रविवार, 1 अगस्त 2010

लोंढ्यामुळेच मुंबईत मलेरियाची साथ

लोंढ्यामुळेच मुंबईत मलेरियाची साथ
सकाळ वृत्तसेवा
Monday, August 02, 2010 AT 12:30 AM (IST)
  i

राज ठाकरेंची टीका; "मनविसे'चा चौथा वर्धापनदिन उत्साहात
मुंबई  - मुंबईत मोठ्या प्रमाणात लोढ्यांचे आक्रमण होत आहे. या लोढ्यांच्या गलिच्छ वस्त्यांमुळेच मलेरियासारखे आजार झपाट्याने पसरत चालले आहेत. मुंबईतील हॉस्पिटल्सही या लोंढ्यांनी भरली आहेत. येथील मराठी माणसांना उपचाराकरिता आता जागा नाही. या लोंढ्यामुळेच मुंबईचा सत्यानाश होताय अशी सडेतोड टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. मुंबईत यापूर्वीही साथीचे रोग आले होते, पण आताची परिस्थिती वेगळी आहे. बाहेरचे लोंढे मुंबईत खुशाल येतात. येथेच अनधिकृत झोपड्या बांधतात व अस्वच्छता करतात, त्यांच्या या गलिच्छपणामुळेच मुंबईत आजार पसरत आहेत. या प्रकरणी महापालिका सरकारवर जबाबदारी ढकलते तर, सरकार पालिकेवर ढकलाढकली करत आहे, अशी टीकेची झोडही ठाकरे यांनी उठविली.

शिक्षणक्षेत्रातही परप्रांतियांनी ऍडमिशनसाठी गर्दी केली आहे; असे सांगतानाच ते म्हणाले, की महाराष्ट्रात अल्पसंख्याकांसाठी कॉलेज उघडली जात आहेत. मराठी मुलाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवे असेल तर पैसे मागितले जातात व पैसे नसतील तर, मराठी मुलाला येथे ऍडमिशन मिळत नाही.

तमिळनाडूत नुकतेच तमिळ भाषिकांचे भव्य संमेलन झाल्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले, की या संमेलनात विद्यार्थ्यांचे इंजिनीअरिंगपर्यंतचे शिक्षण तमिळ भाषेतून करण्याचा निर्णय झाला. पण महाराष्ट्रात दहावीपर्यंत संपूर्ण मराठी करण्यासाठी येथील राज्यकर्त्यांसमोर धडपड करावी लागते. सरकारच्या या बोटचेप्या धोरणामुळेच शिक्षणाची वाट लागली आहे.

हॉटेल चायनीज पण, भाषा स्वीस
युरोपियन संमेलनाच्या निमित्ताने आपण नुकतेच स्वित्झर्लंड येथे गेलो होतो. तेथील लोक भाषेसाठी किती कडवट असतात याचा किस्सा सांगताना ते म्हणाले, ""आम्ही हॉटेल शोधत होतो, तेवढ्यात एक चायनीज रेस्टॉरन्ट मिळाले. तेथे गेलो व मेन्यू कार्ड मागविले तर, त्यातील भाषा ना इंग्रजीतून होती ना अन्य दुसऱ्या भाषेतून. त्यामध्ये स्वीस भाषा होती. म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये चायनीज हॉटेल असले तरी, तेथील भाषा मात्र त्यांचीच स्वीस भाषा. याला म्हणतात भाषेचा अभिमान. पण आपण मात्र भाषेचा अभिमान धरत नाही.''

याप्रसंगी "शिक्षण 2020' या विषयावर मान्यवरांचा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्राचार्या मीनाक्षी वाळके, प्राध्यापक विजय तापस, पराग माहुलीकर, प्राचार्य अजित नाईक, "सकाळ मुंबई'चे कार्यकारी संपादक पद्मभूषण देशपांडे, राजेश देव आदींनी आपली भूमिका मांडली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें