बुधवार, 1 अक्टूबर 2014

रस्ते, पाणी, वीज हे विकासाचे त्रिशूळ : राज ठाकरे

वणी (जि. यवतमाळ) : "रस्ते, पाणी आणि वीज हे विकासाचे त्रिशूळ आहे. ही कामे केली तर विकास होतो. पण आजवर सत्तेत असलेल्यांना तेच जमले नाही. याकरिता आम्ही उमेदवार उभे केले आहेत. आम्हाला काही करण्याची संधी द्या,‘‘ असे आवाहन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले.

मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचारासाठी राज ठाकरे आज वणीत आले होते. यावेळी शासकीय मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. 
ब्ल्यूप्रिंटविषयी माहिती देताना म्हणाले राज ठाकरे, "गेल्या 60 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात रोजीरोटी व पाणी या मुख्य समस्या सुटल्या नाहीत. म्हणून माझ्यासारख्या चित्रकाराला राजकारणात उतरावे लागले. माणसाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी माझा लढा आहे. आम्ही सत्तेत आलो; तर सर्वसाधारण माणसाच्या समस्या सोडविण्याकरिता कार्य करू.‘‘
ते म्हणाले, "सणावाराच्या काळात आमच्या परंपरांचा विचार न करता आमच्यावर निवडणूक लादली गेली. आम्ही किंवा कोणताही राजकीय पक्ष यावर काही बोलत नाही. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, पाणीप्रश्‍न, बेरोजगारी आदी विषयांवर कोणताच राजकीय पक्ष बोलला नाही. केवळ युती व आघाडी टिकेल की नाही, याचीच चर्चा करीत होते. तुमच्या समस्यांशी यांना काही घेणे देणे नाही. यांनी दिलेले आमदार-खासदार आपल्या क्षेत्रात न राहता मुंबई-दिल्लीत राहतात. यांनाही नागरिकांच्या समस्यांशी काहीच आपुलकी नाही.‘‘

मंगलवार, 30 सितंबर 2014

विदर्भातील नेत्यांनीच विदर्भाकडे दुर्लक्ष केले-राज

अमरावती- विदर्भातील नेत्यानींच विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे. स्थानिक जमिनींचा वाळवंट केला आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) केला.

अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे मनसेची दुसरी प्रचारसभा झाली. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, ‘विदर्भाचा विकास न करण्यामागे येथील नेतेच जबाबदार आहेत. विदर्भात पर्यटनाला चांगला वाव आहे, मात्र दुर्दैवाने राज्यात पर्यटन खाते म्हणजे सर्वांत खालचे खाते समजले जाते. राजकीय नेत्यांनी कसदार जमिनींचे अक्षरशः वाळवंट केले आहे. महाराष्ट्रातील युवकांना मी रोजगार मिळवून देणार आहे. परप्रांतातील युवक महाराष्ट्रात येऊन पैसे मिळवताना दिसतात. पण, स्थानिक युवकांना रोजगार मिळत नाही. सरकार दुसऱ्याच्या मुलाला जवळ करत असून, आपल्या मुलाला मारतो आहे. पोलिस भरतीवेळी युवकांना जीव गमवावा लागला आहे, सरकारला याचे काहीही वाटत नाही. माझ्या हातात सरकार द्या सगळी परिस्थिती बदलून दाखवतो.‘

‘महाराष्ट्रामध्ये फक्त इच्छाशक्तीची कमतरता आहे. जनतेने सर्व राजकीय पक्षांना गाडून मनसेला संधी द्यावी. महाराष्ट्रातील शेतकरी पाण्याविना मरताना दिसत आहे. पण, राज्याचे उपमुख्यमंत्री बेजबाबदार विधान करत आहेत. गेल्या साठ वर्षात महिलांना शौचालय बांधून देऊ शकलो नाही हे मोठे दुर्दैवच आहे. मुख्यमंत्री कामच करत नाही, म्हणूनच त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे,‘ असेही ठाकरे म्हणाले.

गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली. तामिळनाडूमधील नेते जयललिता यांच्या समर्थनार्थ येतात, पण आपल्याकडे तसे चित्र दिसत नसल्याचेही ते म्हणाले.

सोमवार, 29 सितंबर 2014

भाजप बेभरवशाचा, तर शिवसेनेचा भंपकपणा -राज


मुंबई - भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवताच येणार नाही, त्यांचा काय भरवसा, असा सवाल करून दुसरीकडे शिवसेनेचा केवळ भंपकपणा सुरू असल्याची कडवट टीका राज ठाकरे यांनी केली. कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेज येथे आयोजित केलेल्या मनसेच्या प्रचारसभेत राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांवर टीकास्त्र सोडले.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू झाल्याने मनसेच्या प्रचाराचा शुभारंभ राज यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार प्रवीण दरेकर, बाळा नांदगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी संपुष्टात आलेल्या शिवसेना- भाजप युती आणि कॉंग्रेस आघाडीच्या घडामोडींवर राज ठाकरे यांनी मार्मिक टिप्पणी केली. भाजप नेते अतुल भातखळकर आणि नगरचे माजी आमदार सदाशिव लोखंडे मनसेत प्रवेश करण्यासाठी आले असता त्यांना प्रवेश न देता ही बाब नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणल्याचा गौप्यस्फोट राज यांनी केला. मी तुमच्याशी प्रामाणिकपणा दाखवला, तुम्ही मात्र माझा आमदार पळवता, असा सवाल करून भाजप नेत्यांवर विश्वासघातकी असल्याची टीका त्यांनी केली. युती- आघाडी तुटल्याच्या दिवशी भाजप नेत्यांना शरद पवार यांचा फोन गेला होता. तुम्ही युती तोडा, मी अर्ध्या तासात आघाडी मोडतो, असे पवार म्हणाल्याची माहिती असताना शिवसेना नेते भाजपशी चर्चा का करत होते, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते, तर महिन्याभरापूर्वीच युतीला लाथ मारली असती. युती तोडता आणि केंद्रातील मंत्रिपद आणि मुंबई महापालिकेतील युती ठेवता, हा कसला भंपकपणा आणि ढोंगीपणा, असा सवाल करून राज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. ""भाजप हा पक्ष वाळवीसारखा कोपऱ्याकोपऱ्याने पोखरत असताना उद्धवना हे कळले कसे नाही, मी तिथे असतो तर भाजपवाल्यांना लाथ मारून हाकलले असते,‘‘ असा टोलाही त्यांनी लगावला.

सत्तेवर आल्यास ब्लू प्रिंटमधील विकास करून दाखवणार, हे माझे वचन असल्याचे राज म्हणाले. सत्तेवर आल्याचा पहिला दिवस म्हणजे झोपडपट्ट्यांचा शेवटचा दिवस असेल, असे सांगून राज यांनी परप्रांतीयांनाही इशारा दिला. मुंबईसारख्या शहरात झोपडपट्ट्या वाढण्यास परप्रांतीय लोंढे आणि बिल्डर लॉबी जबाबदार असून, त्यांचा योग्य बंदोबस्त केला जाईल, सत्तेवर आल्यास बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रत्येकावर माझी करडी नजर असेल, असा इशाराही त्यांनी दिला.

तर राज्य 15 वर्षे मागे जाईल

राज्यात सुरू असलेल्या नेत्यांच्या पक्षांतरावर राज ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, ""निवडणुका झाल्यावर विधानसभेत कुणालाच बहुमत न मिळाल्यास राज्य 15 वर्षे मागे जाईल, त्यामुळे या पक्षांना पर्याय म्हणून मी आणि मनसे तुमच्यासमोर ठामपणे उभा आहे. मला एक संधी देऊन बघा.‘‘

शुक्रवार, 26 सितंबर 2014

बाळा नांदगावकरांविनाच मनसेची दुसरी यादी जाहीर

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 71 उमेदवारांची दुसरी यादी शुक्रवारी जाहीर केली. विद्यमान आमदार व पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांचे नाव या यादीत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली असली तरी ते शनिवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज दाखल करतील, असे सांगण्यात आले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 25) पक्षाच्या "ब्ल्यू प्रिंट‘चे सादरीकरण केले. या वेळी मनसेच्या 153 उमेदवारांची यादी जाहीर झाली होती. आणखी 71 उमेदवारांची यादी जाहीर केल्याने विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात मनसेचे 224 उमेदवार असतील. दुसऱ्या यादीतही नांदगावकर यांचे नाव नाही. त्यांनी आपण निवडणूक लढवण्याऐवजी पक्षाच्या उमेदवारांचा राज्यभर प्रचार करणार असल्याचे जाहीर केले होते; मात्र यावर राज यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत यावर निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

उमेदवारांची यादी
अक्‍कलकुवा- ममता रवींद्र वळवी, शहादा- किसन पवार, साक्री- दीपक भारूडे, धुळे शहर- ऍड्‌. नितीन चौधरी, चोपडा- इक्‍बाल तडवी, जळगाव ग्रामीण- मुकुंद रोटे, जामनेर- विलास राजपूत, मुक्‍ताईनगर- राजेंद्र सांगळकर, बाळापूर- प्रशांत लोथे, अकोला पूर्व- विनोद प्रल्हाद राऊत, वाशिम- ज्ञानेश्‍वर नामदेव जाधव, अमरावती- अविनाश श्रीकृष्ण चौधरी, अचलपूर- प्रफुल्ल शिवराम पाटील, मोर्शी- संजीव देशमुख, सावनेर- प्रमोद ढोले, उमरेड- राजेश कांबळे, नागपूर पूर्व- कपिल आवारी, नागपूर उत्तर- रितेश मेश्राम, कामठी- विठ्ठल बावनकुळे, रामटेक- योगेश वाडीभस्मे, अर्जुनी मोरगाव- महिंद्र चंद्रिकापुरे, अहेरी- दिनेश मढावी, ब्रह्मपुरी- विश्‍वास देशमुख, यवतमाळ- भानुदास बापू राजने, हदगाव- सुरेश सारडा, नायगाव- रवींद्र भिलवंडे, मुखेड- ऍड्‌. यशवंत सुभेदार, परभणी- विनोद दुधगावकर, औरंगाबाद पश्‍चिम- गौतम अमराव, नांदगाव- जयवंत सानप, चांदवड- नवलकिशोर शिंदे, येवला- कल्याणराव पाटील, निफाड- सुभाष होळकर, दिंडोरी- सुधाकर राऊत, नाशिक पूर्व- रमेश शंकर धोंगडे, देवळाली- प्रताप महरोलीया, बोईसर- वसंत रावते, उल्हासनगर- सचिन कदम, कल्याण ग्रामीण- रमेश पाटील, कोपरी पाचपाखाडी- शेजल कदम, ठाणे- नीलेश चव्हाण, मुंब्रा कळवा- महेश मोतीराम साळवी, ऐरोली- गजानन खबाले, दहिसर- राजेश येरूणकर, मालाड- दीपक पवार, गोरेगाव- शरद सावंत, वर्सोवा- मनीष धुरी, शिवाजीनगर मानखुर्द- सोहेल अश्रफ, अणुशक्ती नगर- वीणा उकरंडे, वांद्रे पश्‍चिम- तुषार आफळे, धारावी- गणेश खाडे, कुलाबा- अरविंद गावडे, मावळ- मंगेश वाळुंज, भोसरी- सचिन चिखले, शिवाजी नगर- राजू पवार, कर्जत जामखेड- सचिन पोटरे, परळी- संजय आगाव, लातूर शहर- गणेश गवारे, माढा- दिनेश गिट्टे, सोलापूर शहर मध्य- सत्तार उस्मान सय्यद, सोलापूर दक्षिण- युवराज सुधाकर चुंभळकर, पंढरपूर- जयवंत मोहनराव माने, वाई- मयूर नळ, सातारा- राहुल पवार, चिपळूण- संतोष नलावडे, राधानगरी- डॉ. युवराज पांडुरंग पाटील, कागल- अजित सदाशिव मोडेकर, कोल्हापूर उत्तर- सुरेश साळोखे, शाहूवाडी- संजय श्‍यामराव पाटील, मिरज- नितीन सोनावणे, इस्लामपूर- उदय पाटील

गुरुवार, 25 सितंबर 2014

मनसेची 153 उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आता अगदी दृष्टिपथात आली असतानाही राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष (भाजप) व शिवसेना या चार प्रमुख पक्षांमधील जागावाटपाचे गुऱ्हाळ अद्यापी संपलेले नाही. मात्र राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज (गुरुवार) विधानसभेसाठी आपल्या 153 उमेदवारांची यादी जाहीर करीत यासंदर्भात आघाडी घेतली.

मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज संध्याकाळी त्यांच्या बहुचर्चित विकासाच्या ब्ल्यू प्रिंटसंदर्भात बोलण्याचे अनुमान आहे. ब्ल्यू प्रिंटसंदर्भातील भाषणानंतर मनसे उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, अशी अटकळ बांधण्यात आली होती. मात्र त्याआधीच मनसेच्या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांची प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोकण, मुंबई, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र अशा राज्यातील सर्व भागांमधील मतदारसंघांसाठी ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मनसेच्या या पहिल्या पावलानंतर आता इतर पक्षांच्याही निर्णयप्रक्रियेस वेग येईल, अशी शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे.
मनसेची उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे - 

उत्तर महाराष्ट्र
नंदुरबार
नंदुरबार -गुलाबसिंग वसावे
नवापूर - महादेव वसावे
 
धुळे
धुळे ग्रामिण- अजय माळी
 
जळगाव
रावेर - जुगल पाटील
भुसावळ - रामदास सावकारे
जळगाव शहर - ललित कोल्हे
एरंडोल - नरेंद्र पाटील
चाळीसगाव - राकेश जाधव
पाचोरा - दिलीप पाटील
 
विदर्भ
 
बुलडाणा
बुलडाणा- संजय गायकवाड
चिखली - विनोद खरपास
सिंदखेड राजा - विनोद वाघ
जळगाव जामोद - गजानन वाघ
 
अकोला
रिसोड - राजू राजेपाटील
अकोट - प्रदीप गावंडे
अकोला पश्चिम - पंकज साबळे
मुर्तिजापूर - रामा उंबरकर

 
अमरावती
धामणगाव- ज्ञानेश्वर धानेपाटील
तिवसा - आकाश वराडे 
दर्यापूर - गोपाल चंदन
अचलपूर - प्रवीण तायडे
 
 
वर्धा
हिंगणघाट- अतुल वंदिले
वर्धा - अजय हेडाऊ
 
नागपूर
काटोल- दिलिप गायकवाड
हिंगणा -किशोर सराईकर
नागपूर मध्य - श्रावण खापेकर
नागपूर पश्चिम -प्रशांत पवार
 
भंडारा
तुमसर - विजय शहारे
भंडारा- मनोहर खरोले
 
गोंदिया
तिरोरा - दिलिप जयस्वाल
 
गडचिरोली
गडचिरोली -मिनाताई कोडाप
राजुरा - सुधाकर राठोड
 
जालना
परतूर - बाबासाहेब आकात
घनसावंगी - सुनील आर्दंड
जालना - रवी राऊत
बदनापूर - ज्ञानेश्वर गायकवाड
भोकरदन -दिलिप वाघ
 
औरंगाबाद
सिल्लोड - दिपाली काळे
कन्नड - सुभाष पाटील
फुलंब्री - भास्कर गाडेकर
औरंगाबाद मध्य - राज वानखेडे
औरंगाबाद पूर्व - सुमीत खांबेकर
पैठण - सुनील शिंदे
वैजापूर - कल्याण पाटील
 
नाशिक
मालेगाव बाह्य - संदीप पाटील
नाशिक मध्य - वसंत गिते
नाशिक पश्चिम - नितीन भोसले
 
 
ठाणे
डहाणू - विजय वडिया
विक्रमगड - भरत हजारे
नालासोपारा - विजय मांडवकर
भिवंडी ग्रामीण - दशरथ पाटील
शहापूर - ज्ञानेश्वर तळपदे
कल्याण प. - प्रकाश भोईर
अंबरनाथ - विकास कांबळी
कल्याण पूर्व - नितीन निकम
ओवळा माजीवडा - सुधाकर चव्हाण
बेलापूर - गजानन काळे

 
मुंबई
 
बोरिवली - नयन कदम
मागाठणे - प्रविण दरेकर
मुलुंड - सत्यवान दळवी
विक्रोळी - मंगेश सांगळे
भांडूप पश्चिम - शिशिर शिंदे
जोगेश्वरी पू- भालंचद्र अंबुरे
दिंडोशी - शालिनी ठाकरे

कांदिवली पू- अखिलेश चौबे
चारकोप - दीपक देसाई
अंधेरी पश्चिम - रईस लष्करीया
अंधेरी पू- संदीप दळवी
विलेपार्ले - सुहास शिंदे
चांदिवली - ईश्वर तायडे
घाटकोपर प.- दिलिप लांडे
घाटकोपर पूर्व-सतिश नारकर
कुर्ला - स्नेहल  जाधव
कलिना- चंद्रकांत मोरे
वांद्रे पू- शिल्पा सरपोतदार
शीव- कोळीवाडा - बाबा कदम
वडाळा - आनंद प्रभू
माहिम - नितीन सरदेसाई
वरळी - विजय कुरतडकर
भायखळा - संजय नाईक
मलबार हिल - अॅड. राजेंद्र शिरोडकर
मुंबादेवी - इम्तियाज अमीन

 
कोकण
रत्नागिरी
दापोली - वैभव खेडेकर
 
सिंधुदुर्ग
सावंतवाडी - परशुराम उपरकर
 
रायगड
पनवेल - केसरी पाटील
कर्जत - जे पी पाटील
उरण - अतुल भगत
पेण - गोवर्धन पोलसानी
महाड - सुरेंद्र चव्हाण
 
प. महाराष्ट्र
पुणे
जुन्नर - शरद सोनावणे
खेड-आळंदी - समीर ठिगळे
शिरुर - संदीप भोंडवे
दौंड - राजाभाऊ तांबे
पुरंदर - बाबा जाधवराव
भोर - संतोष दसवडकर
चिंचवड - अनंत कोराळे
कोथरुड - किशोर शिंदे
खडकवासला - राजाभाऊ लायगुडे
 
कोल्हापूर
चंदगड - दिवाकर पाटील
करवीर - अमित पाटील
शिरोळ - विजय भोजे
 
सांगली
सांगली - स्वाती शिंदे
खानापूर - भक्तराज ठिगळे
तासगाव - सुधाकर खाडे
जत - भाऊसाहेब कोळेकर
 
सोलापूर
सोलापूर शहर (उ) - अनिल व्यास
अक्कलकोट - फारुख शाब्दी
माळशिरस - किरण साठे
करमाळा - जालिंदर जाधव
मोहोळ - दिपक गवळी
 
सातारा
कोरेगाव - युवराज पवार
माण - धैर्यशील पाटील
कराड (उ) - राजेंद्र केंजळ
कराड (द) - अॅड. विकास पवार
पाटण (द) -रविंद्र शेलार
 
मराठवाडा
लातूर
निलंगा  - अभय साळुंखे
औसा - बालाजी गिरे
 
उस्मानाबाद
उमरगा - विजय क्षीरसागर
तुळजापूर - अमर कदम
उस्मानाबाद - संजय यादव
परांडा - गणेश शेंडगे
 
नांदेड
किनवट - धनपाल पवार
भोकर - माधव जाधव
नांदेड (उ) - दिलीप ठाकूर
नांदेड (द) - प्रकाश मारावार
लोहा - रोहिदास चव्हाण
देगलूर - पार्वतीबाई सुर्यवंशी
 
हिंगोली
कळमनुरी - सुनील अडकिने
हिंगोली - ओमप्रकाश कोटकर
 
परभणी
जिंतूर - खंडेराव आघाव
गंगाखेड - बालाजी देसाई
पाथरी - हरिभाऊ लहाने

घटस्थापनेच्या दिवशी घटस्फोट झाले तरी आजचा माझा विषय हा राजकारणाचा नाही, विकासाचा आहे, राज ठाकरे यांचा युतीला टोला

सगळेच पक्ष सध्या आपापला विचार करताहेत, आपण तरी महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करूया: राज ठाकरे
अनेकजण माझ्या ब्ल्यू प्रिंटची थट्टा करीत होते. त्यांना महाराष्ट्राविषयी देणं घेणंही नाही
ब्ल्यू प्रिंटविषयी अनेकजण विचारत होते की, कधी येणार कधी येणार.. वेळ बघावी लागते की नाही
वीज-पाणी-रस्त्याकडे यापलिकडे आपण कधी जाणार आहोत की नाही  


शनिवार, 6 सितंबर 2014

मनसेची ब्ल्यू प्रिंट 25 तारखेला : राज

मुंबई - राज्याच्या सर्वांगीण विकासाचे चित्र असा प्रचार केला जात असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची "ब्ल्यू प्रिंट‘ येत्या 25 तारखेला जाहीर होणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.

राज्याच्या विकासाचा अंतर्भाव असलेली ब्ल्यू प्रिंट जाहीर होणार म्हणून अनेक तारखा आणि मुहूर्त सांगितले जात होते. वारंवार या तारखा आणि मुहूर्त पुढे गेले आहेत. त्यामुळे मनसेची ब्ल्यू प्रिंट नेमकी केव्हा जाहीर होणार याबद्दल चर्चा केली जात होती. खुद्द राज ठाकरे यांनीच या चर्चेला विराम दिला असून, 25 सप्टेंबरला मनसेची ब्ल्यू प्रिंट जाहीर होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला मोठे उद्योगपती येणार नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. ही प्रिंट वेबसाइट तयार करून त्यावर टाकली जाणार आहे.