गुरुवार, 12 अप्रैल 2012

नितीशकुमार यांनी बिहार दिन साजरा करून दाखवावाच ! राज ठाकरे यांचे आवाहन

नितीशकुमार यांनी बिहार दिन साजरा करून दाखवावाच ! राज ठाकरे यांचे आवाहन


मालेगाव,  वार्ताहर
altसर्वकाही सुरळीत असताना उगाचच आम्हांला डिवचणाऱ्या नितीशकुमारांनी मुंबईत बिहार दिन साजरा करून दाखवावाच, असे आव्हान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे दिले. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने येथे आयोजित प्रचंड जाहीर सभेत राज यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या मुद्याला हात घालतानाच मिळकत जमा करण्यामागे लागलेल्या राज्यातील नेत्यांनाही टिकेचे लक्ष केले. मालेगाव शहराचा विकास असा झालाच नाही, हे स्पष्ट करताना मालेगावसारखी शहरे पाडून पुन्हा बांधावयास हवीत, या शब्दांत राज यांनी मालेगावच्या अधोगतीचे वर्णन केले.
मुंबईत १५ एप्रिल रोजी ‘बिहार दिन’ साजरा करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार येणार आहेत. मुंबईत येण्यासाठी आम्हांला कुणाचा व्हिसा घेण्याची गरज नाही, या नितीशकुमार यांच्या विधानाच्या पाश्र्वभूमीवर राज त्यांना कसे प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. मालेगावच्या जाहीर सभेत नितीशकुमार यांच्या या विधानाचा आपल्या खास ठाकरी शैलीत समाचार घेताना राज यांनी नितीशकुमार यांनी मुंबईत बिहार दिन साजरा करून दाखवावाच, असे आव्हान दिले. सर्वकाही सुरळीत सुरू असताना, आम्ही काहीही वक्तव्य केलेले नसताना नितीशकुमार यांनी आम्हांला डिवचण्याचा प्रयत्न केला. ते जर असे वागत असतील तर यापुढे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक परप्रांतीयांना मराठी माणसाकडून व्हिसा घ्यावाच लागेल. आपण आपल्या म्हणण्यावर ठाम असून शासन जर याप्रकरणी आपणांस अटक करणार असेल तर त्यांनी करून दाखवावी. एकदा त्यांनी असा प्रयत्न करून पाहिल्यावर त्याचे काय परिणाम होतात, त्याचा अनुभवही त्यांनी घेतला, असे एकप्रकारे राज्यातील सत्ताधाऱ्यांनाही राज यांनी आव्हान दिले.
मालेगावच्या अधोगतीला परप्रांतीयच जबाबदार आहेत. मालेगावच्या समस्या कोणी जाणण्याचा प्रयत्नच केलेला नाही. आम्ही तुम्हांला कोणतेही आश्वासन देणार नाही. जे शक्य आहे, ते आम्ही करूच. परंतु आमचे लक्ष आहे पुढील विधानसभा निवडणुकीकडे. या निवडणुकीत मनसेच्या हातात सत्ता देवून बघा, मग महाराष्ट्राचा विकास कसा करून दाखवितो ते बघा, असे आवाहनही राज यांनी केले. महाराष्ट्रातील नेते जमीन, फ्लॅटस् घेण्यामागे लागले आहेत. आपल्या पाच-सहा पिढय़ांचे कल्याण त्यांना साधावयाचे आहे. सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी त्यांना काहीही करावयाचे नाही, असा टोलाही त्यांनी हाणला

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें