सोमवार, 1 नवंबर 2010

कल्याण-डोंबिवलीत त्रिशंकू स्थिती

कल्याण-डोंबिवलीत त्रिशंकू स्थिती
सकाळ वृत्तसेवा
Monday, November 01, 2010 AT 10:21 AM (IST)

मुंबई - कल्याण-डोंबिवली महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेच्या १०७ जागांपैकी सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीला ४१ जागा, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ३०, मनसेला २५ आणि अपक्षांना ११ जागा मिळाल्या. यामुळे कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. कोणत्याही पक्षाला महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ५४ नगरसेवक बरोबर असणे आवश्यक आहे.

शिवसेना आणि मनसे यांच्यात प्रमुख लढत पहायला मिळालेल्या या महापालिकेत मनसेने शिवसेनेला धक्का दिला. मनसेने सर्वच १०७ जागांवर आपले उमेदवार उभे करून २५ जागा मिळविण्यात यश मिळविले. तसेच काही प्रभागांमध्ये त्यांचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले. यामुळे याचा फटका शिवसेनेला बसला. शिवसेनेने ३२ जागांवर, तर भाजपने ९ जागांवर यश मिळविले. काँग्रेसला १५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १५ जागा जिंकण्यात यश आले.
कल्याण-डोंबिवलीचे महापौर आणि उपमहापौरांना पराभव स्वीकारावा लागले. महापौर रमेश जाधव यांचा वॉर्ड क्र. ३८ मधून आश्चर्यकारकरित्या पराभव झाला. जाधव यांचा मनसेचे उमेदवार नितीन निकम यांनी पराभव केला. खडेगोळवली या वॉर्ड क्र. ४८ मधून संध्या तरे यांनी विजय मिळविला. संध्या तरे यांनी १०५८ मते मिळवीत अपक्ष उमेदवार वैशाली तरे यांचा पराभव केला. राष्ट्रवादीच्या

रविवारी झालेल्या मतदानानंतर आज (सोमवार) सकाळी दहापासून डोंबिवली क्रीडासंकुलात मतमोजणी झाली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें