शुक्रवार, 11 मार्च 2016

रिक्षा परमिट आंदोलन स्थगित करा- राज ठाकरे

मुंबई- पुढील सूचना मिळेपर्यंत रिक्षा परमिट आंदोलन स्थगित करण्याबरोबरच कायदा हातात न घेण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी आज (शुक्रवार) कार्यकर्त्यांना केले.

मनसेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना परप्रांतीयांच्या नवीन रिक्षा जाळा असे ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती. या प्रकारानंतर ठाकरे यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

परिवहन विभागातर्फे देण्यात येत असलेले सत्तर हजार रिक्षा परवाने राहुल बजाज यांच्या रिक्षांच्या विक्रीसाठी व त्यांच्या लाभासाठी देण्यात येत आहेत. हे परवाने देताना मराठी तरुणांना डावलण्यात आले आहे. सत्तर टक्के परवाने परप्रांतीय तरुणांना देण्यात आले आहेत, मराठी तरुणांवर हा अन्याय झालेला आहे. त्यामुळे नवीन रिक्षा रस्त्यावर दिसल्यास जाळून टाका, असा खळबळजनक आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. नवीन रिक्षा जाळा, मात्र येथून घरी जाताना जुन्या रिक्षाचालकाने बिल मागितले तर रिक्षा जाळू नका, असा टोला त्यांनी शिवसेनेच्या वडापाव विक्रेत्याला केलेल्या मारहाणीबाबत लगावला. सत्तर हजार रिक्षा परवानाधारकांमध्ये सत्तर टक्के परप्रांतीय असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Slow Android? Click here 

राज ठाकरेंवर कारवाई होण्याची शक्यता

मुंबई : कायदा न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला. विधान भवन परिसरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज यांनी नवीन रिक्षा जाळून टाका, अशी चिथावणी दिली होती. बजाज कंपनीला फायदा होण्यासाठीच राज्य सरकारने 70 हजार परवाने खुले केले, असा आरोपही राज यांनी केला होता. त्यांचे हे वक्‍तव्य तपासून कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी दिला.
70 हजार परवाने असल्याचा जावईशोध राज ठाकरे यांनी लावला आहे. प्रत्यक्षात रद्द झालेले 41 हजार परवाने आहेत, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांना सांगितले. रिक्षा परवाना मिळवू इच्छिणाऱ्या व्यक्‍तीला मराठी भाषा बोलता आली पाहिजे, हा नियम जुनाच आहे. मी फक्‍त त्याची अंमलबजावणी करत आहे. मुलाखतीसाठी आलेल्या ज्या उमेदवारांना मराठी बोलता आले नाही, त्यांना परवाना दिलेला नाही, असे रावते यांनी स्पष्ट केले.
How to download youtube Video 

बुधवार, 9 मार्च 2016

पुणेकरांनी सत्ता दिल्यास वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य - राज ठाकरे

मुंबई - ‘पुण्यातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे पीएमपी सक्षम करायला हवीच; पण केवळ या एकाच मुद्‌द्‌यावर अवलंबून न राहता सायकल ट्रॅक, रस्ते, बीआरटी आदी घटकांचाही विचार करायला हवा. त्यासाठी पुणेकरांनी सत्ता दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतुकीला प्राधान्य देणारा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करेल,‘‘ असा निर्वाळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

मनसेच्या दशकपूर्तीनिमित्त  संवाद साधताना ठाकरे यांनी पुण्याच्या विकासाच्या त्यांच्या कल्पना, पक्षाचे पुण्यासाठीचे नियोजन, सद्यस्थिती यांचा आढावा घेतला; तसेच स्मार्ट सिटी, रिंग रोड, मेट्रो, जायकाचा प्रकल्प, महापालिकेतील कार्यपद्धती आदींबद्दलही त्यांनी चर्चा केली.
ठाकरे म्हणाले, ‘विरोधासाठी विरोध ही माझी भूमिका नाही; तर चुकीच्या गोष्टींना विरोध असेल. स्मार्ट सिटी करायला हवीच; पण महापालिकेसारखी यंत्रणा असताना, नव्या कंपनीची गरजच काय? त्या "एसपीव्ही‘बाबत काही आक्षेप आहेत. मनसेने ते सादर केले आहेत. महापालिकेच्या कारभारात राज्य सरकारने विनाकारण ढवळाढवळ करू नये, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.‘‘
‘जे शहराच्या उपयोगाला येणार, त्याला माझा विरोध कधीच राहणार नाही; पण छुपा अजेंडा असता कामा नये. तो असेल तर कडाडून विरोध करेन. रिंग रोड एवढ्यासाठी बांधायचा, कारण बाजूची जमीन मला विकत घ्यायची आहे. असे असेल तर माझा विरोध राहील. जमिनी दामदुपटीने विकायच्या. दुसऱ्या महायुद्धानंतर आयझोनोव्हर, अमेरिकेत ट्रुमन यांनी रस्ते सरळ केले. मंदीमुळे रस्त्यांची कामे काढली; पण त्यांच्या प्रॉपर्ट्या दिसत नाहीत. पीएमपीला 12 लाख प्रवासी असूनही तोटा कसा होतो, तेच कळत नाही. मुळात वाहतुकीच्या प्रश्‍नांसाठी राज्य सरकारने मदत करायला हवी. त्याचवेळी महापालिकेतील कारभार सुधारणे गरजेचे आहे. त्याच-त्याच ठेकेदारांना वर्षानुवर्षे कामे कशी दिली जातात?‘‘
‘पुण्यातील कचरा असो, आरोग्याचा प्रश्‍न. वाहतूक हीदेखील शहराची गंभीर समस्या झाली आहे. पुण्याची वाढ अक्राळविक्राळ होत आहे. त्यात सुविधांचे नियोजन नाही. त्यामुळे नागरिक भरडले जात आहेत. विकास आराखडाही या शहरातील राज्यकर्त्यांना करता आला नाही आणि नगरविकास योजनाही. पुणेकरांनी एकदा आम्हाला सत्ता द्यावी. पुण्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आम्ही तयार केलेल्या विकास आराखड्याची अंमलबजावणी करून दाखवू आणि त्यात वाहतुकीला प्राधान्य असेल,‘‘ असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.
‘पुणेकरांच्या पैशावर आयुक्तांचे सारखे परदेश दौरे कशाला? इंटरनेटवर सगळी माहिती उपलब्ध असताना कशाला जायचे? एक ई-मेल पाठविली तर सगळी माहिती मिळते. नाशिकमध्ये उद्योजकांच्या मदतीने आम्ही गोदा पार्कचे काम हाती घेतले आहे. रस्ते चांगले केले आहेत; पण विरोधक म्हणतात कुंभमेळ्यामुळे राज्य सरकारने केले; पण त्याची तयारी आम्ही दोन वर्षांपूर्वीच सुरू केली होती. ते लक्षात घ्यायला हवे, विनाकारण टीका होऊ नये,‘‘ अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.

‘पुणे शहर म्हणजे दुचाकी वाहनांचे "डंपिंग ग्राउंड‘ झाले आहे. दुचाकी वाहन उद्योजकांची लॉबी त्यामागे काम करीत आहे. त्यामुळेच पीएमपीला सक्षम केले जात नाही आणि वाहतुकीच्या समस्येकडे दुर्लक्ष होते, असेही ठाकरे यांनी नमूद केले. पुणे किंवा नाशिकमधील नगरसेवकांनी शहराचे मालक असल्याचा आविर्भाव आणू नये; तर विश्‍वस्तांच्या जबाबदारीने आपली भूमिका पार पाडावी. नागरिकांना सुविधा देण्याचे महापालिकेचे काम आहे. ते त्यांनी प्रामाणिकपणाने पार पाडले पाहिजे,‘‘ अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.

Surf internet without worry of clearing browser history
- राज ठाकरे म्हणाले
- आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग नव्हे; तर वॉर्ड पद्धतच हवी
- स्मार्ट सिटीला पाठिंबा; पण "एसपीव्ही‘बाबत काही आक्षेप
- विकासाच्या योजना राबविताना त्यात सुप्त हेतू असू नयेत
- 12 लाख प्रवासी असूनही पीएमपी तोट्यात कशी?
- इंटरनेटवर माहिती असताना आयुक्तांचे परदेश दौरे कशाला?
- पुण्यात डीपी (विकास आराखडा) नाही अन्‌ टीपीही (नगरविकास योजना)
- नगरसेवकांनी मालकाची नव्हे; तर विश्‍वस्तांची भूमिका बजवावी 

मंगलवार, 8 मार्च 2016

मोदींचे वलय आता किती राहिले? - राज ठाकरे

मोदींचे वलय आता किती राहिले? - राज ठाकरे



पुणे - ‘मेक इन इंडिया‘ भरवून देशात उद्योग येत नाहीत. कागदावर शब्दकोडी सोडवली जातात, उद्योग उभे राहत नाहीत. जनरल मोटर्स कंपनी गुजरातेतून महाराष्ट्रात येते, मग व्हायब्रंट गुजरात मोहिमेचा काय फायदा? "मेक इन इंडिया‘मध्ये कुठले आले दीड लाख कोटी? "शंभर दिवसांत अच्छे दिन आणीन‘ या नरेंद्र मोदींच्या घोषणेचे काय झाले? लोकांमध्ये फसवल्याची भावना आहे, मोदींचे दोन वर्षांपूर्वीचे वलय आता किती राहिलेय, असे सवालावर सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी "सकाळ‘ला दिलेल्या खास मुलाखतीत मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.

मनसेच्या स्थापनेला दहा वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल ठाकरे यांनी दिलेल्या या मुलाखतीत पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेत भावी वाटचालीबाबतची दिशा स्पष्ट केलीच, पण प्रश्‍नांना आपल्या नेहमीच्याच आत्मविश्‍वासाने, रोखठोक उत्तरे दिली. तसेच भावी राजकारणातही मराठी माणूस हाच प्रमुख मुद्दा राहणार असल्याचे स्पष्ट केले. मुंबईतील "कृष्णकुंज‘ या त्यांच्या निवासस्थानी सुमारे दीड तास रंगलेल्या या मुलाखतीचा हा सारांश. डिलीट केलेल्या फाइल्स परत मिळवा
प्रश्‍न - मोदींना सुरवातीला पाठिंबा आणि नंतर विरोध ही विसंगती नव्हती का?
ठाकरे - माझा विरोध भूमिकासापेक्ष असतो. गुजरातहून परतल्यावर मला प्रश्‍न पडला की मोदींनी मुखवटा उभा केला की काय? ते देश म्हणून विचार करत नाहीत. एक तर परदेशात जाणे नाही तर भाषणे ठोकणे. राज्याच्या निवडणुकांत एखाद्या पंतप्रधानाने 40 सभा घेतल्यात का कधी? बुलेट ट्रेन ही मुंबई ते अहमदाबाद करायची कल्पना त्यांना सुचली. कारण मनातून गुजराती आहे ना! तुम्ही गुजरातच्या बाहेर पडलेला नाही आहात ना? दोन वर्षांत चमत्काराची अपेक्षा नाही, पण होणाऱ्या गोष्टींची झुळूक तर का नाही? "मेक इन इंडिया‘ हे मुंबईत का, दिल्लीत का नाही? अशामुळे उद्योग येत नाहीत. गुजरातमध्ये व्हायब्रंट गुजरात मोहिमेनंतर किती उद्योग आले? तिथली जनरल मोटर्स कंपनी महाराष्ट्रात येते. मग तुम्ही व्हायब्रंट म्हणून उद्योग आणले का घालवले? केंद्राला कराचा एक पैसा न देता आमचे कर आम्ही वसूल करू, आणि विकास करू, अशी भूमिका मुख्यमंत्री असताना मोदींनी घेतली होती. आज तेच पंतप्रधान आहेत. मग आता भूमिकेत बदल का? देश दिलाय तुमच्याकडे. तो पाहा ना तुम्ही.
प्रश्‍न - पक्षाची दहा वर्षांची वाटचाल कशी झाली?
ठाकरे - पक्षस्थापना अवघड असली, तरी मला आत्मविश्‍वास होता. माझ्या विकास आराखड्यात माझ्या कल्पना आहेत. सत्तेमुळे करू शकता तो विकास आराखडा झाला, संघटनेद्वारे करू शकता अशी आंदोलने झाली. "ठाकरे आंदोलन घेतो आणि अर्धवट सोडतो‘, अशी हाकाटी केली. पण असे सोडलेले आंदोलन कुणीही दाखवावे. शहरातील पाट्या मराठीत आल्या. केंद्रीय आस्थापनेत मराठी मुले का भरत नाहीत, यावर आंदोलन केल्यावर केंद्रीय मंत्र्यांना सांगावे लागले, की परीक्षा त्या त्या मुलाच्या भाषेत होईल आणि नोकरीत त्या राज्यातल्या मुलांनाच प्राधान्य दिले जाईल. कमी खर्च आलेल्या रस्त्यांना टोलची गरज नाही आणि जिथे लावला पाहिजे तिथली रोखीची पद्धत बंद करा, असा आग्रह आम्ही धरला. त्यामुळे 67 ठिकाणचे टोल बंद झाले. मोबाईलवर मराठी आवाज ऐकू येऊ लागला. मल्टिप्लेक्‍समध्ये मराठी चित्रपट सुरू झाले. मराठी भाषा दिवस मनसेने मोठ्या प्रमाणावर साजरा करायला सुरवात केली. आमीर खानने मराठी शिकली, अमिताभने भाषणाची सुरवात मराठीतून केली, हे मोठे यश होते.
प्रश्‍न - आंदोलनाची पद्धत हिंसक, खळखट्ट्याक असल्याने या मुद्द्याला सहानुभूती असणारेही नाराज झाले. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन योग्य ठरले नसते का?
ठाकरे - अण्णा हजारेंच्या लोकपाल आंदोलनाचे काय झाले? शांततापूर्ण मार्गाच्या सगळ्या गोष्टी करून झाल्या होत्या, रेल्वे बोर्डापासून दिल्लीपर्यंत निवेदने दिली, यानंतरही पाच-पाच लाख परप्रांतीय मुलाखतीसाठी येत असतील, तर असे आंदोलन का करू नये? त्यांना काय आम्ही गुलाबाचे फूल द्यायला हवे होते? टॅक्‍सीचालक पोलिसांना मारू लागले, महिलांशी घाणेरडे वागायला लागले, अरेरावी करू लागले, तो लोकांच्या मनातला उद्रेक बाहेर पडला. हजारो अनधिकृत टॅक्‍सी-रिक्षा आम्ही पकडून दिल्या. त्या सरकारला तोडाव्या लागल्या. कायदा मोडणाऱ्यांसाठीचा कायदा आम्ही मोडला.


प्रश्‍न - शहरी तोंडावळ्याचे, एका विशिष्ट गटांचे प्रश्‍न आपण मांडले, राज्याच्या ग्रामीण भागापर्यंत भिडणाऱ्या मूलभूत समस्यांकडे आपले दुर्लक्ष झाले आहे का?
ठाकरे - फक्त 10 वर्षांत सगळेच माझ्याकडून कसे मागता? माझ्या हातात राज्य आल्याशिवाय या गोष्टी प्रत्यक्षात येणार नाहीत. दुष्काळासंदर्भात काय पावले उचलता येतील त्यावरही अनिल शिदोरे सध्या काम करीत आहेत.
ग्रामीण युवकांची स्वप्ने शहरात दडलेली आहेत. शहरीकरणाचे प्रमाण वाढत असून, ठाणे जिल्ह्यात सात महापालिका आहेत. शहराचा ताण वाढतो आहे. शहरे कोसळली तर सगळे कोसळून जाईल तुमचे. तुम्ही मूळच्या करदात्याला फसवता आहात. माणसे वाढताहेत म्हणून त्याला पाणी कमी दिले जाते आहे.

प्रश्‍न - शहरीकरणाची समस्या ही अतिकेंद्रीकरणाची असून, शहरीकरण तीन-चार शहरांतच एकवटले आहे. त्यावर मार्ग काय?
ठाकरे - महाराष्ट्रातील माणसाची सोय लावा प्रथम. गुजराती राहतात इथे आणि धंदा करतात गुजरातमध्ये. यांची ओझी आम्ही का वाहायची? शहरांचे विकेंद्रीकरण झाले तरी जिकडे गूळ दाखवाल तिकडे बाहेरचे डोंगळे येणारेत. जे कराल ते मराठी माणसाच्या हातात राहणार आहे का? विकेंद्रीकरण ही प्रक्रिया आहे. ती होतेच.

प्रश्‍न - मनसेला सुरवातीच्या काळात मिळणारा प्रतिसाद सातत्याच्या अभावाने कमी झाल्याचे निरीक्षण मांडले जाते. आपले मत काय?
ठाकरे - आपल्याकडे मतदानाचे आकडे, सभांची गर्दी यावर यशापयश मोजले जाते. 60 वर्षे राज्य केलेल्या पक्षाचे काय झालेय? माझी फक्त दहा वर्षे झालीत, प्रत्येक पक्षाला हे चढउतार येत असतातच.

Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही.

प्रश्‍न - नाशिक महापालिकेच्या सत्तेचा अनुभव काय?
ठाकरे - गोदापार्क, बोटॅनिकल गार्डनसारखे उपक्रम पाहा, रस्ते पाहा. कुंभमेळ्याच्या तरतुदीमुळे विकास झाला नाही तर तो आम्ही केला. कर्ज काढले आम्ही, तीन वर्षांपूर्वी निविदा काढल्या आम्ही. नुसत्याच टीकेला अर्थ नाही, शाबासकीची पाठही थोपटा.

प्रश्‍न - हिंदुत्वाचा मुद्दा तुम्ही घेणार, अशी चर्चा सुरू झाली होती.
ठाकरे - मला हिंदुत्वाबद्दल विचारले तेव्हा "मी हिंदू आहे‘, असे उत्तर दिले. पक्षाच्या झेंड्यातला भगवा हिंदूंचा, निळा दलितांचा आणि हिरवा मुस्लिमांचा. पण माझ्या मनातला मुसलमान अमजलअली खान, झाकीर हुसेन हे आहेत, भेंडीबाजार, बेहरामपाडा, भिवंडीतील मुस्लिम नाही. ओवेसींनी काढलेल्या मोर्च्यात महिला पोलिसांना मारहाण झाल्यानंतर त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरेच होता. तेव्हा का यांच्या शेपट्या आत होतात? धर्मांध समोर येतील तेव्हा त्यांच्यासमोर उभा राहणारा राज ठाकरेच असेल. वाटेल ते सहन करणार नाही.
Android फोन slow झालाय ? हे करा