याच्या मोहोरांचे हंडे सापडले होते. आता हंडा सापडत नाही. सगळे गिळून टाकले सत्ताधारी पक्षाने. पहिल्या बाजीरावांचे लग्न कल्याणमध्ये झाले; पण या ऐतिहासिक शहराची युतीने विल्हेवाट लावली. नगरसेवकांनी काय करून ठेवले आहे, याचा बाळासाहेबांना पत्ताच नाही. युतीने कल्याण-डोंबिवली शहरे भकास करून ठेवली.

Raj Thakre Wachknama Press Conference 5

Raj Thakre Wachknama Press Conference 4

Raj Thakre Wachknama Press Conference 3

Raj Thakre Wachknama Press Conference 2

Raj Thakre Wachknama Press Conference 1

तोच तो विषय बोलण्यात रस नाही - राज

तोच तो विषय बोलण्यात रस नाही - राज
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, October 27, 2010 AT 05:44 PM (IST)

मुंबई - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रचारात मी बाळासाहेबांबाबत अवघी १५ मिनिटे बोललो आणि इतर भाषण कल्याण डोंबिवलीतील समस्यांविषयी केले. मात्र, काही माध्यमांनी ठाकरे विरुद्ध ठाकरे हे चित्र रंगविले. त्यामुळे मला पुन्हा त्याच विषयाची चर्चा करण्यात काही रस नसून, कल्याण डोंबिवलीत वाढलेल्या अराजकतेविषयी पाऊल उचलायचे असल्याचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (बुधवार) आपल्या पक्षाचा 'वचकनामा' प्रसिद्ध करताना सांगितले.

कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी ३१ ऑक्टोबरला मतदान होत असून, प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करीत आहे. राज ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाचा वचकनामा जाहीर करताना, बाळासाहेबांच्या अंगाखांद्यांवर आपण खेळलो असल्याचे मान्य करीत बाळासाहेबांबद्दल आदर असल्याचे सांगितले. त्यामुळे तोच विषय पुन्हा बोलून काही मिळणार नाही. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला अशी म्हणणारी शिवसेना पुन्हा मत मागायला मराठी माणसाकडे कशाला आली, असा प्रश्नही त्यांनी त्यांनी केला.

कल्याण डोंबिवलीकरांनी पूर्ण सत्ता माझ्या हातात दिली तर या ठिकाणी मी स्वतः थांबून कामे कशी केली जातात हे दाखवून देईन. काही चुकलं तर मला जबाबदार धरा असेही राज यांनी सांगितले.

मंगलवार, 26 अक्तूबर 2010

Raj thakre kalyan/dombivli

Raj thakre Kalyan/dombivili 2

Raj thakre Kalyan/dombivili

राज ठाकरेंना शेंदूर सेनेने फासला-बाळासाहेब

राज ठाकरेंना शेंदूर सेनेने फासला-बाळासाहेब
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, October 26, 2010 AT 05:18 PM (IST)
 
मुंबई - राज ठाकरेसारख्या दगडाला शिवसेनेने शेंदूर फासला, म्हणूनच त्याच्याभोवती बडवे निर्माण झाले, या शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर मंगळवारी टीका केली. डोंबिवलीमधील प्रचारसभेत सोमवारी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंवर टीका केली होती. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी निवेदन प्रसिद्ध करून राज ठाकरेंवर प्रतिहल्ला चढविला.

राज ठाकरे हे शेंबडे पोरं असून, त्याला लहानचे मोठे आम्हीच केल्याचे बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरेच्या पक्षातच घराणेशाही असताना त्याने शिवसेनेवर चिखलफेक करू नये. उद्धव ठाकरेंची निवड राज ठाकरे यांनीच केली. महाबळेश्‍वरमध्ये त्यावेळी झालेल्या सभेची चित्रफित आमच्याकडे असून, कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापुरच्या नागरिकांना आम्ही ती दाखवणार आहोत, असेही बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले आहे.

सोमवार, 25 अक्तूबर 2010

मी कॉपी करत नाही

मी कॉपी करत नाही
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, October 26, 2010 AT 12:15 AM (IST)
 

डोंबिवली - 'मी काहीही बोललो तर माझी कॉपी करतो, अशी टीका माझ्यावर केली जात आहे. कारण माझ्यावर लहानपणापासून बाळासाहेबांचेच संस्कार आहेत. त्यांच्यासारखा वागणार-बोलणार नाही तर मग काय करणार,' अशी कबुली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे दिली. "माझी कॉपी करतो' या बाळासाहेबांच्या टीकेला राज ठाकरे यांनी आदरपूर्वक प्रत्युत्तर दिले आहे. मी आजही त्यांना मानतो, कालही मानत होतो. यापुढेही मानेन. इतरांनी लुडबूड करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्लाही राज ठाकरे यांनी दिला आहे.

डोंबिवली पश्‍चिमेतील भागशाळा मैदानात कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी आज सायंकाळी झालेल्या प्रचारसभेत राज बोलत होते. या वेळी नाट्य अभिनेते भरत जाधव, मनसेचे आमदार रमेश पाटील, रमेश वांजळे, शिशिर शिंदे, प्रकाश भोईर, प्रवीण दरेकर, शहर अध्यक्ष राजेश कदम, राहुल कामत, वैशाली दरेकर, मनोज चव्हाण, राजन गावंड, काका मांडले आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी राज यांनी सांगितले, की मी व्यंगचित्रकार झालो. माझ्या व्यंगचित्रांच्या ब्रशचा "स्ट्रोक' बाळासाहेबांसारखाच आहे. त्याविषयी यापूर्वी कोणी बोलले नाही. आचार्य अत्रे यांचे लिखाण आणि "सामना'मधील बाळासाहेबांचे अग्रलेख यात साम्य दिसून येईल. म्हणजे बाळासाहेबांनी अत्रेंची कॉपी केली, असे म्हणायचे? असे दाखले राज यांनी दिले. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा कार्याध्यक्ष मी केला, असे बाळासाहेब सांगतात. मला साधा शाखाप्रमुख नेमण्याचा अधिकार नव्हता; मात्र बाळासाहेब असे म्हणत असतील तर त्यांना माझा एकच सवाल आहे, की मी घेतलेला निर्णय अयोग्य होता तर तो माणूस तिथेच कसा ? आणि मी योग्य होतो तर माझे निर्णय चुकीचे कसे, असा सवाल उपस्थित करत राज म्हणाले, की शिवसेनेत आता जी जुनी माणसे आहेत ती सर्व खोबरे नसलेल्या करवंट्या आणि शेंदूर फासलेले वरवंटे आहेत.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलेवर बलात्कार केला, असा प्रचार निवडणुकीत करणाऱ्यांना माझा सवाल आहे, की हे पक्षाचे धोरण नाही. कल्याण-डोंबिवलीवर गेली 15 वर्षे शिवसेना-भाजप युतीने बलात्कार केला आहे. त्याची त्यांना शरम वाटत नाही. काल आघाडीच्या प्रचारसभेत मते द्याल तर ???"छप्पर फाड के मते देऊ,'??? असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना शरम वाटत नाही? सत्ता दिली तर निधी नाही, माणसे तडफडून मेली तरी त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, हे कोणते राज्यकर्ते आहेत? असाही सवाल त्यांनी केला. आघाडीची प्रचारसभा म्हणजे दहातोंडी रावणाचा अवतार असल्याची टीका केली.

या वेळी अमरसिंगांवर सडकून टीका करताना राज म्हणाले, की सगळ्यांनी नाकारल्यावर बेडूक असलेल्या अमरसिंगला शहाणपण आले आहे. मराठींचा मुद्दा उपस्थित करून मनसेने रान उठविले.

आता निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधींच्या बिहारी पुळक्‍याला प्रत्युत्तर देणारे स्वाक्षरीची मोहीम करीत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर राज ठाकरे यांनी केली. तेव्हा कुठे होती शिवसेना आणि उद्धव ठाकरेही कुठे गेले होते, असा सवाल उपस्थित केला.?????

मनसेच्या हाती सत्ता देणार असाल तर पूर्ण सत्ता द्या. कोणाच्या हनुवटीला हात लावण्याची वेळ आणू नका. सत्ताधारी युतीला सत्तेबाहेर फेकून द्या. संधी वारंवार येत नसते. गेली पंधरा वर्षे चांगला पर्याय नव्हता. आता मनसे पर्याय आहे. मी उभा आहे. माझा प्रत्येक उमेदवार हा राज ठाकरे आहे, असे समजून मतदान करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी या वेळी केले. पक्षाचा "वचकनामा' येत्या 27 तारखेला प्रसिद्ध करणार आहे. त्यात भरमसाठ आश्‍वासनांचा भरणा नसून काही दहाएक मुद्देच आहेत, याकडेही राज ठाकरे यानी लक्ष वेधले. सभेला खच्चून गर्दी होती. कान्होजी जेधे मैदान पूर्ण भरले होते.

राजचा बाळासाहेबांवर हल्ला!

राजचा बाळासाहेबांवर हल्ला!
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, October 26, 2010 AT 12:30 AM (IST)
 

डोंबिवली - 'सभेला येताना कपडे कोणते घालू, असा विचार करत होतो. कोणतेही कपडे घातले असते तरी म्हणाले असते, माझी कॉपी करतो,'' अशी तडाखेबंद सुरुवात करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रचारसभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच लक्ष्य केले. माझ्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत, असे वारंवार सांगतानाच 'मी कॉपी करतो म्हणणाऱ्यांनीच प्रबोधनकार, अत्रेंची कॉपी केली म्हणायचे का?'' असे विचारत त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रथमच तोंडसुख घेतले.

शिवसेनेत मला साधा शाखाप्रमुख नेमण्याचा अधिकार नव्हता, तेथे मी कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नेमणूक कशी करणार, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला. बाळासाहेबांनाच उद्धवला कार्याध्यक्ष करायचे होते, पण मी आड येत होतो. समजा, मी उद्धवची नियुक्ती केली असे मानले, तर मग माझा निर्णय योग्य की अयोग्य ते तरी सांगा? अयोग्य असेल, तर तो माणूस अजून त्या पदावर कसा? योग्य असेल तर मग माझे इतर सर्व निर्णय कसे काय चुकले? पक्ष तुमचा, मालक तुम्ही, मग तेथे मी निर्णय कसे घेणार, अशा प्रश्‍नांची सरबत्ती राज ठाकरे यांनी केली. केव्हा काय बोलतो ते बाळासाहेबांना आठवत नाही, अशी चौफेर टोलेबाजी करीत आपल्याच "विठ्ठला'चा आणि त्या भोवतीच्या बडव्यांचा त्यांनी यथेच्छ समाचार घेतला. शिवसेनेत आता फक्त खोबरे नसलेल्या करवंट्या आणि शेंदूर फासलेल्या वरवंट्या शिल्लक आहेत, असा घणाघाती हल्ला चढवित शिवसेना-भाजप युतीने सत्तेच्या काळात कल्याण-डोंबिवलीवर बलात्कार केल्याचा आरोपही त्यांनी केला. राज यांच्या सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता आणि त्यांच्या प्रत्येक टोलेबाजीला जोरदार प्रतिसाद देत त्यांना प्रतिसादही मिळत होता.

डोंबिवलीच्या कान्होजी जेधे मैदानात मनसेची सभा झाली. यावेळी पक्षाच्या उमेदवारांसोबत अभिनेते भरत जाधवही उपस्थित होते. राज हे शरद पवारांची टेस्ट ट्यूब बेबी असल्याची टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनाही त्यांनी लक्ष्य केले आणि मला मराठी माणसाने टेस्ट केले आहे. मी त्यांची बेबी आहे, असे प्रत्युत्तर दिले. ""शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांनी आजवर तोडपाणी केले. काहीही काम न करता तुम्ही त्यांना निवडून दिले, म्हणून ते शेफारले आहेत. पूर्वी तुमच्यासमोर शिवसेना-भाजप युती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसपलीकडे पर्याय नव्हता. आता मनसेचा पर्याय आहे. आम्हाला संधी द्या. या शहराचा कायापालट करू. मनसेचा प्रत्येक उमेदवार हा राज ठाकरे आहे, असे समजून मतदान करा,'' असे सांगत त्यांनी मनसेला मते देण्याचे आवाहन कल्याण-डोंबिवलीकरांना केले.