बुधवार, 10 नवंबर 2010

चौहान नव्हे; चव्हाण म्हणून वावरा!
सकाळ वृत्तसेवा
Thursday, November 11, 2010 AT 12:35 AM (IST)
 

मुंबई - पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ चारित्र्याचे मानले जातात. त्यांनी आपली हीच प्रतिमा जपावी, कोणत्याही जमीन वा भूखंडाच्या प्रकरणात अडकू नये. महाराष्ट्रातील विकासाच्या प्रश्‍नांना प्राधान्य देऊन महाराष्ट्राच्या समस्या सोडवाव्यात, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नव्या मुख्यमंत्र्यांना दिला. नव्या मुख्यमंत्र्यांनी मराठीतून शपथ घ्यावी, अशी मागणीही राज यांनी या वेळी केली.

पृथ्वीराज चव्हाण यांना शुभेच्छा देऊन ते म्हणाले, की आतापर्यंत ते सर्वांत जास्त काळ दिल्लीतच वावरले आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात आल्यानंतर "चौहान' म्हणून नव्हे; तर "चव्हाण' म्हणून वावरावे. दिल्लीहून मुंबईकडे येताना पृथ्वीराज चव्हाण यांनी "मैं बम्बई जा रहा हूं' असा उल्लेख वारंवार केला. तेव्हा मुंबईत आल्यानंतर आपण त्यांना 108 मण्यांची माळ देणार आहोत. त्यांनी 108 वेळा "मुंबई, मुंबई...' असा जप करावा, असा टोला राज यांनी लगावला.
पृथ्वीराज यांनी सर्वप्रथम आदर्श गैरव्यवहारात गुंतलेल्या सर्वांविरुद्ध कठोर कारवाई करावी. सनदी अधिकाऱ्यांनाही पाठीशी घालू नये, अशी मागणी करताना राज म्हणाले, की महाराष्ट्रात शासकीय व पोलिस अधिकाऱ्यांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दा आहे. याकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष द्यावे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें