मौका सभी को मिलता हैं |
राज ठाकरे यांचा ‘दादा’-‘आबा’ यांना इशारा औरंगाबाद, १२ जानेवारी/खास प्रतिनिधी शिवनेरी किल्ल्याजवळ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हेलिकॅप्टर आणि सभेत दगडफेक केली. त्या वेळी हेलिकॅप्टरमध्ये विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील होते. दगडफेक करणाऱ्या त्या कार्यकर्त्यांवर केवळ गुन्हे दाखल केले. त्यांना फोडून काढण्याची हिंमत या राज्य सरकारच्या पोलिसांकडे नव्हती. ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांमध्ये शिवसंग्रामचे कार्यकर्ते होते. या भीषण हल्ल्यातून केतकर वाचले. या शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट त्यांना आमदारकी भेट देण्यात आली, अशी टीका करून राज म्हणाले, ‘‘निळूभाऊ खाडीलकर यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. यांना पोसले जात आहे. जाती-पातीचे विष पेरून राजकारण केले जात आहे. जातीपातीच्या चिखलातच महाराष्ट्राला राहू दिले जात आहे. दादोजी कोंडदेव प्रकरणात इतिहास बदलला जाणार आहे का? इतिहासात दोष असतील तर ते चर्चेने सोडवा.’’ ‘जास्त अंगावर येऊ नका,’ असा इशाराही आर. आर. आणि अजितदादांना देताना राज म्हणाले, ‘‘ पोलीस दलाच्या आडून लढू नका. हिंमत असेल तर होऊन जाऊ द्या.’’ आर. आर. पाटील यांनी मुंबई हल्ल्यानंतर ‘बडे बडे शहरमें छोटी छोटी बातें होती हैं’ असा डायलॉग लगावला होता. याला ‘मौका सभी को मिलता हैं’ हा ‘सत्या’ चित्रपटातील संवाद त्यांनी सांगितला. हर्षवर्धनचे आई-वडील काँग्रेसच्या राजवटीतील त्यांच्याच पक्षाचे आमदार होते. त्यांचा मुलगा मनसेकडे का आला, म्हणूनच त्याला बडविण्यात आले आणि याला चिथावणी आर. आर. आबा आणि अजित पवार यांचीच आहे. कायदा हातात घेणाऱ्या लोकप्रतिनिधींचे काय हाल होतात, असे अजित पवार जालन्याच्या सभेत म्हणाले होते. आर. आर. आणि अजित पवार यांचे आदेश असल्यामुळेच ही मारझोड करण्यात आली, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. |
मौका सभी को मिलता हैं
जवाब देंहटाएं