गुरुवार, 9 सितंबर 2010

अक्कल शिकविण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा - राज

अक्कल शिकविण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा - राज
सकाळ वृत्तसेवा
Thursday, September 09, 2010 AT 12:30 AM (IST)
 
मुंबई - एक दिवस महाराष्ट्रात येऊन चार उड्या मारण्यापेक्षा, वर्षानुवर्षे ज्या उत्तर प्रदेशातील मतदारांच्या मेहेरबानीवर गांधी कुटुंब निवडून आले व त्यांनी देशाचे पंतप्रधानपद उपभोगले, त्याच उत्तर प्रदेशाचा विकास इतकी वर्षे का झाला नाही, याचे प्रथम स्वतः आत्मपरीक्षण करा व नंतरच दुसऱ्याला अक्कल शिकवा, असा मुँहतोड जबाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांना दिला.

महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी काल (ता. 7) राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांचा आवाज फक्त मुंबईत असल्याचा टोला राहुल यांनी लावला होता. राज यांनी खास "सकाळ'शी बोलताना राहुल यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, की हेलिकॉप्टरने हवेत फिरण्यापेक्षा जमिनीवर फिरा व मगच बोला. कॉंग्रेस सरकारच्या कारकिर्दीत लोकांना चपला बाहेर काढून ठेवाव्या लागतात. कारण, या दळभद्री कॉंग्रेसच्या नाकर्तेपणावर लोक चपला फेकून मारतील, त्याला हे घाबरतात.''

ते म्हणाले, ""राहुल गांधी यांचे पणजोबा पंडित जवाहरलाल नेहरू हे उत्तर प्रदेशातून निवडून आले. ते सुमारे 16 ते 17 वर्षे देशाचे पंतप्रधान होते. त्यानंतर त्यांची आजी इंदिरा गांधी या निवडून आल्या, त्यासुद्धा उत्तर प्रदेशातून. त्याही सुमारे 15 वर्षे पंतप्रधानपदी होत्या. त्यांच्यानंतर पंतप्रधानपदी बसलेले त्यांचे वडील राजीव गांधी हेसुद्धा उत्तर प्रदेशातून निवडून आले. त्यांची आई सोनिया गांधी यासुद्धा उत्तर प्रदेशातील मतदारसंघातून निवडून आल्या व हेसुद्धा उत्तर प्रदेशाच्या मतदारांच्या मेहेरबानीमुळे निवडून आले. जर हे सर्व गांधी कुटुंबीय उत्तर प्रदेशातून निवडून आले, तर इतकी वर्षे उत्तर प्रदेशाचा विकास का झाला नाही? तेथून सुमारे 20 ते 25 लाख लोक नोकरी-धंद्यासाठी महाराष्ट्रात का येतात, याचा आधी विचार करा व मगच विकासाच्या गप्पा मारा. तेथील लोकांचा भार आमच्या महाराष्ट्रावर टाकायचा व येथे येऊन अक्कल शिकविण्याची गरज नाही

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें