मंगलवार, 29 नवंबर 2011

टीकाटिप्पणीला महत्त्व देत नाही - राज ठाकरे

टीकाटिप्पणीला महत्त्व देत नाही - राज ठाकरे
-
Wednesday, November 30, 2011 AT 01:00 AM (IST)


मुंबई - आंदोलनाच्या काळात दगड घेणारा कार्यकर्ता तुमच्यातील पाहिजे आणि महापालिकेच्या महासभेत अभ्यासून बोलणारा नगरसेवकही तुमच्यामधीलच हवा, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या मनसेच्या उमेदवारांना केले. तसेच 4 डिसेंबरच्या लेखी परीक्षेनंतर बाहेरच्या साऱ्यांना मनसेच्या तिकिटाची दारे बंद होणार असल्याचे त्यांनी ठणकावले.

षण्मुखानंद सभागृहात आज इच्छुकांसह राज यांनी दुपारी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या वेळी लेखी परीक्षेची भीती मनात न बाळण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. विरोधकांनी केलेल्या टीकाटिप्पणीला आपण महत्त्व देत नाही. मात्र, जो कार्यकर्ता आंदोलनाच्या काळात दगड हातात घेतो, त्यांच्यामधीलच एक जण महासभेत अभ्यासपूर्ण बोलताना मला पाहायचे असल्याचे त्यांनी सांगितले. मी मुलाखत घेतल्यावर उमेदवार एकच असेल याची तुम्हाला कल्पना आहे ना, अशी विचारणा केल्यावर उपस्थितांनी होकार दिला. तसेच परीक्षेचे ओझे मनावर न घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. केवळ ऑप्शन असलेले प्रश्‍न असल्याने लिखाणाचे काम नसल्याचा दिलासा त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यकर्त्यांना दिला

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें