गुरुवार, 23 अगस्त 2012

बदलीतून पोलिस खात्याने योग्य बोध घ्यावा- राज

बदलीतून पोलिस खात्याने योग्य बोध घ्यावा- राज
- सकाळ वृत्तसेवा
Friday, August 24, 2012 AT 03:30 AM (IST)


ही बातमी सीडी पानात थोडक्‍यात आणि पुण्यासाठी मुळ स्वरुपात घ्यावी.

'कारभार जमत नसेल तर गृहमंत्र्यांनी राहूच नये'

पुणे- "मुंबईचे पोलिस आयुक्‍त अरुण पटनाईक यांच्या बदलीतून पोलिस खात्याने योग्य तो बोध घ्यावा. गृहमंत्र्यांना जर त्यांच्या खात्याचा कारभार जमत नसेल, त्यांना खाते उमगत नसेल, तर त्यांनी इथे राहूच नये,'' अशी टीका करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याचे सांगितले. केवळ इंदू मिलचा मुद्दा उपस्थित करणारे रिपब्लिकन पक्षाचे नेते इतर प्रश्‍नांच्या वेळी कोठे असतात, असा सवालही त्यांनी पुन्हा केला.

मुंबईतील विराट मोर्चात ठाकरे यांनी पोलिस आयुक्‍तांच्या बदलीची मागणी केली होती. पटनाईक यांना पोलिस आयुक्‍त पदावरून बाजूला व्हावे लागले. त्यावर प्रतिक्रिया व्यक्‍त करताना ठाकरे म्हणाले, ""मोर्चाच्या निमित्ताने लोकांच्या मनात असणारा संताप व्यक्‍त झाला. पोलिस आयुक्‍तांशी माझी व्यक्तिगत दुश्‍मनी नव्हती. आझाद मैदानावर ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली गेली, त्यास तेच जबाबदार होते. महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार झाला; पण पोलिसांना योग्य आदेश दिले नाहीत. त्यामुळे या बदलीतून पोलिसांनी योग्य तो बोध घ्यावा. भविष्यात अशा पद्धतीने वागण्याची कोणाची हिंमत होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. गृहमंत्र्यांना त्यांचे काम जमत नाही हे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी हे खाते सोडून दुसरे खाते घ्यावे.''
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मोर्चाबद्दल दाखविलेल्या सहानुभूतीबद्दल विचारले असता ते म्हणाले, ""सामना किंवा उद्धव काय म्हणाले यापेक्षाही अशा परिस्थितीत आपापसांतील मतभेद विसरून सर्व बाजूंनी दबाव आणणे आवश्‍यक आहे.''

इंदू मिलबाबत केलेल्या वक्‍तव्यावरून रिपब्लिकन पक्षाने केलेल्या निषेधाचा समाचार घेत राज ठाकरे म्हणाले, ""डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेला वाचा, शिका हा संदेश हे लोक विसरलेले दिसतात. मी काय बोललो हे सर्वांनी पाहिलेले आहे. महाराष्ट्रात एवढे प्रश्‍न असतात त्या वेळी हे नेते कोठे असतात? प्रत्येक वेळी इंदू मिलचे नाव घ्यायचे. ती जमीन केंद्र सरकार देणार आहे. ती यांच्या हातात दिली जाणार नाही. त्या ठिकाणी सरकार स्मारक बांधणार आहे. चार टाळकी घेऊन हे लोक रस्त्यावर येतात. यांना त्यांच्या समाजातील लोकांचाही पाठिंबा नसतो. महाराष्ट्रातील जनतेचा "आयक्‍यू' चांगला आहे. त्यामुळे मला काय म्हणायचे हे त्यांना नीट समजले आहे.''

आमदार अबू आझमी यांच्यावर कोणतेही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. टोलबाबत पुन्हा आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज म्हणाले...
- आर. आर. पाटील यांच्याऐवजी टग्याने हे खाते हातात घ्यावे.
- नवीन पोलिस आयुक्‍त सत्यपालसिंह यांची सदिच्छा भेट घेणार.
- पटनाईक यांना भेटलो; पण ते कॅंटीनच्या सुविधेबद्दलच बोलले.
- घुसखोरांचा वेळीच बंदोबस्त करायला हवा

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें